शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

नाशिक महापालिकेला हवे गंगापूरमधून अतिरिक्त पाणी

By श्याम बागुल | Updated: October 9, 2018 15:19 IST

यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने

ठळक मुद्देदारणावरही हक्क : अपुऱ्या जलसाठ्याने आरक्षण धोक्यात एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी

नाशिक : सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यापासून गायब झालेल्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात ८२ टक्केच पाऊस झाल्याने धरणांमध्ये ७८ टक्केच जलसाठा होऊ शकला आहे. अशातच पाच तालुक्यांमध्ये आॅक्टोबर महिन्यातच तीव्र टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर असलेले विविध आरक्षणांचा विचार करता, यंदा पाणी आरक्षण करताना प्रशासनाची दमछाक होणार असल्याचे चित्र दिसत असताना नाशिक महापालिकेने मात्र गंगापूर व दारणा धरणातून गत वेळपेक्षाही अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली आहे.यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने पिके काही प्रमाणात तगण्यास मदत झाली त्याचप्रमाणे जुलै व आॅगस्टच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन हातभार लागला. साधारणत: गंगापूर व दारणा धरण क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील पावसामुळे या दोन्ही धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा होऊ शकला, मात्र जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये यंदा ७८ टक्केच पाणी साठले आहे. आॅक्टोबर महिना सुरू झाल्याने आता परतीच्या पावसाची अपेक्षा संपुष्टात आली असून, पाऊस पडला तरी त्यातून धरणांच्या साठ्यात वाढ होण्याची शक्यता तशी कमीच आहे. अशा परिस्थितीत १५ आॅक्टोबर पूर्वी जिल्ह्यातील धरणातील पाण्याचे आरक्षण जाहीर करणे जिल्हा प्रशासनाला आवश्यक असून, त्या पार्श्वभूमीवर ५ आॅक्टोबर रोजी बोलविलेली पूर्र्वतयारीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या दौ-यामुळे होऊ शकली नाही. मात्र ज्या ज्या संस्था, पाणीपुरवठा योजना, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद यांना धरणाच्या पाण्याची आवश्यकता आहे त्यांच्याकडून पाणी मागणी अहवाल मागविण्यात आला आहे. त्यात नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून ५४०० दशलक्ष घनफूट व दारणा धरणातून ८०० दशलक्ष घनफूट असे एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. यंदा पर्जन्यमान कमी झालेले असून, जिल्ह्यात आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी ज्या पाणीपुरवठा योजनांसाठी धरणातून पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. त्यांनीदेखील वाढीव मागणी करण्यास सुरुवात केल्याने धरणाचे पाणी यंदा चांगलेच पेटण्याची परिस्थिती दिसू लागली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक