शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑीय पक्षांनाच मतदारांची सर्वाधिक पसंती

By धनंजय वाखारे | Updated: September 16, 2019 01:47 IST

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला; परंतु, ते प्रभाव दाखवू शकलेले नाहीत.

ठळक मुद्देप्रादेशिक पक्ष दुसऱ्या स्थानावर : अन्य प्रांतातील प्रादेशिक पक्ष प्रभावहीन

नाशिक : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला; परंतु, ते प्रभाव दाखवू शकलेले नाहीत. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सहा राष्टÑीय पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी ६५.७७ टक्के इतकी होती. त्या तुलनेत प्रादेशिक पक्षांना २२.५० टक्के मते मिळविता आली होती, तर अन्य प्रांतातील राजकीय पक्षांना अवघे १.१५ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. महाराष्टÑात प्रादेशिक पक्षांकडे अजूनही मतदार पूर्णपणे एकहाती सत्ता सोपान देऊ शकलेले नाही.महाराष्टÑात झालेल्या गेल्या चार विधानसभा निवडणुकांचा धांडोळा घेतला असता, १९९९मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्टÑीय पक्ष असलेल्या काँग्रेस, भाजप, बसपा, माकप, भाकप, जनता दल सेक्यूलर आणि जनता दल युनायटेड या राजकीय पक्षांना ४४.५० टक्के मते मिळाली होती. त्याखालोखाल प्रादेशिक पक्षांना ४१.३५ टक्के मते घेता आली. त्यावेळी प्रादेशिक पक्षांमध्ये राष्टÑवादी आणि शिवसेनेचा समावेश होता. त्यात राष्टÑवादीने २२.६६ टक्के, तर शिवसेनेने १७.३३ टक्के मते घेतली होती. यावेळी अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांना ४.६७ टक्के तर अपक्षांना ९.४९ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्टÑीय पक्षांचा आलेख चढता राहिला आणि त्यांनी ५८.२४ टक्के मते घेतली. त्याखालोखाल प्रादेशिक पक्षांना १९.९७ टक्के तर अन्य प्रांतातील राजकीय पक्षांना १.७८ टक्के मते घेता आली. अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांना ५.९७ टक्के तर अपक्षांना १४.९६ टक्के मते मिळाली होती. २००९च्या निवडणुकीत राष्टÑीय पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत घट होऊन त्यांना ५४.५० टक्के मते मिळाली. प्रादेशिक पक्षांना १६.२६ टक्के, तर अन्य प्रांतातील पक्षांना ०.९९ टक्के मते मिळाली. अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी १२.७५ टक्के तर अपक्षांनी १५.५० टक्के मते मिळविली होती. गेल्या चार निवडणुकींमध्ये मतदारांनी राष्ट्रीय पक्षांवरच सर्वाधिक भरवसा टाकलेला दिसून येतो.अन्य प्रांतातील पक्षांची बोळवणअन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही महाराष्टÑात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काहींचा चंचुप्रवेशच झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर यश मिळविता आलेले नाही. १९९९च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने २ जागा जिंकल्या होत्या, तर अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांनी ११ जागा घेतल्या होत्या. २००४च्या निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाला यश मिळविता आलेले नाही. त्या तुलनेत अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांनी १० जागा जिंकल्या होत्या. २००९च्या निवडणुकीतही समाजवादी पक्षाने ४ जागा जिंकत आपला दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी तब्बल २५ जागा जिंकल्या होत्या, तर अपक्षांची संख्याही २४ इतकी होती. २०१४च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला एक तर एमआयएमला २ जागा जिंकता आल्या होत्या. अमान्यताप्राप्त पक्षांनी ८ तर ७ अपक्ष उमेदवारांनी विधानसभेत प्रवेश केला होता.बसपाची पाटी कोरीचगेल्या चार निवडणुकींमध्ये मायावती यांच्या बसपाने सर्वाधिक जागा लढल्या; परंतु एकही उमेदवार विधानसभेची पायरी चढू शकलेला नाही. १९९९ मध्ये बसपाने ८३ जागा, २००४ मध्ये २७२ जागा, २००९ मध्ये २८१ जागा, तर २०१४ मध्ये २८० जागा लढल्या होत्या. विशेष म्हणजे प्रादेशिक पक्ष असलेल्या व गावोगावी शाखा असलेल्या शिवसेनेला अद्याप एवढे उमेदवार देता आलेले नाहीत. हीच परिस्थिती भाकपचीही आहे. गेल्या चार निवडणुकीत भाकपने उमेदवार दिले; परंतु त्यांच्या पदरीही अपयशच पडले आहे.

टॅग्स :NashikनाशिकVotingमतदान