शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचत आता नाशिककरांच्या हाती

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

जलसंकट : काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग

नाशिक : गंगापूर धरण समूहातून अखेर मराठवाड्यातील जायकवाडीसाठी एकूण १३५५ दलघफू पाणी सोडले जात असल्याने शिल्लक राहणाऱ्या ४६६६ दलघफू पाण्यापैकी नाशिक महापालिकेला जुलै २०१६ अखेर सुमारे ३४०० दलघफू पाणी पिण्यासाठी लागणार आहे. उर्वरित १२५० दलघफू पाण्याचा वापर औद्योगिक वसाहत, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, मेरी आदिंसह सिंचनासाठी कसा आणि किती करायचा याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट लक्षात घेता पाणीबचत आता नाशिककरांच्याच हाती असून, काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग दाटून येण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहातून अखेर जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयावर अखेर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य नाशिककरांवर आले. गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर दि. ४ नोव्हेंबर अखेर धरण समूहातून १३५५ पैकी ९३ दलघफू पाणी सोडण्यात आले, तर अजून १२६२ दलघफू पाणी सोडले जाणार आहे. दि. ४ नोव्हेंबर अखेर गंगापूर धरण समूहात ५७२८ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर एकूण ४६६६ दलघफू पाणीसाठा शिल्लक राहणार आहे आणि हाच पाणीसाठा आता जिल्हा प्रशासनाला जुलै-आॅगस्ट २०१६ पर्यंत पुरवायचा आहे. महापालिकेने सन २०१५-१६ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाकडे ४६०० दलघफू इतक्या पाणी आरक्षणाची मागणी नोंदविलेली आहे. मनपाकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन सुमारे ४१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. म्हणजे प्रतिदिन १४.५० दलघफू इतके पाणी उचलले जाते. परंतु महापालिकेने धरणातील पाण्याचा अत्यल्प साठा लक्षात घेता ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे.

पाणीकपात आता जुलैपर्यंत?

शहराची लोकसंख्या १८ लाखांहून अधिक असून, दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढतेच आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ४१0 ते ४२0 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. सिंहस्थ कुंभमेळा काळात महापालिकेने प्रतिदिन ४६0 दशलक्ष लिटर पाणी उचलले होते. नाशिक महापालिकेला जुलै २0१६ अखेरपर्यंत सुमारे ३४00 दलघफू पाणी लागणार आहे. सदर पाणी जपून वापरण्यासाठी महापालिकेला सध्या सुरू करण्यात आलेली २0 टक्के पाणीकपात जुलैपर्यंत कायम ठेवणे भाग पडणार आहे. सन २0१६ मध्ये उन्हाळा कडक गेल्यास बाष्पीभवनाचाही पाणीसाठय़ावर परिणाम होऊ शकतो. शिवाय जून-जुलैमध्येही पावसाने पाठ फिरविल्यास जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने आणि सुयोग्य वापर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्याचबरोबर महापालिकेलाही हॉटेल व्यावसायिक, सर्व्हिस स्टेशन, उद्यानांमधील पाणीपुरवठा यावर कठोर नियंत्रण आणावे लागणार आहे.