शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पडझड झालेल्या घरांची मिळेना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:59 IST

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच ...

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. या नुकसानीचे पंचनामे होऊन आता सहा महिन्यांचा कलावधी उलटूनही पडझड झालेल्या काही घरमालकांना अजूनही नुकसानभरपाई मिळू शकलेली नाही. त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.यंदा धरणक्षेत्रात झालेला पाऊस आणि जिल्ह्यात सर्वदूर कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर आला होता. या पुराचा सर्वाधिक फटका नाशिक शहरासह चांदोरी आणि सायखेडा या गावांना बसला तसेच बागलाण, पेठ, मालेगाव, निफाडमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. पुराच्या पाण्यात काठांवरील घरे तसेच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांमधील आणि दुकानदारांचे साहित्य वाहून गेले आहे. शेतांमध्येदेखील काही फुटांपर्यंत पाण्याचे तळे साचल्यामुळे पिकांचेदेखील नुकसान झाले होते.या नुकसाचीने पंचनामे पूर्ण करण्यात येऊनही सर्वच नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. पीक नुकसानीची भरपाई प्राधान्याने देण्यात आली. संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने त्यांनादेखील तातडीची दिली जाणारी मदत देण्यात आली आहे. मात्र पडझड झालेल्या घरांसाठीची मदत लांबणीवर पडली आहे. पंचनाम्यानंतर संबंधित घराला मान्यता आहे किंवा नाही याबरोबरच संबंधित घरमालकाला धोकादायक घर म्हणून नोटीस बजविण्यात आली होती का? या मुद्द्यावर नुकसानभरपाई रखडली आहे.पंचनामे आणि प्रांतांनी नुकसानीस पात्र ठरवूनही आता, मात्र अधिकृत अनधिकृतच्या मुद्द्यावर सुमारे ३५ लाखांची भरपाई अजूनही नुकसाग्रस्तांनी मिळू शकलेली नाही.पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १६ पथकांनी अंशत: आणि पूर्णत: पडलेल्या ९६४ घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले होते. घरांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागांतही अशा प्रकारचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुरामुळे ज्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले त्यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेल्या मदतीचे सुमारे ५१४ कोटींचे वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र ज्यांचे घरे वाहून गेली त्यातील अनेक बाधित अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीriverनदी