शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

वर्षभरात एसटी ने दिली साडेचार कोटींची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 16:30 IST

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली आहे. अनेकविध मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून ...

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली ४ कोटी ४७ लाख ५३ हजार ४५६ एवढी अपघात नुकसानभरपाई

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली आहे. अनेकविध मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपासणी करण्यावरही महामंडळाला खर्च करावा लागत आहे.अगोदरच आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला रोजच्या उत्पन्नाची चिंता असताना खर्चातील वाढही तोट्यात भर घालणारी ठरत आहे. नाशिक विभागातून अपघातग्रस्त प्रवाशांना एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये २ कोटी ९४ लाख ८३ हजार ५६४ रुपये इतकी नुकसानभरपाई द्यावी लागली आहे. तर एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ४ कोटी ४७ लाख ५३ हजार ४५६ एवढी अपघात नुकसानभरपाई अदा करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील अपघात भरपाई महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीला आणखी बिघडविणारी असल्याने अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांना पुन्हा रिफ्रेशमेंट कोर्सला पाठविले जाते.वाहतूक नियमांचे पालन सर्वांचीच जबाबदारीसुरक्षित वाहन चालविणे ही चालकांची जबाबदारी आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला केवळ नुकसानभरपाईपोटी कोट्यावधी रुपये द्यावे लागतात. गेल्यावर्षी देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा पाहिला तर विभागाचे दोन दिवसाचे उत्पन्नही एवढे होत नाही. त्यापेक्षा जास्त नुकसानभरपाई द्यावी लागते. चालकांनी सुरक्षा तसेच वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल. ही जबादारी केवळ एस.टी. चालकांची नाही तर इतर चालक आणि विशेषत: दुचाकीस्वारांनी नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, नाशिक विभाग

टॅग्स :NashikनाशिकTravelप्रवास