शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आषाढी एकादशीसाठी राज्यातून ३ हजार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:31 IST

नाशिक : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ ...

ठळक मुद्देएस.टी. महामंडळ: सहाही प्रदेशातून बसेसचे नियोजन

नाशिक: श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ बसेसचे नियोजन केले आहे. याबाबतच्या सुचना महामंडळाच्या सर्व प्रादेशिक विभागांना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून अतितरिक्त बसेस मागविण्यात आलेल्या आहेत.आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने जय्यत तयारी केली असून त्याबाबतचे नियोजन राज्यपातळीवर केली आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेºयांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ बसेसचे नियोजन केले असून महाराष्टÑात येणाºया लाखो भाविक प्रवशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एस.टी. महामंहळाचे सुमारे पाच हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे तैनात करण्यात येणार आहे. येत्या १० ते १६ जुलै या कालावधीत महामंडळच्या कर्मचºयांवर प्रवासी वाहतुकीची मोठी जबाबदारी असणार आहे.पंढरपुरची आषाढी यात्रा हा महाराष्टÑातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याची आणि भावनिक नाते सांगणारी यात्रा आहे. या यात्रेला मोठी परंपरा आणि धार्मिक, पारंपरिक महत्व असल्यामुळे भाविकांची गर्दी देखील मोठी असते. या भाविक प्रवाशांच्या भावनेचा विचार करून महामंडळाने राज्यभरातून बसेसचे नियोजन केले आहे. भाविकांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला घेऊन जाण्याची योजना आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रुप बुकींगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. ५० ते ६० प्रवाशी एकत्र मिळाल्यास त्यांना त्यांच्या गावातून घेऊन जाण्याची व्यवस्था महामंडळ करू शकणार आहे.पंढरपूर यात्रेसाठी औरंगाबाद प्रदेशाच्या १०९७, पुणे प्रदेशाच्या १०८०, नाशिक प्रदेशाच्या ६९२, अमरावती ५३३, मुंबई २१२ तर नागपूर प्रदेशाच्या ११० बसेसचे अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPublic Transportसार्वजनिक वाहतूक