शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

नाशिककरांचा रविवार कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:52 IST

मुंबईसह राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नाशिकमध्येही काही तासांत जोरदार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र शनिवारची रात्र आणि रविवारच्या संपूर्ण दिवसात पावसाची कृपा काही होऊ शकली नाही.

नाशिक : मुंबईसह राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नाशिकमध्येही काही तासांत जोरदार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र शनिवारची रात्र आणि रविवारच्या संपूर्ण दिवसात पावसाची कृपा काही होऊ शकली नाही.  आभाळ दाटून आल्याने जोरदार पावसाची अपेक्षा पल्लवित झाली असली तरी शहरात निव्वळ काही ठिकाणीच पावसाचा शिडकावा झाला. काळेकुट्ट आभाळ आणि गार वाऱ्यामुळे नाशिककरांनी गारठा अनुभवला.  राज्यातील हवामानातील अंदाज सातत्याने फोल ठरत असतानाच शनिवारी मुंबईसह सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला. राज्यातील अनेक भागात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी पावसाने काही वेळ हजेरी लावल्यानंतर शनिवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे नाशिककरांना उकाडा सहन करावा लागला. मात्र, शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर नाशिककरांना कडाक्याचा गारवाही सहन करावा लागला. दुपारच्या सुमारास दाटून आलेले आभाळ आणि गार वाºयामुळे जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सायंकाळपर्यंत पावसाचा शिडकावा वगळता अपेक्षित पाऊस होऊ शकला नाही. हवामान खात्याने नाशिकला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नाशिककरांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.सायंकाळी सरींचा वर्षाव४सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्यामुळे संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता नागरिकांना वाटत होती. मात्र वरुणराजाने निराशा केली. सायंकाळी काही प्रमाणात हलक्या सरींचा वर्षाव शहरातील मध्यवर्ती भागात तसेच काही उपनगरांमध्ये झाला. सात वाजेपासून पावसाच्या हलक्या सरीचा वर्षाव सुरू झाला होता. रात्री आठ वाजेनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली. गेल्या शुक्रवारी (दि. २२) दिवसभरात ३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.गेल्या वर्षीचा जून समाधानकारकमागील वर्षी जून महिन्याअखेर २४९ मि.मी. इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान खात्याच्या केंद्राकडे आहे. मागील वर्षी २४ ते २५ जून रोजी २४ तासांत ५८ मि.मी. इतका हंगामातील उच्चांकी पाऊस झाला होता. २ जूनपासून शहरात पावसाची सुरुवात झाली होती. ३ ते ४ जून रोजी ५० मि.मी. पाऊस २४ तासांत नोंदविला गेला होता. यावर्षी जून महिन्यामध्ये वरुणराजाची समाधानकारक कृपादृष्टी अद्याप नाशिककरांवर झाली नाही. त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्पच राहिल्याचे दिसून येते. गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीतही घट होत असून, जलसाठा २४ टक्क्यांवर आला आहे. यावर्षी अद्याप ७७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. एकूणच शहरासह जिल्ह्याचे पर्जन्यमानाचे प्रमाण यावर्षी जून महिन्यात घटले आहे.

टॅग्स :Rainपाऊस