शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 15:24 IST

नाशिक : देशात कोरोना महामारी असतानाही केंद्रातील भाजप सरकार बेफिकिरीने वागल्यामुळेच देशात कोरोनाचा उद्रेक झाला. केंद्र सरकार याबाबत कुठेही ...

ठळक मुद्देबाळासाहेब थोरात: भाजपा महाराष्ट्रद्वेषी असल्याचाही आरोप

नाशिक: देशात कोरोना महामारी असतानाही केंद्रातील भाजप सरकार बेफिकिरीने वागल्यामुळेच देशात कोरोनाचा उद्रेक झाला. केंद्र सरकार याबाबत कुठेही गंभीर दिसले नाही त्यामुळे कोरोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. गंगेच्या पात्रात शव वाहत असल्याचे पाप हे मोदी सरकारचेच असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.केंद्र सरकारला सात वर्ष झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसच्या वतीने रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने नाशिकमध्येकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत थोरात यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली. कोरोनाच्या संकट काळात केंद्र सरकार कुठेही गंभीर दिसले नाही त्यामुळे देशात कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली असे थोरात म्हणाले. गेल्या सात वर्षाच्या काळात मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली ती पूर्ण करण्यात आलेली नाही. पंधरा लाख रूपये खात्यावर जमा करू, परदेशातील काळा पैसा भारतात आणू या आश्वासनांचे काय झाले असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला.देशातील महागाईने जनता त्रस्त आहे. पेट्रोल शंभरीपार झाले आहे तर सिलिंडरचे भाव नऊशेपर्यंत पोहोचले आहेत. खाद्य तेलही २०० रूपयांवर पोहोचले आहे. मोदी सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला असल्याचे थोरात यांनी सांगितले. कामगार विरोधी कायद्यात कामगारांचा नाही तर मालकांचा विचार करण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न केला गेला, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. कोरोनाच्या संकटाची अगोदरच काळजी घ्यावी असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुचविले होते त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. थाळ्या-टाळ्या वाजविणे, दिवे लावणे हा उपाय नव्हताच असेही थोरात म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेस