शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

वाढत्या उकाड्याने नाशिककर घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:05 IST

गेल्या चार दिवसांत शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, अचानकपणे शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने शहराचे कमाल तापमान रविवारी (दि.२२) थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचले.

नाशिक : गेल्या चार दिवसांत शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, अचानकपणे शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने शहराचे कमाल तापमान रविवारी (दि.२२) थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचले.गुरुवारी (दि.१९) शहरात दुपारी पावसाच्या सरींचा वर्षाव झाला होता; मात्र त्यानंतर पुन्हा शहराचे वातावरण बदलले. शुक्रवारपासून शहरात ऊन तापायला सुरुवात झाली. गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३०.१ अंश इतके नोंदविले गेले होते. शुक्रवारी एक अंशाने तापमानात घट झाली, मात्र शनिवारपासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली असून, रविवारी पारा थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचला. त्यामुळे नागरिकांना रविवारी उन्हाची अधिकच तीव्रता जाणवली. सध्या भाद्रपद हा मराठी महिना सुरू असल्याने ऊन वाढण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. भाद्रपदचे ऊन मे महिन्यापेक्षाही अधिक प्रखर असल्याचे बोलले जाते. मराठी कालगणनेतील हा सहावा महिना मोजला जातो. रविवारी सकाळपासूनच शहरात प्रखर ऊन पडले होते. यामुळे वातावरणात सायंकाळपर्यंत कमालीचा उष्मा निर्माण झाला होता. नागरिकांना दिवसभर त्याचा त्रास सहन करावा लागला. पारा ३१ अंशांपार सरकला.सध्या कमाल तापमान वीस अंशांच्या जवळपास राहत होते. अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

 

टॅग्स :environmentपर्यावरणNashikनाशिक