शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाणीबचत आता नाशिककरांच्या हाती

By admin | Updated: November 4, 2015 23:57 IST

जलसंकट : काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग

नाशिक : गंगापूर धरण समूहातून अखेर मराठवाड्यातील जायकवाडीसाठी एकूण १३५५ दलघफू पाणी सोडले जात असल्याने शिल्लक राहणाऱ्या ४६६६ दलघफू पाण्यापैकी नाशिक महापालिकेला जुलै २०१६ अखेर सुमारे ३४०० दलघफू पाणी पिण्यासाठी लागणार आहे. उर्वरित १२५० दलघफू पाण्याचा वापर औद्योगिक वसाहत, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, मेरी आदिंसह सिंचनासाठी कसा आणि किती करायचा याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट लक्षात घेता पाणीबचत आता नाशिककरांच्याच हाती असून, काटकसर न केल्यास आणखी पाणीकपातीचे ढग दाटून येण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहातून अखेर जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयावर अखेर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य नाशिककरांवर आले. गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर दि. ४ नोव्हेंबर अखेर धरण समूहातून १३५५ पैकी ९३ दलघफू पाणी सोडण्यात आले, तर अजून १२६२ दलघफू पाणी सोडले जाणार आहे. दि. ४ नोव्हेंबर अखेर गंगापूर धरण समूहात ५७२८ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर एकूण ४६६६ दलघफू पाणीसाठा शिल्लक राहणार आहे आणि हाच पाणीसाठा आता जिल्हा प्रशासनाला जुलै-आॅगस्ट २०१६ पर्यंत पुरवायचा आहे. महापालिकेने सन २०१५-१६ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाकडे ४६०० दलघफू इतक्या पाणी आरक्षणाची मागणी नोंदविलेली आहे. मनपाकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन सुमारे ४१० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. म्हणजे प्रतिदिन १४.५० दलघफू इतके पाणी उचलले जाते. परंतु महापालिकेने धरणातील पाण्याचा अत्यल्प साठा लक्षात घेता ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे.

पाणीकपात आता जुलैपर्यंत?

शहराची लोकसंख्या १८ लाखांहून अधिक असून, दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढतेच आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ४१0 ते ४२0 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. सिंहस्थ कुंभमेळा काळात महापालिकेने प्रतिदिन ४६0 दशलक्ष लिटर पाणी उचलले होते. नाशिक महापालिकेला जुलै २0१६ अखेरपर्यंत सुमारे ३४00 दलघफू पाणी लागणार आहे. सदर पाणी जपून वापरण्यासाठी महापालिकेला सध्या सुरू करण्यात आलेली २0 टक्के पाणीकपात जुलैपर्यंत कायम ठेवणे भाग पडणार आहे. सन २0१६ मध्ये उन्हाळा कडक गेल्यास बाष्पीभवनाचाही पाणीसाठय़ावर परिणाम होऊ शकतो. शिवाय जून-जुलैमध्येही पावसाने पाठ फिरविल्यास जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने आणि सुयोग्य वापर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्याचबरोबर महापालिकेलाही हॉटेल व्यावसायिक, सर्व्हिस स्टेशन, उद्यानांमधील पाणीपुरवठा यावर कठोर नियंत्रण आणावे लागणार आहे.