शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील सर्व मार्गांवरील एस.टी. बसेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:37 IST

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. सकाळच्या सत्रात काही गाड्या सोडण्यात आल्या होत्या; परंतु दुपारनंतर वातावरण चिघळल्याने आणि महामंडळाच्या दोन बसेसच्या काचा फोडण्यात आल्यामुळे सर्वच मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली.

ठळक मुद्देदोन दिवसांत महामंडळाच्या १३ बसेसचे नुकसान, पुणे येथे शिवशाही बस पोहचू शकलेल्या नाहीत. बुधवारी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या

नाशिक बंद : दोन दिवसांत १३ गाड्यांचे नुकसाननाशिक : भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. सकाळच्या सत्रात काही गाड्या सोडण्यात आल्या होत्या; परंतु दुपारनंतर वातावरण चिघळल्याने आणि महामंडळाच्या दोन बसेसच्या काचा फोडण्यात आल्यामुळे सर्वच मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. दरम्यान, कालपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे दोन दिवसांत महामंडळाच्या १३ बसेसचे नुकसान झाले आहे. दर दोन तासांनी घटनेचा आढावा घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे एस.टी. महामंडळाचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले असून, अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. राज्यातील परिस्थिती चिघळल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील थांबविण्यात आल्या आहेत. कालपासून मुंबई, पुणे येथे शिवशाही बस पोहचू शकलेल्या नाहीत. बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे तर सकाळपासून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बससेवाही तूर्तास थांबविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकहून मालेगाव, मनमाड, सटाणा, लासलगाव, येवला, सिन्नर, पिंपळगाव, नांदगाव, पेठ, कळवण, इगतपुरीकडे होणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. नाशिकहून बस सोडली जात नाहीच, शिवाय कालपासून परतीच्या गाड्याही आहे तेथेच थांबविण्यात आल्या आहेत.राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बसेस पूर्णपणे रद्द करण्याचे कालच आदेशित केले होते. त्यामुळे राज्यातील सर्वच शिवशाही बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. लाल पिवळ्या गाड्या काही प्रमाणात सुरू ठेवण्यात आल्या; मात्र राज्यात अनेक ठिकाणी बसेसवर हल्ला झाल्याने या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच महाराष्टÑ बंदची हाक दिल्याने बुधवारी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मंगळवारी जिल्ह्यात ११ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तर बुधवारी दोन बसेस फोडण्यात आल्यामुळे नुकसानग्रस्त बसची संख्या १३ इतकी झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportराज्य परीवहन महामंडळ