शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

अनुदान वाटपात ‘अवकाळी’ परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 17:52 IST

गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीव्यवसायाचे गणित पूर्णपणे बिघडले. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने ...

गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीव्यवसायाचे गणित पूर्णपणे बिघडले. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने साहजिकच शासकीय मदतीचे पॅकेजही मिळाले. खरेतर डिसेंबरअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा निधी पोहोचणे अपेक्षित होते, मात्र ऐनवेळी निधी वितरण प्रणालीत बदल करण्यात आला आणि तहसीलपातळीवरील निधी एकाच बॅँकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकºयांना मिळणारी नुकसानभरपाईची प्रक्रिया संथ वाहताना दिसते.शेतकºयांपर्यंत मदतीचा निधी पोहचविण्यासाठी महसूल, कृषी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी असे सारेच कामाला लागले असतानाही शेतकºयांकडून निधी वितरण प्रक्रियेतील तक्रारी कमी झालेल्या नाहीत. यावरून शेतकºयांच्या मदतनिधीतील कासवगतीची प्रचिती येते. जिल्हाधिकाºयांकडून घेण्यात येणाºया आढावा बैठकीनंतरही वितरणप्रणालीची दिरंगाई कमी झालेली नाही. याउलट जिल्हा प्रशासनाकडून बॅँकेला देण्यात येणारी माहिती मराठीत असल्याने संगणकीय भाषा मात्र इंग्रजीप्रणालीची असल्यामुळे जिल्हा यंत्रणेला मराठी माहितीचे रूपांतर इंग्रजी भाषेत करण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे.अवकाळी पावसाच्या पहिल्या मदतीचा टप्पा तहसील यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. सुमारे १८१ कोटींच्या मदतनिधीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे दुसºया टप्प्यातील ३६१ कोटींच्या मदतनिधी वाटपासाठी रोडमॅप तयार झाल्याने अडचण येण्याचे कारण नाही. अशी यंत्रणा सज्ज असताना अचानक एकाच बॅँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अन्य बॅँकांमधील शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली ती अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील अवकाळी नुकसानग्रस्त शेतकºयांना राज्य शासनाकडून दोन टप्पे मिळून ५७८ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ५ लाख १० हजार शेतकºयांना ४५५ कोटी ५५ लाखांचे अनुदान वाटप झाले आहे. एकूण प्राप्त निधीपैकी ७८ टक्के इतकेच निधीचे वाटप झाले आहे.जिल्ह्यात बागलाण, कळवण, दिंडोरी, देवळा व येवला या तालुक्यांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत मदत वाटप झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मदत वाटपाचे प्रमाण हे साठ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ५७८ कोटी १३ लाख २९ हजार रु पयांच्या अनुदानापैकी ४५५ कोटी २५ लाख अनुदानाचे वाटप पूर्ण झाले आहे.अनुदान वाटपाला गती येण्यासाठी जिल्हाधिकाºयांना पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती आहे त्यापेक्षा वेगळी आहे. बांधावरील वाद, शेतातील भाऊबंदकीच्या वादामुळे नुकसानभरपाईच्या संदर्भात खासगी प्रश्नही दुर्लक्षित करून चालणार नाही. आता जिल्हाधिकाºयांनी १५ जानेवारीचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र अवघ्या एक-दोन दिवसात वाटप यंत्रणेत सुरळीतपणा येईल का? हा खरा प्रश्न आहे. शासकीय काम आणि सहा महिने थांब असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर येऊ नये म्हणजे झाले...

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी