शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये उंदरांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:21 IST

मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच पंचवटी एक्स्प्रेसमध्येदेखील उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उंदीर चावल्यामुळे रेल्वे डब्यात उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देप्रवाशाला चावा : प्लॅटफॉर्मवरही उंदरांचा उपद्रवउंदरांच्या भीतीने झोप घेणारे प्रवासीही धास्तावले

नाशिक : मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच पंचवटी एक्स्प्रेसमध्येदेखील उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उंदीर चावल्यामुळे रेल्वे डब्यात उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्लॅटफॉर्मवर उंदीर असल्याचा प्रवाशांचा अनुभव असला तरी आता डब्यात उंदीर शिरल्याने प्रवाशांची झोप नक्कीच उडाली आहे.मनमाड स्थानकातून निघालेल्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांचा समावेश असतो. रोज सकाळी मुंबई गाठणे आणि रात्री पुन्हा पंचवटीनेच घरी परतणे अशी कसरत चाकरमान्यांना करावी लागते. त्यामुळे सकाळी प्रवास करताना बहुतेक प्रवासी हे नाशिकरोड ते इगतपुरी, कल्याणपर्यंत थोडीशी झोप घेण्याचा प्रयत्न करतात. शुक्रवारी पंचवटी एक्स्प्रेसने नाशिकरोड स्थानक सोडल्यानंतर मनमाडचे दैनंदिन प्रवासी रशीद शेख हे झोपलेले असताना त्यांच्या पायाला उंदराने चावा घेतला. ही बाब एका महिलेने इतर प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उंदीर हाकलण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागली. सैरावैरा धावणाºया उंदरामुळे काहीकाळ हास्यकल्लोळही उडाला, मात्र शेख यांच्या पायातून रक्त निघेपर्यंत उंदराने पाय कुरतडल्याचे दिसून आले. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले.नाशिकहून मुंबईकडे जाणाºया पंचवटी तसेच गोदावरी एक्स्प्रेसमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उंदीर आढळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कित्येकदा उंदीर प्रवाशांच्या बॅगांमध्येदेखील शिरले आहेत. त्यामुळे उंदरांना हाकलण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. उंदरांच्या भीतीने आता रेल्वेचा प्रवासदेखील आरामदायी राहिला नसल्याचे बोलले जात असून, उंदरांच्या भीतीने झोप घेणारे प्रवासीही धास्तावले आहेत.रेल्वेस्थानक आणि रेल्वे डब्यातील स्वच्छतेबाबत अनेकदा केंद्रीय पातळीवर कंत्राट दिले जाते. परंतु सदर कंत्राट केवळ केरकचरा आणि प्लॅटफॉर्म धुण्यापुरतेच मर्यादित असते. स्थानकावरील उंदीर मारण्यासाठी कोणतेही कंत्राट काढले जात नसल्यामुळे रेल्वेस्थानकावर उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकरोड स्थानकावरील प्रवाशांनी येथील स्टेशन मास्तरकडे उंदरांच्या उपद्रवाबद्दल तक्रार केली होती. परंतु उंदीर घालविण्यासाठीची उपायोजनाच नसल्याने या तक्रारींचा काहीही उपयोग झाला नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकRailway Passengerरेल्वे प्रवासी