शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

निव्वळ चर्चा नव्हे मानसिकता हवी... (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 22:36 IST

ऊर्जा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट दिली आणि अखेरच्या घटका मोजणाऱ्या प्रकल्पाच्या ऊर्जितावस्थेसाठी ...

ऊर्जा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट दिली आणि अखेरच्या घटका मोजणाऱ्या प्रकल्पाच्या ऊर्जितावस्थेसाठी सकारात्मक भूमिकाही दर्शविली. गत सरकारच्या काळातही तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी यापेक्षा वेगळी भूमिका मांडली नव्हती. परंतु त्यानंतर त्यांनी सातत्याने सदर प्रकल्प अव्यवहार्य असल्याची नकारात्मक बाब कायम पुढे केली. या प्रकल्पाचे विस्तारीकरण करणे म्हणजे निधीचा अपव्यय असल्याचे चित्र निर्माण केले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सदर प्रश्न अनेकदा गेला, परंतु त्यांनी कधीही या प्रकल्पाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली नाही. त्यामुळे प्रकल्प सुरू ठेवण्याबाबत राज्यकर्त्यांची मानसिकता नसल्याची चर्चा ते थोपवू शकले नाही. अशी वेळ आताच्या महाविकास आघाडीवर येऊ नये, अशी अपेक्षा कामगार आणि गावकऱ्यांचीही नक्कीच असणार.एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद करून नागपूरमध्ये सदर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे धोरण घेतलेल्या फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत नकारात्मक विधाने करून या प्रकल्पाविषयी नेहमीच अनिश्चितता कायम ठेवली. तत्कालीन ऊर्जामंत्र्यांची प्रस्तावित ६६० मेगावॉट प्रकल्पाविषयी नकारात्मक भूमिका लपून राहिली नव्हती शिवाय एकलहरेची वीजनिर्मिती राज्य शासनाला परवडत नसल्याचे सांगून प्रकल्प अव्यहार्य ठरविण्याचे गत सरकारचे मनसुबेही उघड झाले. पक्षाची भूमिकाच म्हटल्यावर स्थानिक आमदारांनी त्याकाळी याबाबत कोणताही पाठपुरावा केला नाही. तोही रोष नागरिकांमध्ये आहेच. परिणामी नागरिकांना एकत्र येत एकलहरे प्रकल्प बचावासाठी कृती समिती स्थापन करावी लागली. गेल्या चार वर्षांत नागरिकांचा एकाकी लढा सुरू असतानाच ऊर्जा राज्यमंत्री तटकरे यांनी दिलेल्या भेटीमुळे प्रकल्पाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.१९७० मध्ये एकलहरे येथे नाशिक थर्मल पार्वर अर्थात औष्णिक वीजनिर्मिती केंद्र उभे राहिले आणि राज्यातील आपली उपयुक्तता या केंद्राने सिद्ध केली. आजवर वीजनिर्मितीचे शिखर चार वेळा सर केलेल्या या प्रकल्पाने महाराष्टÑाचाही लौकिक वाढविला मात्र सध्या हा प्रकल्प अखेरची घटका मोजत आहे. एकलहरे येथे सध्या दोनच संच कार्यान्वित असून, हे संच कधीही बंद होऊ शकतील, अशी या प्रकल्पाची अवस्था आहे. ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या दौºयाने एक आश्वासक ऊर्जा नाशिककरांमध्ये निर्माण झाली असली तरी याबाबत राज्य शासनाची मानसिकता काय असेल यावर त्यांच्या दौºयाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.दुर्लक्ष की दिशाभूल....भाजप सरकारच्या काळात लोकप्रतिनिधी, नागरिक आणि आणि कामगारांचे सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाल्यानंतरही एकलहरे औष्णिक केंद्राला ऊर्जा देण्याची भाजपची मानसिकता नसल्याचे बोलले गेले. आता महाआघाडी सरकारच्या ऊर्जा राज्यमंत्र्यांनी भेट दिल्याने पुन्हा अपेक्षा पल्लवित झाल्या असणार. परंतु प्रकल्प पुन्हा सुरू होणे शक्य आहे का? याविषयीची एक बाब नुकतीच घडून गेलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात औष्णिक केंद्रे खर्चिक असल्याने असे केंद्र बंद करून सोलर प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही बाब दुर्लक्षित केली जात आहे की दिशाभूल हे आता काळच ठरवेल.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज