शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

स्वच्छ अभियानासाठी जिल्हा परिषदेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:39 IST

केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ग्रामस्थांनी आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेची धावाधाव सुरू असून, प्रतिक्रियांमध्ये आघाडी राखण्यासाठी कुटुंब संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देविशेष अभियान : घराघरातून अभिप्रायासाठी यंत्रणा सक्रिय सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मोहीम

नाशिक : केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ग्रामस्थांनी आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेची धावाधाव सुरू असून, प्रतिक्रियांमध्ये आघाडी राखण्यासाठी कुटुंब संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.जिल्हा परिषदेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. सदर उपक्रमांमुळे सद्यस्थितीत नाशिक राज्यात आघाडीवर असले तरी ही आघाडी टिकविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्र म राबविण्यात येत असून केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या तपासणी समितीकडून ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात येत आहे.स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यासाठी व आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. ‘एसएसजी१८’ या अ‍ॅपद्वारा जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीणविषयी प्रतिक्रि या नोंदविण्याचे आवाहन डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.देशभरात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात विविध प्रकारे उपक्रम राबविण्यात येत असून, यामध्ये होत असलेल्या कामांची केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडून तपासणी करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानास गती मिळावी व स्वच्छ सर्वेक्षणबाबत जनजागृती व्हावी यासाठी २४ आॅगस्ट रोजी मोहीम स्वरूपात कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा तसेच तालुका स्तरावरील खातेप्रमुख, प्रत्येक गावासाठी नियुक्त केलेले संपर्क अधिकारी, गाव स्तरावरील सर्व विभागांचे कर्मचारी यांचा सहभाग असणार आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मोहीम राबविण्याबाबत जिल्हा परिषदेने परिपत्रक काढले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद