शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

वर्षभरात एसटी ने दिली साडेचार कोटींची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 16:30 IST

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली आहे. अनेकविध मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून ...

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली ४ कोटी ४७ लाख ५३ हजार ४५६ एवढी अपघात नुकसानभरपाई

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली आहे. अनेकविध मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपासणी करण्यावरही महामंडळाला खर्च करावा लागत आहे.अगोदरच आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला रोजच्या उत्पन्नाची चिंता असताना खर्चातील वाढही तोट्यात भर घालणारी ठरत आहे. नाशिक विभागातून अपघातग्रस्त प्रवाशांना एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये २ कोटी ९४ लाख ८३ हजार ५६४ रुपये इतकी नुकसानभरपाई द्यावी लागली आहे. तर एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ४ कोटी ४७ लाख ५३ हजार ४५६ एवढी अपघात नुकसानभरपाई अदा करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील अपघात भरपाई महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीला आणखी बिघडविणारी असल्याने अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांना पुन्हा रिफ्रेशमेंट कोर्सला पाठविले जाते.वाहतूक नियमांचे पालन सर्वांचीच जबाबदारीसुरक्षित वाहन चालविणे ही चालकांची जबाबदारी आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला केवळ नुकसानभरपाईपोटी कोट्यावधी रुपये द्यावे लागतात. गेल्यावर्षी देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा पाहिला तर विभागाचे दोन दिवसाचे उत्पन्नही एवढे होत नाही. त्यापेक्षा जास्त नुकसानभरपाई द्यावी लागते. चालकांनी सुरक्षा तसेच वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल. ही जबादारी केवळ एस.टी. चालकांची नाही तर इतर चालक आणि विशेषत: दुचाकीस्वारांनी नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, नाशिक विभाग

टॅग्स :NashikनाशिकTravelप्रवास