शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

पंचवटी एक्सप्रेस फिरली माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 14:35 IST

नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपुर्णपणे ठप्प झाली असून त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर ...

ठळक मुद्देतीन गाड्या रद्द : दुरांतो एक्सप्रेस इगतपुरीत अडकली

नाशिक: मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपुर्णपणे ठप्प झाली असून त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर देखील झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी नाशिकरोड आणि इगतपुरी स्थानकात अडकून पडले आहेत. दरम्यान, दुरांतो आणि मंगला एक्सप्रेस या गाड्या इगतपुरी स्थानकातच थांबविण्यात आल्या आहे तर पंचवटी एक्सप्रेसला इगतपुरीहून पुन्हा मनमाडला पाठविण्यात आले.सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीला प्रचंड फटका बसला असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिकहून मुंबईला जाणारी पंचवटी एक्स्प्रेस गाडी मनमाडून नियोजित वेळेत मुंबईकडे सोडण्यात आली मात्र पावसाचा जोर वाढल्याने इगतपुरीतून गाडीला पुन्हा मनमाडकडे पाठविण्यात आली. इगतपुरीत पोहचलेल्या दुरांतो आणि मंगला एक्सप्रेस या गाड्यांना पाच तास इगतपुरी स्थानकातच पुढे जाण्यासाठीची वाट पाहवी लागली मात्र या मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे या गाड्यांना इतगतुरीत थांबून ठेवण्यात आले आहे. नाशिक आणि मनमाडकरांसाठी महत्वाची असलेल्या पंचवटी एक्सप्रेसलाही इगतपुरीतून पुन्हा मनमाडकडे पाठविण्यात आले.विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून असंख्य प्रवासी हे गाड्यांमध्ये आणि रेल्वेस्थानकातच अडकून पडले आहेत. उत्तरेतून आलेल्या रेल्वे या इगतपुरीत थांबून ठेवण्यात आल्याने प्रवाशांना संपुर्ण दिवस गाडीतच काढावा लागला. राज्यराणी, सेवाग्राम तसेच गोदावरी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस