शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वॉटरकप स्पर्धेत सिन्नरमधील दोन गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:39 IST

नाशिक : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा संकल्प केला असून, गावातील नागरिक सर्व व्यवहार बंद करून श्रमदान करणार आहेत. ...

ठळक मुद्देआज श्रमदान : पाणी अडविण्यासाठी येणार तुफानअवघ्या गावातून श्रमदानाचे तुफान

नाशिक : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा संकल्प केला असून, गावातील नागरिक सर्व व्यवहार बंद करून श्रमदान करणार आहेत. सकाळी ७ वाजेपासून या श्रमदानाला प्रारंभ होणार आहे.अभिनेते आमीर खान यांच्या बहुचर्चित वॉटरकप स्पर्धेमध्ये राज्यातील तीनशेपेक्षा अधिक गावांनी सहभाग घेतला आहे. वर्षानुवर्षे गावातील पाण्याचे स्रोत बंद झाल्याने तसेच पाणी वाहून जात असल्याने राज्यातील असंख्य गावे दुष्काळग्रस्त आहेत. या गावांना पाणीदार गाव बनविण्यासाठी गावामध्येच श्रमदानाची भावना निर्माण करून नागरिकांना पाणीदार गावासाठी प्रवृत्त करण्याची आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनची योजना आहे. अगोदर गावाने पाण्यासाठी उभे राहावे आणि नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटावे यासाठी गावकºयांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे.या मोहिमेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार या गावांमधील नागरिक श्रमदान करणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हेदेखील या मोहिमेत सहभागी होऊन ग्रामस्थांना पाणी मोहिमेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामस्थांच्या श्रममोहिमेतून दुष्काळाचा शाप पुसण्यासाठी, नवा इतिहास घडविण्यासाठी अवघ्या गावातून श्रमदानाचे तुफान आले पाहिजे, या भूमिकेतून गिते हे ग्रामस्थांचे मनोबल उंचावणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद