शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

वर्षभरात एसटी ने दिली साडेचार कोटींची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 16:30 IST

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली आहे. अनेकविध मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून ...

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली ४ कोटी ४७ लाख ५३ हजार ४५६ एवढी अपघात नुकसानभरपाई

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपाई द्यावी लागली आहे. अनेकविध मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपासणी करण्यावरही महामंडळाला खर्च करावा लागत आहे.अगोदरच आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला रोजच्या उत्पन्नाची चिंता असताना खर्चातील वाढही तोट्यात भर घालणारी ठरत आहे. नाशिक विभागातून अपघातग्रस्त प्रवाशांना एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये २ कोटी ९४ लाख ८३ हजार ५६४ रुपये इतकी नुकसानभरपाई द्यावी लागली आहे. तर एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ४ कोटी ४७ लाख ५३ हजार ४५६ एवढी अपघात नुकसानभरपाई अदा करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील अपघात भरपाई महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीला आणखी बिघडविणारी असल्याने अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांना पुन्हा रिफ्रेशमेंट कोर्सला पाठविले जाते.वाहतूक नियमांचे पालन सर्वांचीच जबाबदारीसुरक्षित वाहन चालविणे ही चालकांची जबाबदारी आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला केवळ नुकसानभरपाईपोटी कोट्यावधी रुपये द्यावे लागतात. गेल्यावर्षी देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा पाहिला तर विभागाचे दोन दिवसाचे उत्पन्नही एवढे होत नाही. त्यापेक्षा जास्त नुकसानभरपाई द्यावी लागते. चालकांनी सुरक्षा तसेच वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल. ही जबादारी केवळ एस.टी. चालकांची नाही तर इतर चालक आणि विशेषत: दुचाकीस्वारांनी नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, नाशिक विभाग

टॅग्स :NashikनाशिकTravelप्रवास