शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

स्वच्छ अभियानासाठी जिल्हा परिषदेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:39 IST

केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ग्रामस्थांनी आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेची धावाधाव सुरू असून, प्रतिक्रियांमध्ये आघाडी राखण्यासाठी कुटुंब संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देविशेष अभियान : घराघरातून अभिप्रायासाठी यंत्रणा सक्रिय सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मोहीम

नाशिक : केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ग्रामस्थांनी आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेची धावाधाव सुरू असून, प्रतिक्रियांमध्ये आघाडी राखण्यासाठी कुटुंब संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.जिल्हा परिषदेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. सदर उपक्रमांमुळे सद्यस्थितीत नाशिक राज्यात आघाडीवर असले तरी ही आघाडी टिकविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्र म राबविण्यात येत असून केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या तपासणी समितीकडून ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात येत आहे.स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यासाठी व आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. ‘एसएसजी१८’ या अ‍ॅपद्वारा जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीणविषयी प्रतिक्रि या नोंदविण्याचे आवाहन डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.देशभरात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात विविध प्रकारे उपक्रम राबविण्यात येत असून, यामध्ये होत असलेल्या कामांची केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडून तपासणी करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानास गती मिळावी व स्वच्छ सर्वेक्षणबाबत जनजागृती व्हावी यासाठी २४ आॅगस्ट रोजी मोहीम स्वरूपात कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा तसेच तालुका स्तरावरील खातेप्रमुख, प्रत्येक गावासाठी नियुक्त केलेले संपर्क अधिकारी, गाव स्तरावरील सर्व विभागांचे कर्मचारी यांचा सहभाग असणार आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मोहीम राबविण्याबाबत जिल्हा परिषदेने परिपत्रक काढले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद