शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

अखेरच्या दिवशी आठवले शाळेचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 20:46 IST

गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २३ रोजी संपल्याने विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. शालेय जीवनातील अखेरचा दिवस विद्यार्थी आणि पालकांनाही आठवला आणि सारेच शाळेच्या जुन्या आठवणीत रमले. कुठे गुरूजन आपल्या विद्यार्थ्यांना भेटायला परीक्षा केंद्रांवर आले होते, तर काही विद्यार्थिनींचे डोळे पाणावल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर दिसत होते.

ठळक मुद्देदहावीची परीक्षा : पाणावलेले डोळे अन् गळाभेटसारेच झाले भावूक, पालकही हळहळले

नाशिक : गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २३ रोजी संपल्याने विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. शालेय जीवनातील अखेरचा दिवस विद्यार्थी आणि पालकांनाही आठवला आणि सारेच शाळेच्या जुन्या आठवणीत रमले. कुठे गुरूजन आपल्या विद्यार्थ्यांना भेटायला परीक्षा केंद्रांवर आले होते, तर काही विद्यार्थिनींचे डोळे पाणावल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर दिसत होते.विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाला कलाटणी देणारी दहावीची परीक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीही तितकीच महत्त्वाची असते. गुरुवारी दहावीचा अखेरचा पेपर संपला आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना निकालासाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकीकडे दहावीची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा आनंद असताना दुसरीकडे शालेय आयुष्याचा उंबरठा ओलांडल्याचे दु:खदेखील व्यक्त करण्यात आले. विशेषत: पालक अधिक भावुक झाले होते. डोळ्यासमोर पहिलीत घातलेली मुले आज दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडल्याने त्यांच्यासमोर आपल्या पाल्याचा शालेय जीवनातील पटच उभा राहिला.शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते. परीक्षा संपून विद्यार्थी बाहेर येताच विद्यार्थी शिक्षकांपुढे झुकले आणि चरणस्पर्श करीत त्यांचा निरोप घेतला. या भावुकप्रसंगी अनेक शिक्षिकांचे डोळेदेखील पाणावले, तर शाळेतील अनेक मैत्रिणींनी साश्रू नयनांनी एकमेकींना निरोप दिला. निरोपाचा हा भावनिक खेळ एकीकडे सुरू असताना जवळच्याच स्नॅक्स, ज्युस दुकानांसमोर छोटेखानी पार्टी करून काहींनी आनंदोत्सवदेखील साजरा केला.परीक्षा केंद्रातून विद्यार्थी बाहेर आल्यानंतर शाळेच्या आवारातच परीक्षेचा अखेरच्या दिवशी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त करीत एकमेकांचे अभिनंदन केले. पालकही मोठ्या संख्येने परीक्षा केंद्राबाहेर उभे होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही इतर पालकांबरोबर यापुढे भेट होणार की नाही म्हणून तेही एकमेकांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत हस्तांदोलन करीत गळाभेट घेत होते. शाळेच्या आवारात अशाप्रकारचा स्नेहसोहळा अनेक ठिकाणी दिसून आला. परीक्षेनंतरही बराच वेळ गर्दी असल्याने काही शाळांना ध्वनिक्षेपकावर शाळेचे आवार सोडण्याचे आवाहन करावे लागले.--कोट--शाळेला आणि गणवेशालाही अलविदागेल्या दहा वर्षांपासून आम्ही शाळेचा गणवेश परिधान करीत होतो. आज या गणवेशाचादेखील अखेरचा दिवस आहे. शाळा सुटली, गणवेशही सुटला, उद्यापासून शाळेचा गणवेश परिधान करता येणार नाही. परंतु शाळेची आठवण म्हणून गणवेश जपून ठेवणार आहे.- साक्षी सोनवणे, विद्यार्थिनी

 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा