शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

वाढत्या उकाड्याने नाशिककर घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:05 IST

गेल्या चार दिवसांत शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, अचानकपणे शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने शहराचे कमाल तापमान रविवारी (दि.२२) थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचले.

नाशिक : गेल्या चार दिवसांत शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, अचानकपणे शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने शहराचे कमाल तापमान रविवारी (दि.२२) थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचले.गुरुवारी (दि.१९) शहरात दुपारी पावसाच्या सरींचा वर्षाव झाला होता; मात्र त्यानंतर पुन्हा शहराचे वातावरण बदलले. शुक्रवारपासून शहरात ऊन तापायला सुरुवात झाली. गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३०.१ अंश इतके नोंदविले गेले होते. शुक्रवारी एक अंशाने तापमानात घट झाली, मात्र शनिवारपासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली असून, रविवारी पारा थेट ३१.२ अंशांपर्यंत पोहचला. त्यामुळे नागरिकांना रविवारी उन्हाची अधिकच तीव्रता जाणवली. सध्या भाद्रपद हा मराठी महिना सुरू असल्याने ऊन वाढण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. भाद्रपदचे ऊन मे महिन्यापेक्षाही अधिक प्रखर असल्याचे बोलले जाते. मराठी कालगणनेतील हा सहावा महिना मोजला जातो. रविवारी सकाळपासूनच शहरात प्रखर ऊन पडले होते. यामुळे वातावरणात सायंकाळपर्यंत कमालीचा उष्मा निर्माण झाला होता. नागरिकांना दिवसभर त्याचा त्रास सहन करावा लागला. पारा ३१ अंशांपार सरकला.सध्या कमाल तापमान वीस अंशांच्या जवळपास राहत होते. अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

 

टॅग्स :environmentपर्यावरणNashikनाशिक