शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेतून ३०, ५० मीटर होणार बंद

By admin | Updated: May 23, 2014 01:06 IST

अखेरची स्पर्धा : ऑलिम्पिकच्या नियमानुसार होणार स्पर्धा

अखेरची स्पर्धा : ऑलिम्पिकच्या नियमानुसार होणार स्पर्धानरेश हाळणोर / नाशिक : आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये रिकर्व्ह (फिटा) या प्रकारालाच जशी मान्यता आहे त्याचप्रमाणे केवळ ७० मीटर अंतराच्याच दोन फेर्‍या होतात. आता याच धर्तीवर भारतातीलही स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये होणार्‍या ३०, ५० आणि ६० मीटर अंतराच्या स्पर्धा बंद होणार आहेत तर खेळाडूंना प्रोत्साहन आणि सराव व्हावा यासाठी इंडियन राऊंडमधून ५० मीटर अंतराची स्पर्धा मात्र सुरूच राहणार आहे. जुन्या नियमांनुसारची नाशकात होणारी शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा अखेरची असणार असून, यापुढील स्पर्धा या ऑलिम्पिकच्या नियमांनुसारच होणार आहे. भारतामध्ये अजूनही अनेक स्पर्धा या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होत नाहीत. याबाबत अनेकदा वादही झाले आहेत. काही वर्षांपूर्वी कुस्तीच्या बाबतीतही असे झाले होते. मातीच्या कुस्तीमध्ये खेळण्याचा पहिलवानांना सराव असल्याने त्यांना मॅटवर खेळणे कठीण जात होते. मात्र आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स फेडरेशन व ऑलिम्पिक संघाने मॅटचे बंधन घातल्यानंतर अनेक वर्षे भारताने त्यास विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. अखेर तेच नियम मान्य केल्यानंतर गेल्या काही स्पर्धांमधून भारताला कुस्तीमध्ये पदकेही मिळत आहेत. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेपासून क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांचीही प्रसिद्धी झाली. त्यात धनुर्विद्या स्पर्धेचाही समावेश होता. मात्र भारतामध्ये आजतागायत ऑलिम्पिक वा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ही स्पर्धा होत नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवर रिकर्व्ह (फिटा) हा प्रकार वापर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे फक्त ७० मीटर अंतराच्याच दोन फेर्‍यातून २४ राऊंड होतात. भारतामध्ये राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमधून फिटा प्रकारात ३० मीटर, ५० मीटर आणि ७० मीटर अंतराच्या फेर्‍या होतात. मात्र या वर्षापासून ऑलिम्पिकच्या नियमानुसारच राष्ट्रीय स्पर्धांमधूनदेखील केवळ ७० मीटर अंतराच्या १२ राऊंडच्या दोन फेर्‍या घेतल्या जाणार आहेत. २४ राऊंडमधून मिळालेल्या गुणांतून खेळाडूंची पदके ठरतील. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेली शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा ही जुन्या नियमांनुसार होणारी अखेरची स्पर्धा ठरणार आहे. इंडियन राऊंडमधून ३० मीटर बंददरम्यान, रिकर्व्ह (फिटा) या प्रकारामधून जशा फक्त ७० मीटरच्याच स्पर्धा होतील त्याचप्रमाणे इंडियन राऊंडमधूनही केवळ ५० मीटरच्याच स्पर्धा होतील. या गटातील ३० मीटरची स्पर्धा यानंतरच्या स्पर्धांमधून होणार नाहीत. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ५० मीटरमध्ये २४ राऊंड खेळावे लागतील.