शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पडझड झालेल्या घरांची मिळेना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:59 IST

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच ...

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. या नुकसानीचे पंचनामे होऊन आता सहा महिन्यांचा कलावधी उलटूनही पडझड झालेल्या काही घरमालकांना अजूनही नुकसानभरपाई मिळू शकलेली नाही. त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.यंदा धरणक्षेत्रात झालेला पाऊस आणि जिल्ह्यात सर्वदूर कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर आला होता. या पुराचा सर्वाधिक फटका नाशिक शहरासह चांदोरी आणि सायखेडा या गावांना बसला तसेच बागलाण, पेठ, मालेगाव, निफाडमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. पुराच्या पाण्यात काठांवरील घरे तसेच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांमधील आणि दुकानदारांचे साहित्य वाहून गेले आहे. शेतांमध्येदेखील काही फुटांपर्यंत पाण्याचे तळे साचल्यामुळे पिकांचेदेखील नुकसान झाले होते.या नुकसाचीने पंचनामे पूर्ण करण्यात येऊनही सर्वच नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. पीक नुकसानीची भरपाई प्राधान्याने देण्यात आली. संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने त्यांनादेखील तातडीची दिली जाणारी मदत देण्यात आली आहे. मात्र पडझड झालेल्या घरांसाठीची मदत लांबणीवर पडली आहे. पंचनाम्यानंतर संबंधित घराला मान्यता आहे किंवा नाही याबरोबरच संबंधित घरमालकाला धोकादायक घर म्हणून नोटीस बजविण्यात आली होती का? या मुद्द्यावर नुकसानभरपाई रखडली आहे.पंचनामे आणि प्रांतांनी नुकसानीस पात्र ठरवूनही आता, मात्र अधिकृत अनधिकृतच्या मुद्द्यावर सुमारे ३५ लाखांची भरपाई अजूनही नुकसाग्रस्तांनी मिळू शकलेली नाही.पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १६ पथकांनी अंशत: आणि पूर्णत: पडलेल्या ९६४ घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले होते. घरांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागांतही अशा प्रकारचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुरामुळे ज्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले त्यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेल्या मदतीचे सुमारे ५१४ कोटींचे वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र ज्यांचे घरे वाहून गेली त्यातील अनेक बाधित अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीriverनदी