शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
12
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
13
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
14
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
15
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
16
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
17
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
18
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
19
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
20
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑीय पक्षांनाच मतदारांची सर्वाधिक पसंती

By धनंजय वाखारे | Updated: September 16, 2019 01:47 IST

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला; परंतु, ते प्रभाव दाखवू शकलेले नाहीत.

ठळक मुद्देप्रादेशिक पक्ष दुसऱ्या स्थानावर : अन्य प्रांतातील प्रादेशिक पक्ष प्रभावहीन

नाशिक : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला; परंतु, ते प्रभाव दाखवू शकलेले नाहीत. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सहा राष्टÑीय पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी ६५.७७ टक्के इतकी होती. त्या तुलनेत प्रादेशिक पक्षांना २२.५० टक्के मते मिळविता आली होती, तर अन्य प्रांतातील राजकीय पक्षांना अवघे १.१५ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. महाराष्टÑात प्रादेशिक पक्षांकडे अजूनही मतदार पूर्णपणे एकहाती सत्ता सोपान देऊ शकलेले नाही.महाराष्टÑात झालेल्या गेल्या चार विधानसभा निवडणुकांचा धांडोळा घेतला असता, १९९९मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्टÑीय पक्ष असलेल्या काँग्रेस, भाजप, बसपा, माकप, भाकप, जनता दल सेक्यूलर आणि जनता दल युनायटेड या राजकीय पक्षांना ४४.५० टक्के मते मिळाली होती. त्याखालोखाल प्रादेशिक पक्षांना ४१.३५ टक्के मते घेता आली. त्यावेळी प्रादेशिक पक्षांमध्ये राष्टÑवादी आणि शिवसेनेचा समावेश होता. त्यात राष्टÑवादीने २२.६६ टक्के, तर शिवसेनेने १७.३३ टक्के मते घेतली होती. यावेळी अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांना ४.६७ टक्के तर अपक्षांना ९.४९ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्टÑीय पक्षांचा आलेख चढता राहिला आणि त्यांनी ५८.२४ टक्के मते घेतली. त्याखालोखाल प्रादेशिक पक्षांना १९.९७ टक्के तर अन्य प्रांतातील राजकीय पक्षांना १.७८ टक्के मते घेता आली. अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांना ५.९७ टक्के तर अपक्षांना १४.९६ टक्के मते मिळाली होती. २००९च्या निवडणुकीत राष्टÑीय पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत घट होऊन त्यांना ५४.५० टक्के मते मिळाली. प्रादेशिक पक्षांना १६.२६ टक्के, तर अन्य प्रांतातील पक्षांना ०.९९ टक्के मते मिळाली. अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी १२.७५ टक्के तर अपक्षांनी १५.५० टक्के मते मिळविली होती. गेल्या चार निवडणुकींमध्ये मतदारांनी राष्ट्रीय पक्षांवरच सर्वाधिक भरवसा टाकलेला दिसून येतो.अन्य प्रांतातील पक्षांची बोळवणअन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही महाराष्टÑात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काहींचा चंचुप्रवेशच झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर यश मिळविता आलेले नाही. १९९९च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने २ जागा जिंकल्या होत्या, तर अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांनी ११ जागा घेतल्या होत्या. २००४च्या निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाला यश मिळविता आलेले नाही. त्या तुलनेत अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांनी १० जागा जिंकल्या होत्या. २००९च्या निवडणुकीतही समाजवादी पक्षाने ४ जागा जिंकत आपला दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी तब्बल २५ जागा जिंकल्या होत्या, तर अपक्षांची संख्याही २४ इतकी होती. २०१४च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला एक तर एमआयएमला २ जागा जिंकता आल्या होत्या. अमान्यताप्राप्त पक्षांनी ८ तर ७ अपक्ष उमेदवारांनी विधानसभेत प्रवेश केला होता.बसपाची पाटी कोरीचगेल्या चार निवडणुकींमध्ये मायावती यांच्या बसपाने सर्वाधिक जागा लढल्या; परंतु एकही उमेदवार विधानसभेची पायरी चढू शकलेला नाही. १९९९ मध्ये बसपाने ८३ जागा, २००४ मध्ये २७२ जागा, २००९ मध्ये २८१ जागा, तर २०१४ मध्ये २८० जागा लढल्या होत्या. विशेष म्हणजे प्रादेशिक पक्ष असलेल्या व गावोगावी शाखा असलेल्या शिवसेनेला अद्याप एवढे उमेदवार देता आलेले नाहीत. हीच परिस्थिती भाकपचीही आहे. गेल्या चार निवडणुकीत भाकपने उमेदवार दिले; परंतु त्यांच्या पदरीही अपयशच पडले आहे.

टॅग्स :NashikनाशिकVotingमतदान