शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

खोटे दाखले देणाऱ्या ग्रामसेविका निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:55 IST

एका राजकीय गटाला फायदा मिळण्याच्या हेतूने शौचालयाचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील ग्रामसेविका वर्षा वाल्मीकी घिसाडी यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषदेने केली आहे. याच प्रकरणी इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्याची चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेने दिल्यानंतर या प्रकरणी उपोषणास बसलेल्या सुमन गातवे यांनी उपोषणाची सांगता केली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव मोर : गटविकास अधिकाऱ्यांची चौकशीगटविकास अधिकाºयांची चौकशी सुरू

नाशिक : एका राजकीय गटाला फायदा मिळण्याच्या हेतूने शौचालयाचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील ग्रामसेविका वर्षा वाल्मीकी घिसाडी यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषदेने केली आहे. याच प्रकरणी इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्याची चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा परिषदेने दिल्यानंतर या प्रकरणी उपोषणास बसलेल्या सुमन गातवे यांनी उपोषणाची सांगता केली आहे.इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत संख्याबळाचे राजकरण करण्यासाठी विरोधी गटाच्या सांगण्यावरून गटविकास अधिकारी किरण जाधव आणि ग्रामसेविका वर्षा वाल्मीकी यांनी संगनमत करून सत्ताधाऱ्याच्या तीन उमेदवारांना अपात्र ठरविल्यामुळे सत्ताधारी अल्पमतात आले आणि सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. याच अधिकाऱ्यानी यापूर्वी शौचालय असल्याचा आणि त्याचा वापर होत असल्याचा अहवाल शासनाला दिला होता; मात्र आता तीन महिन्यांनी याच अधिकाऱ्यानी संबंधितांना शौचालय नसल्याचा दावा केल्यामुळे निवडणुकीचे चित्र बदलल्याचे उपोषणकर्त्या गातव यांचे म्हणणे आहे.१८ नोव्हेंबर रोजी गातवे यांच्यासह तीन सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे विवाद अर्ज दाखल करून गटविकास अधिकारी किरण जाधव आणि ग्रामसेवक वर्षा घिसाडी यांची स्वाक्षरी दिलेला शौचालय नसल्याचा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्याकडे सादर केला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यानी घेतली तेव्हा सुमन युवराज गातवे, उमेश लालू बेंडकोळी आणि जीवन नामदेव गातवे यांनी संबंधित अधिकाऱ्यानीच आपणाला शौचालय असल्याचा दिलेला दाखल सादर केला. गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दिलेला विसंगत अहवाल पाहून जिल्हाधिकाऱ्यानी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश उभयतांना दिले होते. मात्र त्यांनी मुदतीत अहवाल सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी वरील तीनही सदस्यांना अपात्र ठरविल्यामुळे विरोधकांनी सरपंच, उपसरपंचांची निवडणूक जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद