शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेला हवे गंगापूरमधून अतिरिक्त पाणी

By श्याम बागुल | Updated: October 9, 2018 15:19 IST

यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने

ठळक मुद्देदारणावरही हक्क : अपुऱ्या जलसाठ्याने आरक्षण धोक्यात एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी

नाशिक : सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यापासून गायब झालेल्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात ८२ टक्केच पाऊस झाल्याने धरणांमध्ये ७८ टक्केच जलसाठा होऊ शकला आहे. अशातच पाच तालुक्यांमध्ये आॅक्टोबर महिन्यातच तीव्र टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर असलेले विविध आरक्षणांचा विचार करता, यंदा पाणी आरक्षण करताना प्रशासनाची दमछाक होणार असल्याचे चित्र दिसत असताना नाशिक महापालिकेने मात्र गंगापूर व दारणा धरणातून गत वेळपेक्षाही अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली आहे.यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने पिके काही प्रमाणात तगण्यास मदत झाली त्याचप्रमाणे जुलै व आॅगस्टच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन हातभार लागला. साधारणत: गंगापूर व दारणा धरण क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील पावसामुळे या दोन्ही धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा होऊ शकला, मात्र जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये यंदा ७८ टक्केच पाणी साठले आहे. आॅक्टोबर महिना सुरू झाल्याने आता परतीच्या पावसाची अपेक्षा संपुष्टात आली असून, पाऊस पडला तरी त्यातून धरणांच्या साठ्यात वाढ होण्याची शक्यता तशी कमीच आहे. अशा परिस्थितीत १५ आॅक्टोबर पूर्वी जिल्ह्यातील धरणातील पाण्याचे आरक्षण जाहीर करणे जिल्हा प्रशासनाला आवश्यक असून, त्या पार्श्वभूमीवर ५ आॅक्टोबर रोजी बोलविलेली पूर्र्वतयारीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या दौ-यामुळे होऊ शकली नाही. मात्र ज्या ज्या संस्था, पाणीपुरवठा योजना, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद यांना धरणाच्या पाण्याची आवश्यकता आहे त्यांच्याकडून पाणी मागणी अहवाल मागविण्यात आला आहे. त्यात नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून ५४०० दशलक्ष घनफूट व दारणा धरणातून ८०० दशलक्ष घनफूट असे एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. यंदा पर्जन्यमान कमी झालेले असून, जिल्ह्यात आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी ज्या पाणीपुरवठा योजनांसाठी धरणातून पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. त्यांनीदेखील वाढीव मागणी करण्यास सुरुवात केल्याने धरणाचे पाणी यंदा चांगलेच पेटण्याची परिस्थिती दिसू लागली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक