शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जिल्ह्यातील धरणांमधील विसर्ग घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 16:48 IST

नाशिक : गेल्या शनिवारपासून तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीने धोक्याची ...

ठळक मुद्देपूरपरिस्थिती कायम : पावसाची तीव्रताही कमी

नाशिक : गेल्या शनिवारपासून तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. या महापुरानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पावसानेही काहीशी विश्रांती घेतल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणांमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने पुराची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान, पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची तीव्रता कमी होत असताना कळवण आणि सुरगाण्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे.जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिकसह अन्य तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणात ९४ टक्के पाणी साठा झाल्याने दीड लाख क्यूसेक इतके पाणी सोडण्यात आले होते. नांदूरमधमेश्वर धरणामधूनदेखील दीड लाख क्यूसेकच्या जवळपास पाणी सोडावे लागले होते त्यामुळे सायखेडा आणि चांदोरीला पुराचा चांगलाच फटका बसला. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली होती. सुमारे अडीचशे कुटुंबीयांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले, तर अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.शनिवार (दि.३) आणि रविवार (दि.४) या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने धरणे आणि नद्यांची पातळीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने पूरपरिस्थितीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. 

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊस