शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नवजात अर्भकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट : आरोग्यमंत्री दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 21:55 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी राज्यसरकार तसेच आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते़ यानंतर राज्यशासन व आरोग्य विभागाने सुधारणा केल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट झाल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि़१४) दिली़ जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत नवजात बालकांच्या एसएनसीयु विभागाची पाहणी केल्यानंतर येथील कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले़ दरम्यान, आदिवासी भागातील बालमृत्यु रोखण्यासाठी कळवण आणि त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये एसएनसीयु विभाग सुरू करण्यास मंजुरी दिल्याचेही सावंत यांनी सांगितले़

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयास आरोग्यमंत्र्यांची अचानक भेट : एसएनसीयू विभागाची पाहाणी

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी राज्यसरकार तसेच आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते़ यानंतर राज्यशासन व आरोग्य विभागाने सुधारणा केल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट झाल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि़१४) दिली़ जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत नवजात बालकांच्या एसएनसीयु विभागाची पाहणी केल्यानंतर येथील कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले़ दरम्यान, आदिवासी भागातील बालमृत्यु रोखण्यासाठी कळवण आणि त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये एसएनसीयु विभाग सुरू करण्यास मंजुरी दिल्याचेही सावंत यांनी सांगितले़

जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना गतवर्षी आॅगस्टमध्ये घडली होती़ या घटनेस माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती़ याची दखल घेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुगणालयास भेट विविध उपाययोजनांची अंमलबजवणी करण्याचे आदेश दिले होते़ तसेच जिल्हा रुग्णालयासाठी तातडीने सोयीसुविधाही पुरविण्यात आल्याने १५ टक्के नवजात बालकांचा मृत्युदर ८़३ टक्क्यांवर आला आहे़ राज्यातील एकमेव माता-नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयु) नाशिकमध्ये तयार होत असून यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित डॉक्टरांसह, परिचारिका तसेच तज्ज्ञ न्युन्युटॉलॉजीस्टचा कर्मचारीवर्गही मंजूर करण्यात आली आहे़

नवजात अर्भकांवरील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव याठिकाणी एसएनसीयु कक्ष असून या कक्षांप्रमाणेच त्र्यंबकेश्वर व कळवण या ठिकाणीही १२ बेडचा स्वतंत्र एसएनसीयु कक्ष येत्या सहा महिन्यात सुरू होणार आहे. कुपोषित माता व कुपोषित बालके यांच्यासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये मॅम-सॅम युनिट सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर यांचा समावेश आहे़ याबरोबरच माताबालक केंद्र तयार केले जाणार असून गर्भवती मातांसाठीचा अतिदक्षता विभाग स्वतंत्र असल्याचेही सावंत यांनी सांगितले़

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ़सुरेश जगदाळे यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली़ यावेळी डॉ़पंकज गाजरे, डॉ़ कृष्णा पवार, डॉ़नरेंद्र बागूल, डॉ़सुप्रिया गोरे उपस्थित होते़

कुपोषणात ३० टक्क्यांनी घट

पंचसुत्री उपाययोजना व लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे पालघरमधील कुपोषण ३० टक्कयांनी कमी करण्यात यश आले आहे़ त्यामुळे नाशिक आणि मेळघाट या ठिकाणीही हाच पॅटर्न राबविण्यात येणार आहे़- डॉ़ दीपक सावंत, आरोग्यमंत्री़

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य