शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सौभाग्य मधून उजळणार जिल्ह्यातील ५८ हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:28 IST

नाशिक: केंद्र सरकारच्या सहज बिजली  योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यतील जवळपास ५८ हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देडिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य१६ हजार कोटी रूपयांची तरतूद

नाशिक: केंद्र सरकारच्या सहज बिजली  योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यतील जवळपास ५८ हजार कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उदिठ्ये ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्रय रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉर्इंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्रय रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रूपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा सामान हप्त्यात भरावयाचे आहे. आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या देशभरातील ४ कोटी ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहचिवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली असून त्यासाठी १६ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. अतिदुर्गम भागातील घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. यातून रोजगारांच्या संधी वाढण्यासोबतच स्रियांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.नाशिक परिमंडळात कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे आणि मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता, सुनील पावडे यांच्या हस्ते नुकताच योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते सुरगाणा तालुक्यातील आदिवासीबहुल हनुमंतमाळ व सुभाषनगर येथील विद्युतीकरणापासून वंचित असलेल्या कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली. पहिल्यांदाच घरात वीज आल्याने लाभार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह व आनंद होता. यावेळी नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता अनंत झोले, सहाय्यक अभियंता एन. आर. भोर, व्ही. टी. वाझे यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.नाशिक जिल्ह्यातील ५८ हजार कुटुंबियांना सौभाग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. यातील दारिद्र्य रेषेखालील २५ हजार कुटुंबियांना विनाशुल्क तर दारिद्रय रेषेच्या वरील ३३ हजार कुटुंबियांना नाममात्र शुल्क भरून वीजजोडणी मिळविता येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण