शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

नाशिकची स्वच्छतेत क्रमवारी घसरली,  खंत वाटते की अभिमान?

By संजय पाठक | Updated: March 9, 2019 23:33 IST

शहर स्वच्छ करण्यासाठी महापाालिकेसारखी केवळ यंत्रणा असून उपयोग नाही. यंत्रणेचा कमीत कमी वापर व्हावा अशी स्वच्छता नागरीकांच्या मानसिकतेतून तयार होते. तीच होत नसेल तर स्पर्धा आणि त्यात मिळालेले गुण क्रमवारी हा साराच विषय गौण आहे, शिवाय अस्वच्छता हा कधीही न संपणारा विषय ठरेल.

ठळक मुद्देकचरा उचलला पाहिजे ठिक मात्र कचरा करतो कोण?नागरीकांची मानसिकता बदलण्यापेक्षा नगरसेवकांचा रोष प्रशासनावरकेवळ सफाई कामगारांच्या भरतीत इंटरेस्ट, स्वच्छतेत का नाही?

संजय पाठक, नाशिक- स्वच्छता क्रमवारीत नाशिकचा क्रमांक घसरला. टॉप टेन मध्ये येण्याची अपेक्षा याही वर्षी वास्तवात उतरली नाही. आणि ६७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. परंतु याविषयी खंत मानायचा की अभिमान याबाबत मात्र मतभेद असू शकतात. विशेषत: सर्वेक्षणासाठी ज्यावेळी पथक नाशिकमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांना प्रशासन चांगले भाग दाखवत असेल तर त्या पथकाला कुठे कचरा पडला आहे तो दाखवा अशी चर्चा दोन प्रभाग समितींच्या बैठकीत त्याच वेळी झाली. ज्यांच्याकडे महापालिकेची मान उंचावण्याची जबाबदारी आहे, तेच जर मानहानी करायला निघाले असतील तर मग महापालिकेचा क्रमांक घसरल्या बद्दल महापालिकेच्या अशा नगरसेवकांचे कौतुकच करायला हवे!

नाशिकच नव्हे तर सर्वच ठिकाणी स्वच्छ, सुंदर आणि हरीत असा शब्द जोडला जातो. त्या माध्यमातून शहरातील लोकांवर आपल्या शहराची प्रतिष्ठा बिंबवण्यासाठी प्रयत्न केला जात असतो. नाशिकमध्ये अशाप्रकारचा प्रयत्न वर्षानुवर्षे केला जातो आणि त्याच प्रमाणे महापालिका देखील प्रयत्न करते. परंतु हे केवळ एकट्या महापालिकेचे काम नाही हे ना नगरसेवकांना कळते ना नागरीकांना! अन्य महापालिकांच्या तुलनेत खरे तर स्वच्छतेच्या बाबतीत नाशिक बऱ्यापैकी चांगले आहे. पंचवटीत नगरपालिका काळापासून असलेला कचरा डेपो हटविल्यानंतर पाथर्डी शिवारात कचऱ्यापासून खत निर्मिती अर्थातच घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प २०००- २००१ मध्ये राबविण्यात आला. त्यातील काही त्रुटी होत्या त्यावरून न्यायालयाने महापालिकेला दटवले परंतु आता वर्षभरापासून हा प्रकल्प खासगीकरणातून सुरू आहे. हॉटेल वेस्ट आणि सार्वजनिक शौचालयांचे मलजल आणून वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प जर्मन सरकारच्या मदतीने राबविण्यात आला आहे. प्लास्टीक हा सर्वात मोठा अडचणीचा भाग असताना त्यापासून फर्नेश आॅईल देखील तयार केले जाते याच ठिकाणी मृत जनावरांची विल्हेवाट लावणारी भट्टी देखील आहे तर हॉस्पीटल्सचा जैविक कचरा नष्ट करणारा प्रकल्प देखील आहे. इतक्या सुविधा असूनही शहरात कचºयाचा प्रश्न सुटत नाही.

शहरात अनेक ठिकाणी पारंपरीक कच-या कुंड्या कायम आहेत. त्या हटविल्यानंतर देखील पडून राहतात, महापालिका कचरा उचलत नाही अशी ओरड नगरसेवक आणि नागरीक करतात. परंतु मुळात कचरा कोण टाकते...नागरीकच ना..नगरसेवक अशा लोकांशी पंगा घेत नाही कारण त्यांचे मतदार असतात. त्यामुळे ते घाण करतील परंतु साफ सफाई मात्र महापालिकेनेच करावी अशी अपेक्षा असते. गेल्याच वर्षी महापालिकेने कचरा वर्गीकरण म्हणजे ओला आणि सुका कचरा वर्गीकरणावर भर दिला. नागरीकांना लिखीत सुचना दिल्या, परंतु त्याचे काय झाले? किती ठिकाणी नागरीक ओला आणि सुका कचरा देतात? सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश असतानाही त्याचे पालन केले जात नाही. त्याबद्दल नगरसेवक विचार करीत नाही ना नागरीक! परंतु ओरड करण्यासाठी सर्वच तयार असतात. महापालिकेच्या चूका असतात, तसेच सेवेत त्रुटीही असू शकतात. परंतु ही संस्था शेवटी कोण चालविते? निवडून दिलेले नगरसेवक हे प्रशासनाचे विरोधक आणि टिकाकार आहेत की काम करून घेण्यासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत हा प्रश्न का निर्माण होतो?

महापालिकेला ४२०० शहरातून ६७ वा क्रमांक मिळाला. त्यात हागणदारी मुक्त आणि सेवास्तर याला साडे बाराशे पैकी जेमतेम पाचशे गुण मिळाले. महापालिकेने शहरात शौचालयांची संख्या वाढवली. झोपडपट्टीत सार्वजनिक शौचालये आहेत. व्यक्तीगत शौचालयांसाठी अनुदान वाटले देखील आहे. परंतु तरी रस्त्यावर किंवा उघड्यावर शौचालये नागरीक करीत असतील तर काय करायचे? महापालिकेने कोणाला दंड केलाच तर कुणीतरी दादा, नाना म्हणजे राजकिय पक्षाचा कार्यकर्ता, किंबहूना नगरसेवकाचे कार्यकर्ते धावत येतात. ग्रामीण भागात गुडमॉर्निंग पथक यशस्वी ठरले परंतु शहरात मात्र ते यामुळेच यशस्वी होईल अशी खात्री देता येत नाही.

आपले शहर आणि त्याअनुंषगांने स्वच्छता हा विषय नगरसेवकांच्या प्राधान्यावर नाही. कचरा उचलला जात नाही ही तक्रार रास्त परंतु त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी कोणाची? केवळ प्रशासनाचीच मग नगरसेवक काय करतात. खरे तर सफाई कामगारांची भरती हा मोठा धंदा आहे. सध्या असलेल्या १८०० सफाई कामगारांपैकी किमान तीनशे ते चारशे सुशिक्षीत आणि वशिलेबाज कर्मचारी कामाच्या सोयीने क्लर्क आणि नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची कामे करतात. मग कामगार भरा आणि त्यांना सोयीचे टेबल द्या यासाठीच भरती करायची काय असाही प्रश्न निर्माण होतो.

शहर स्वच्छ करण्यासाठी महापाालिकेसारखी केवळ यंत्रणा असून उपयोग नाही. यंत्रणेचा कमीत कमी वापर व्हावा अशी स्वच्छता नागरीकांच्या मानसिकतेतून तयार होते. तीच होत नसेल तर स्पर्धा आणि त्यात मिळालेले गुण क्रमवारी हा साराच विषय गौण आहे, शिवाय अस्वच्छता हा कधीही न संपणारा विषय ठरेल. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार