शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
3
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
4
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
5
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
6
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
7
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
8
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
9
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
10
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
11
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
12
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
13
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
14
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
15
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
16
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
17
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
18
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
19
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
20
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांचा रविवार कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:52 IST

मुंबईसह राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नाशिकमध्येही काही तासांत जोरदार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र शनिवारची रात्र आणि रविवारच्या संपूर्ण दिवसात पावसाची कृपा काही होऊ शकली नाही.

नाशिक : मुंबईसह राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नाशिकमध्येही काही तासांत जोरदार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र शनिवारची रात्र आणि रविवारच्या संपूर्ण दिवसात पावसाची कृपा काही होऊ शकली नाही.  आभाळ दाटून आल्याने जोरदार पावसाची अपेक्षा पल्लवित झाली असली तरी शहरात निव्वळ काही ठिकाणीच पावसाचा शिडकावा झाला. काळेकुट्ट आभाळ आणि गार वाऱ्यामुळे नाशिककरांनी गारठा अनुभवला.  राज्यातील हवामानातील अंदाज सातत्याने फोल ठरत असतानाच शनिवारी मुंबईसह सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला. राज्यातील अनेक भागात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी पावसाने काही वेळ हजेरी लावल्यानंतर शनिवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे नाशिककरांना उकाडा सहन करावा लागला. मात्र, शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर नाशिककरांना कडाक्याचा गारवाही सहन करावा लागला. दुपारच्या सुमारास दाटून आलेले आभाळ आणि गार वाºयामुळे जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सायंकाळपर्यंत पावसाचा शिडकावा वगळता अपेक्षित पाऊस होऊ शकला नाही. हवामान खात्याने नाशिकला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नाशिककरांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.सायंकाळी सरींचा वर्षाव४सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्यामुळे संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता नागरिकांना वाटत होती. मात्र वरुणराजाने निराशा केली. सायंकाळी काही प्रमाणात हलक्या सरींचा वर्षाव शहरातील मध्यवर्ती भागात तसेच काही उपनगरांमध्ये झाला. सात वाजेपासून पावसाच्या हलक्या सरीचा वर्षाव सुरू झाला होता. रात्री आठ वाजेनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली. गेल्या शुक्रवारी (दि. २२) दिवसभरात ३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.गेल्या वर्षीचा जून समाधानकारकमागील वर्षी जून महिन्याअखेर २४९ मि.मी. इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान खात्याच्या केंद्राकडे आहे. मागील वर्षी २४ ते २५ जून रोजी २४ तासांत ५८ मि.मी. इतका हंगामातील उच्चांकी पाऊस झाला होता. २ जूनपासून शहरात पावसाची सुरुवात झाली होती. ३ ते ४ जून रोजी ५० मि.मी. पाऊस २४ तासांत नोंदविला गेला होता. यावर्षी जून महिन्यामध्ये वरुणराजाची समाधानकारक कृपादृष्टी अद्याप नाशिककरांवर झाली नाही. त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्पच राहिल्याचे दिसून येते. गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीतही घट होत असून, जलसाठा २४ टक्क्यांवर आला आहे. यावर्षी अद्याप ७७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. एकूणच शहरासह जिल्ह्याचे पर्जन्यमानाचे प्रमाण यावर्षी जून महिन्यात घटले आहे.

टॅग्स :Rainपाऊस