शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रवादीचा महापालिकेवर ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:34 IST

नाशिककरांवर लादलेली भरमसाठ करवाढ रद्द करावी, सिडकोमधील घरे उद््ध्वस्त करू नये, गावठाण भागात क्लस्टर विकास योजना राबवावी, अंगणवाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, झोपडपट्टीच्या ठिकाणी राहत्या घरी घरकुले द्यावी, महापालिकेने शहर बससेवेचा चालविण्याचा भार उचलू नये, अशा सहा मागण्यांसाठी सोमवारी (दि.१०) राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

नाशिक : नाशिककरांवर लादलेली भरमसाठ करवाढ रद्द करावी, सिडकोमधील घरे उद््ध्वस्त करू नये, गावठाण भागात क्लस्टर विकास योजना राबवावी, अंगणवाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, झोपडपट्टीच्या ठिकाणी राहत्या घरी घरकुले द्यावी, महापालिकेने शहर बससेवेचा चालविण्याचा भार उचलू नये, अशा सहा मागण्यांसाठी सोमवारी (दि.१०) राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ यांनीही मोर्चेकऱ्यांसमवेत पायी मार्गक्रमण करीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना हुकूमशाही कारभार थांबविण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला.  मुंबईनाका येथील राष्टÑवादीच्या कार्यालयापासून भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, भुजबळ यांनी शिष्टमंडळासह मुंढे यांची भेट घेणे पसंत के ले नाही. माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह शिष्टमंडळाने तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन वरील मागण्यांचे निवेदन दिले व त्यांच्यासमवेत चर्चा केली; मात्र मुंढे यांनी त्यांच्या सर्व मागण्यांबाबतचा खुलासा करत कुठल्याहीप्रकारे बेकायदेशीर काम महापालिका प्रशासनाकडून केले जात नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकची करवाढ अत्यंत कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.  यावेळी राजीव गांधी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भुजबळ यांनी उपस्थित शेकडो मोर्चेकºयांना उद्देशून बोलताना सर्वप्रथम मुंढे यांच्या कारभाराचा समाचार घेतला. त्यानंतर भाजपा आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, अंगणवाड्यांचा प्रश्न संपूर्ण राज्यात कोठेही उद्भवलेला नाही. मुंढे यांनी शहरातील अंगणवाड्या बंद करून अंगणवाडीसेविकांचा उदरनिर्वाह अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. गोरगरीब नाशिककरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुकारलेला या एल्गाराच्या माध्यमातून लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला. मुंढे यांची वागणूक चुकीची आहे. त्यांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांना मान देत शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे. नगरसेवकांचे हक्क डावलण्याचा प्रयत्न मुंढे यांनी करू नये, असा सल्लाही भुजबळ यांनी यावेळी दिला. सर्वांना सोबत घेऊन लोकशाही पद्धतीने नाशिककरांच्या विकासासाठी निर्णय घ्याल तर स्वागत करू, असे भुजबळ यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस