नाशिाक : वाघदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्यामुळे मनमाडसह अन्य गावांना येत्या दोन दिवसांत पाणी पोहोचणार आहे. रविवारी सोडण्यात आलेले पाणी उद्यापर्यंत धरणात पोहोचणार असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण संपूर्णपणे कोरठेठाक पडल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मनमाड मुख्याधिकाऱ्यांनी पाणी नियोजन वेळेत न केल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे नियोजन करून पालखेड डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यास मान्यता दिल्यानंतर आता पालखेडमधून पाणी सोडण्यात आले आहे.पालखेड धरणातून लाभक्षेत्रातील बिगर सिंचनासाठी मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, येवला नगरपरिषद, येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना विंचूर, लासलगाव, आंगेगाव या संस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून ४८० दलघफू पाणी दि. २ ते १० जून या कालावधीत आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन कालावधीत पाण्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष दक्षतादेखील घेण्यात आली आह े.
पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 16:21 IST
नाशिाक : वाघदर्डी धरण कोरडेठाक पडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ४८० दशलक्ष घनफूट ...
पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तन
ठळक मुद्देअनधिकृत उपसा बंद : दोन दिवसांत पोहोचणार पाणी