शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

महापालिकेत ना येण्याची वेळ, ना जाण्याची; दुपारच्या जेवणासाठी अनेकांची सुट्टी दोन तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 18:45 IST

नाशिक - महापालिकेच्या मुख्यालय आणि विभागीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली असली तरी मध्यंतरीच्या काळात काय हा मोठा प्रश्न ...

नाशिक - महापालिकेच्या मुख्यालय आणि विभागीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली असली तरी मध्यंतरीच्या काळात काय हा मोठा प्रश्न आहे. त्यातच मुख्यालयासह अन्यत्रही भोजनाची सुटी अर्धा तास असताना अनेक विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी दुपारी एक किंवा दीड वाजता गायब झाल्यास थेट तीन ते चार वाजेनंतरच भेटतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काम मात्र खोळंबत असते.

महापालिकेशी सर्वाधिक संपर्क हा सर्वसामान्य नागरिकांशी येतो. मुख्यालयात नगरसेवक, राजकीय नेते आणि ठेकेदारवगळता सर्वसामान्य नागरिकांना भेटण्याची वेळ दुपारी साडेचारनंतरचीच असते. परंतु या नंतरही अनेक अधिकारी, अभियंते तसेच कर्मचारी जागेवर नसतात. त्यामुळे येणाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. मुळात दुपारच्या भोजनाची वेळ सर्व शासकीय कार्यालयांसाठी सारखीच आहे. मात्र, महापालिकेत बाहेरील काम किंवा अन्य कामे सांगून अनेक कर्मचारी गायब असतात.

दुपारच्या भोजनासाठी अनेकजण घरी

- भोजनाच्या वेळेचे एकंदर गणित बघता, कर्मचाऱ्यांनी भोजनासाठी डबा कार्यालयात आणून तेथेच भोजन केले तर अधिक उपयुक्त ठरू शकते.

- अनेक विभागातील कर्मचारी घराजवळच राहतात असे सांगून भोजनासाठी गायब झाल्यानंतर पुन्हा वेळेवर येत नाहीत.

साहेबांनी सांगितले, साइटवर गेलो

नगररचना विभागात दुपारनंतरदेखील अनेकदा कर्मचारी भेटत नाहीत. अनेकांना वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले काम करण्यासासाठी जावे लागते.

- नगररचना आणि अभियांत्रिकीशी संबंधित अनेक कर्मचारी साइटवर गेल्याचे मुख्यालयात गेल्यानंतर सांगण्यात येते. मात्र, त्यामुळे नागरिकांना अकारण हेलपाटा पडतो.

माझे नगररचना विभागाशी संबंधित काम आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून तेथे राेज जाऊनही उपयोग होत नाही. इंजिनिअर भेटत नाहीत. सध्या वॉर्डरचनेची कामे सुरू आहेत, त्यामुळे ते कामात असल्याचे सांगितले जाते. सकाळी महापालिकेत प्रवेश नाही, सायंकाळी अधिकारी भेटत नाही.

- दिवाकर शिरभाते, नाशिक

काहीही कामासाठी महापालिकेत गेल्यानंतर अधिकारी, कर्मचारी न भेटणे हे कायमच झाले. दोन ते तीन चकरा मारल्याशिवाय काम होत नाही. कार्यालयीन कामाची वेळ निश्चित असताना कर्मचारी जातात कोठे?

- तुकाराम शिदोरे, पंचवटी

प्रत्येक कार्यालयात दोन ते चार कर्मचारी हजर

नाशिक शहर कार्यालयात दीड ते दोन भोजनाची वेळ असली तरी अनेक कर्मचारी महापालिकेच्या वेगवेगळ्या मजल्यावर भोजनानंतर शतपावली करताना आढळतात. कार्यालय सुरू झाल्यानंतर एकेक करीत येण्यास सुरुवात होत असली तरी प्रत्यक्ष वेळेत प्रत्येक कार्यालयात दोन ते चार कर्मचारीच हजर असतात.

कामावर येण्याची आणि जाण्याची वेळ ठरली आहे. भोजनाच्या सुटीतही वेळेत आले पाहिजे, तसे न झाल्यास संबंधित खातेप्रमुखांनी तपासणी करून कारवाई केली पाहिजे.

- मनोज घोडे पाटील, उपआयुक्त प्रशासन

 

टॅग्स :Nashikनाशिक