शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेला हवे गंगापूरमधून अतिरिक्त पाणी

By श्याम बागुल | Updated: October 9, 2018 15:19 IST

यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने

ठळक मुद्देदारणावरही हक्क : अपुऱ्या जलसाठ्याने आरक्षण धोक्यात एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी

नाशिक : सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यापासून गायब झालेल्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात ८२ टक्केच पाऊस झाल्याने धरणांमध्ये ७८ टक्केच जलसाठा होऊ शकला आहे. अशातच पाच तालुक्यांमध्ये आॅक्टोबर महिन्यातच तीव्र टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर असलेले विविध आरक्षणांचा विचार करता, यंदा पाणी आरक्षण करताना प्रशासनाची दमछाक होणार असल्याचे चित्र दिसत असताना नाशिक महापालिकेने मात्र गंगापूर व दारणा धरणातून गत वेळपेक्षाही अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली आहे.यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने पिके काही प्रमाणात तगण्यास मदत झाली त्याचप्रमाणे जुलै व आॅगस्टच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन हातभार लागला. साधारणत: गंगापूर व दारणा धरण क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील पावसामुळे या दोन्ही धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा होऊ शकला, मात्र जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये यंदा ७८ टक्केच पाणी साठले आहे. आॅक्टोबर महिना सुरू झाल्याने आता परतीच्या पावसाची अपेक्षा संपुष्टात आली असून, पाऊस पडला तरी त्यातून धरणांच्या साठ्यात वाढ होण्याची शक्यता तशी कमीच आहे. अशा परिस्थितीत १५ आॅक्टोबर पूर्वी जिल्ह्यातील धरणातील पाण्याचे आरक्षण जाहीर करणे जिल्हा प्रशासनाला आवश्यक असून, त्या पार्श्वभूमीवर ५ आॅक्टोबर रोजी बोलविलेली पूर्र्वतयारीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या दौ-यामुळे होऊ शकली नाही. मात्र ज्या ज्या संस्था, पाणीपुरवठा योजना, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद यांना धरणाच्या पाण्याची आवश्यकता आहे त्यांच्याकडून पाणी मागणी अहवाल मागविण्यात आला आहे. त्यात नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून ५४०० दशलक्ष घनफूट व दारणा धरणातून ८०० दशलक्ष घनफूट असे एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. यंदा पर्जन्यमान कमी झालेले असून, जिल्ह्यात आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी ज्या पाणीपुरवठा योजनांसाठी धरणातून पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. त्यांनीदेखील वाढीव मागणी करण्यास सुरुवात केल्याने धरणाचे पाणी यंदा चांगलेच पेटण्याची परिस्थिती दिसू लागली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक