शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

नाशिक बाजारपेठेत गहू, बाजरीच्या भावात साधली बरोबरी; मक्याचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:14 IST

बाजारगप्पा : कडधान्यांच्या भावामध्ये थोडाफार चढ-उतार होताना दिसत आहे. 

- संजय दुनबळे, (नाशिक)

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या मक्याची आवक चांगली असून, बाजारभाव स्थिर आहेत. बाजरीचे उत्पादन कमी झाल्याने बाजार समित्यांमध्ये गहू आणि बाजरीच्या भावाने काहीशी बरोबरी साधल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कडधान्यांच्या भावामध्ये थोडाफार चढ-उतार होताना दिसत आहे. 

उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असताना मका आणि इतर भुसार माल पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र काहीसा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील लासलगाव, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला या बाजार समित्यांमध्ये सध्या मक्याची आवक चांगली होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही आवक तशी कमीच आहे. यामुळे मक्याने यावर्षी १५०० चा टप्पा पार केला आहे. लासलगाव बाजार समितीत १५५० ते १५६०, तर मालेगावी १५७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मक्याला भाव मिळत आहे. सध्या बाजारात वाळलेला आणि साफ केलेला मका येत आहे. शिवाय बाहेरील कंपन्यांकडून मक्याला मागणी असल्यामुळे मक्याच्या भावात वाढ झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

यावर्षी बाजरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक मंदावली आहे. हिवाळा ऋतुमध्ये ग्राहकांकडून गहू, ज्वारी व्यतिरिक्त सर्वाधिक पसंती बाजरीला  दिली जाते. हिवाळ्यात बाजरी खाणे पोष्टिक समजले जाते. यामुळे बाजरी सध्या चांगलाच भाव घेत आहे. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरी आणि गव्हाचे भाव बरोबरीत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांनी दिली. मागणी जास्त असल्याने बाजरीला भविष्यातही चांगला भाव राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. मालेगाव बाजार समितीत मक्याला १५७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. येथे इतर भुसार मालाचे भाव स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

हंगामी मार्केट असलेल्या चांदवड बाजार समितीत आणि रायपूर येथील केंद्रात मक्याची चांगली आवक होत आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही मक्याची चांगली आवक होत असून, १४७० पासून १५६९ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे दिसून आले. मकावगळता नांदगावी इतर भुसार मालाची आवक किरकोळ स्वरूपात असून, या मालाचे भाव टिकून आहेत. नांदगावी बाजरीला १५६० पासून २३७५ रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. कडधान्याची आवक किरकोळ स्वरूपात असून, त्याला चांगला भाव मिळत आहे. नांदगावी तुरीला ३३०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

सोयाबीनच्या उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट झाल्याने सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मंदावली आहे. मात्र, भाव म्हणावा तेवढ वाढला नाहीी. सोयाबीनला लासलगावला ३२७० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे भुसार मालाचे व्यापारी नंदकुमार डागा यांनी सांगितले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी