शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नाशिककरांचा रविवार कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:52 IST

मुंबईसह राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नाशिकमध्येही काही तासांत जोरदार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र शनिवारची रात्र आणि रविवारच्या संपूर्ण दिवसात पावसाची कृपा काही होऊ शकली नाही.

नाशिक : मुंबईसह राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नाशिकमध्येही काही तासांत जोरदार पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र शनिवारची रात्र आणि रविवारच्या संपूर्ण दिवसात पावसाची कृपा काही होऊ शकली नाही.  आभाळ दाटून आल्याने जोरदार पावसाची अपेक्षा पल्लवित झाली असली तरी शहरात निव्वळ काही ठिकाणीच पावसाचा शिडकावा झाला. काळेकुट्ट आभाळ आणि गार वाऱ्यामुळे नाशिककरांनी गारठा अनुभवला.  राज्यातील हवामानातील अंदाज सातत्याने फोल ठरत असतानाच शनिवारी मुंबईसह सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला. राज्यातील अनेक भागात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी पावसाने काही वेळ हजेरी लावल्यानंतर शनिवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे नाशिककरांना उकाडा सहन करावा लागला. मात्र, शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर नाशिककरांना कडाक्याचा गारवाही सहन करावा लागला. दुपारच्या सुमारास दाटून आलेले आभाळ आणि गार वाºयामुळे जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सायंकाळपर्यंत पावसाचा शिडकावा वगळता अपेक्षित पाऊस होऊ शकला नाही. हवामान खात्याने नाशिकला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नाशिककरांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.सायंकाळी सरींचा वर्षाव४सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्यामुळे संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता नागरिकांना वाटत होती. मात्र वरुणराजाने निराशा केली. सायंकाळी काही प्रमाणात हलक्या सरींचा वर्षाव शहरातील मध्यवर्ती भागात तसेच काही उपनगरांमध्ये झाला. सात वाजेपासून पावसाच्या हलक्या सरीचा वर्षाव सुरू झाला होता. रात्री आठ वाजेनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली. गेल्या शुक्रवारी (दि. २२) दिवसभरात ३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.गेल्या वर्षीचा जून समाधानकारकमागील वर्षी जून महिन्याअखेर २४९ मि.मी. इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान खात्याच्या केंद्राकडे आहे. मागील वर्षी २४ ते २५ जून रोजी २४ तासांत ५८ मि.मी. इतका हंगामातील उच्चांकी पाऊस झाला होता. २ जूनपासून शहरात पावसाची सुरुवात झाली होती. ३ ते ४ जून रोजी ५० मि.मी. पाऊस २४ तासांत नोंदविला गेला होता. यावर्षी जून महिन्यामध्ये वरुणराजाची समाधानकारक कृपादृष्टी अद्याप नाशिककरांवर झाली नाही. त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्पच राहिल्याचे दिसून येते. गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीतही घट होत असून, जलसाठा २४ टक्क्यांवर आला आहे. यावर्षी अद्याप ७७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. एकूणच शहरासह जिल्ह्याचे पर्जन्यमानाचे प्रमाण यावर्षी जून महिन्यात घटले आहे.

टॅग्स :Rainपाऊस