शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

CoronaVirus News : ५० हजारांसाठी काहीपण! कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पैशांसाठी भाऊ आमनेसामने, बहिणींचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:10 IST

नाशिक - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ...

नाशिक - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यासाठी वारसांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो; परंतु कोरोना मयताच्या पश्चात ५० हजारांच्या आर्थिक मदतीसाठी दोन भाऊ इतकेच कशाला दोन्ही बहिणींकडूनही दावा करण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर पहिला अर्ज आलेल्यांना मदत देण्यात आली आहे. मात्र, आता या पैशांसाठी नात्यांमधील हे वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचण्याची वेळ आली आली आहे.

काेरोना रुग्णाच्या वारसाला मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या मदतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत, तर काहींनी दोन जिल्ह्यांमधून अर्ज दाखल केले आहेत. हा प्रकार उघड झालाच, शिवाय पैशांपायी नात्यांमधील लालसेचा संसर्गही समोर आला आहे.

या कारणांमुळे नाकारले अर्ज

१) एकाच कुटुंबातील दोन अर्ज आल्याने त्यातील नंतर दाखल झालेला अर्ज नाकारण्यात आला आहे.

२) पहिला अर्ज दाखल झाल्यानंतर काहींनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आपसात हे प्रकरण मिटवावे लागणार आहे.

३) काहींनी अपूर्ण आणि चुकीची माहिती भरली, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरले.

४) कोरोना मृत्यूचे सक्षम पुरावे नसल्याने

कोरेानामुळे झालेले मृत्यू : ८८८९

एकूण अर्ज : १४५४५

मंजूर अर्ज : ८९९४

नामंजूर अर्ज : ८५३

ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करताना अनेकांच्या चुका झाल्या आणि काही अर्ज इतर जिल्ह्यांच्या यादीमध्ये नोंदले गेले. काही अर्ज तर थेट बीएमएसच्या यादीत आले. असे अर्ज त्यांनी पुन्हा नाशिकला पाठविले आहेत. मात्र, अर्जातील त्रुटीमुळे अनेक घोळ झाले आहेत. मात्र, अर्जदारांना त्याची कल्पना नसल्याने त्यांच्याकडून आर्थिक मदतीबाबत विचारणा केली जाते. महापालिका स्तरावरदेखील अर्जांच्या बाबतीतील अनेक तक्रारी आहेत.

वारसांच्या वादामुळे निर्माण झालेला पेच हा कुटुंबीयांना आपसातच सामंजस्याने सोडवावा लागणार आहे. प्रथम आलेला अर्ज प्रशासन ग्राह्य धरत असल्यामुळे वारसांनी आपसात सामंजस्य दाखविणे अपेक्षित आहे; परंतु जर एकाच कुटुंबातील दोघांनीही अर्ज केले असतील आणि अशी बाब लक्षात आली, तर प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ शकते. शिवाय दिलेल्या रकमेची वसुली केली जाऊ शकते.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक