शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

जिल्हा परिषदेचा ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 20:28 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्विकारले असून शासनाकडे आणखी ३० हजार घलकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रूपयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पुर्ण करण्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी केला आहे.

ठळक मुद्दे४५० कोटींची मागणी : २०२२ चे उद्दिष्ट २०१९ मध्येच करणार पुर्ण योजनेत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्र मांकावर

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्विकारले असून शासनाकडे आणखी ३० हजार घलकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रूपयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पुर्ण करण्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी केला आहे.नाशिक जिल्ह्याने घरकुल कामांमध्ये मोठी झेप घेतली असून चार महिन्यांपूर्वी घरकुल योजनेत देशात २२५ व्या क्रमांकावर असलेला नाशिक जिल्हा आता ४० व्या क्रमांकावर आला आहे. तर राज्यात पल्यिा क्रमांकावर आहे. जिल्ह्यात घरकुल बांधकामाची प्रगती पाहाता यापेक्षा अधिक घरकुलांची कामे होऊ शकतात याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा परिषदेने एकुण ३० हजार घरकुलांचे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरु असून या योजनेत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्र मांकावर आहे. जिल्ह्यात घरकुल बांधकामाची प्रगती पाहता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी अतिरिक्त ३० हजार घरकुलांचे उदिष्ट जिल्ह्यास उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.नाशिक जिल्ह्याकरिता सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेसाठी एकूण २९,०८२ घरकुलांचे उदिष्ट मिळाले आहे. त्यापैकी २०१६-१७, २०१७-१८ या वर्षातील२३६१० उद्दिष्टापैकी २०७८८ (८८ टक्के) घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्विरत २८२२ घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१८-१९ मधील ५४४३ घरकुल कामांपैकी ९३ कामे पूर्ण झाली असून आॅगस्ट अखेर सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार डॉ. गिते यांनी केला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शितल सांगळे तसेच अन्य पदाधिकारी व सदस्यांनीही अनुकुलता दर्शविली असून त्यांच्या सहकार्याने सदरचे उदिष्ट येत्या तीन मिहन्यात पूर्ण करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचेही गिते यांनी सांगितले.घरकुल योजनेबाबत वेळोवेळी आढावा बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात येत आहे. गट विकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या बैठकीत सर्वांनी अतिरिक्त उदिष्ट पूर्ण करण्याची तयारी दर्शविल्याने ३० हजार अतिरिक्त उदिष्टाची मागणी करण्यात आली आहे. यासाठी ४५० ोटी रु पयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे अतिरिक्त मागणी केल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद