शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचत आता नाशिककरांच्या हाती

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

जलसंकट : काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग

नाशिक : गंगापूर धरण समूहातून अखेर मराठवाड्यातील जायकवाडीसाठी एकूण १३५५ दलघफू पाणी सोडले जात असल्याने शिल्लक राहणाऱ्या ४६६६ दलघफू पाण्यापैकी नाशिक महापालिकेला जुलै २०१६ अखेर सुमारे ३४०० दलघफू पाणी पिण्यासाठी लागणार आहे. उर्वरित १२५० दलघफू पाण्याचा वापर औद्योगिक वसाहत, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, मेरी आदिंसह सिंचनासाठी कसा आणि किती करायचा याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट लक्षात घेता पाणीबचत आता नाशिककरांच्याच हाती असून, काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग दाटून येण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहातून अखेर जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयावर अखेर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य नाशिककरांवर आले. गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर दि. ४ नोव्हेंबर अखेर धरण समूहातून १३५५ पैकी ९३ दलघफू पाणी सोडण्यात आले, तर अजून १२६२ दलघफू पाणी सोडले जाणार आहे. दि. ४ नोव्हेंबर अखेर गंगापूर धरण समूहात ५७२८ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर एकूण ४६६६ दलघफू पाणीसाठा शिल्लक राहणार आहे आणि हाच पाणीसाठा आता जिल्हा प्रशासनाला जुलै-आॅगस्ट २०१६ पर्यंत पुरवायचा आहे. महापालिकेने सन २०१५-१६ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाकडे ४६०० दलघफू इतक्या पाणी आरक्षणाची मागणी नोंदविलेली आहे. मनपाकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन सुमारे ४१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. म्हणजे प्रतिदिन १४.५० दलघफू इतके पाणी उचलले जाते. परंतु महापालिकेने धरणातील पाण्याचा अत्यल्प साठा लक्षात घेता ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे.

पाणीकपात आता जुलैपर्यंत?

शहराची लोकसंख्या १८ लाखांहून अधिक असून, दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढतेच आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ४१0 ते ४२0 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. सिंहस्थ कुंभमेळा काळात महापालिकेने प्रतिदिन ४६0 दशलक्ष लिटर पाणी उचलले होते. नाशिक महापालिकेला जुलै २0१६ अखेरपर्यंत सुमारे ३४00 दलघफू पाणी लागणार आहे. सदर पाणी जपून वापरण्यासाठी महापालिकेला सध्या सुरू करण्यात आलेली २0 टक्के पाणीकपात जुलैपर्यंत कायम ठेवणे भाग पडणार आहे. सन २0१६ मध्ये उन्हाळा कडक गेल्यास बाष्पीभवनाचाही पाणीसाठय़ावर परिणाम होऊ शकतो. शिवाय जून-जुलैमध्येही पावसाने पाठ फिरविल्यास जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने आणि सुयोग्य वापर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्याचबरोबर महापालिकेलाही हॉटेल व्यावसायिक, सर्व्हिस स्टेशन, उद्यानांमधील पाणीपुरवठा यावर कठोर नियंत्रण आणावे लागणार आहे.