शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

नवजात अर्भकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट : आरोग्यमंत्री दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 21:55 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी राज्यसरकार तसेच आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते़ यानंतर राज्यशासन व आरोग्य विभागाने सुधारणा केल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट झाल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि़१४) दिली़ जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत नवजात बालकांच्या एसएनसीयु विभागाची पाहणी केल्यानंतर येथील कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले़ दरम्यान, आदिवासी भागातील बालमृत्यु रोखण्यासाठी कळवण आणि त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये एसएनसीयु विभाग सुरू करण्यास मंजुरी दिल्याचेही सावंत यांनी सांगितले़

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयास आरोग्यमंत्र्यांची अचानक भेट : एसएनसीयू विभागाची पाहाणी

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी राज्यसरकार तसेच आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते़ यानंतर राज्यशासन व आरोग्य विभागाने सुधारणा केल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट झाल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि़१४) दिली़ जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत नवजात बालकांच्या एसएनसीयु विभागाची पाहणी केल्यानंतर येथील कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले़ दरम्यान, आदिवासी भागातील बालमृत्यु रोखण्यासाठी कळवण आणि त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये एसएनसीयु विभाग सुरू करण्यास मंजुरी दिल्याचेही सावंत यांनी सांगितले़

जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना गतवर्षी आॅगस्टमध्ये घडली होती़ या घटनेस माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती़ याची दखल घेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुगणालयास भेट विविध उपाययोजनांची अंमलबजवणी करण्याचे आदेश दिले होते़ तसेच जिल्हा रुग्णालयासाठी तातडीने सोयीसुविधाही पुरविण्यात आल्याने १५ टक्के नवजात बालकांचा मृत्युदर ८़३ टक्क्यांवर आला आहे़ राज्यातील एकमेव माता-नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयु) नाशिकमध्ये तयार होत असून यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित डॉक्टरांसह, परिचारिका तसेच तज्ज्ञ न्युन्युटॉलॉजीस्टचा कर्मचारीवर्गही मंजूर करण्यात आली आहे़

नवजात अर्भकांवरील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव याठिकाणी एसएनसीयु कक्ष असून या कक्षांप्रमाणेच त्र्यंबकेश्वर व कळवण या ठिकाणीही १२ बेडचा स्वतंत्र एसएनसीयु कक्ष येत्या सहा महिन्यात सुरू होणार आहे. कुपोषित माता व कुपोषित बालके यांच्यासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये मॅम-सॅम युनिट सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर यांचा समावेश आहे़ याबरोबरच माताबालक केंद्र तयार केले जाणार असून गर्भवती मातांसाठीचा अतिदक्षता विभाग स्वतंत्र असल्याचेही सावंत यांनी सांगितले़

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ़सुरेश जगदाळे यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली़ यावेळी डॉ़पंकज गाजरे, डॉ़ कृष्णा पवार, डॉ़नरेंद्र बागूल, डॉ़सुप्रिया गोरे उपस्थित होते़

कुपोषणात ३० टक्क्यांनी घट

पंचसुत्री उपाययोजना व लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे पालघरमधील कुपोषण ३० टक्कयांनी कमी करण्यात यश आले आहे़ त्यामुळे नाशिक आणि मेळघाट या ठिकाणीही हाच पॅटर्न राबविण्यात येणार आहे़- डॉ़ दीपक सावंत, आरोग्यमंत्री़

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य