शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Nashik: उंटांच्या चर्चेवर पुर्णविराम; तपोभूमी नाशिकमधून १५२ उंट मूळ ‘मरुभूमी’कडे परतणार, जिल्हाधिकारी यांनी घेतला निर्णय

By अझहर शेख | Updated: May 11, 2023 15:21 IST

Nashik: नाशिक शहरासह जिल्ह्यात दाखल झालेल्या १५२ उंटांचा जत्था लवकरच मरुभूमी राजस्थानच्या दिशेने रवाना होणार आहे.

- अझहर शेखनाशिक : शहरासह जिल्ह्यात दाखल झालेल्या १५२ उंटांचा जत्था लवकरच मरुभूमी राजस्थानच्या दिशेने रवाना होणार आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाला या उंटांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी लागणारी मदत देण्याची तयारी धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेने दर्शविल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सर्व उंटांचे पशुसंवर्धन विभागाद्वारे लसीकरण केल्यानंतर त्यांचा नाशिक ते राजस्थान व्हाया गुजरातमार्गे प्रवास सुरू होणार आहे.

आठवडाभरापासून नाशिकमध्ये अचानक दाखल झालेले शेकडो उंट चर्चेचा विषय बनला आहे. दिंडोरी, सटाणामार्गे तपोवनात दाखल झालेल्या १११पैकी तीन उंटांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या चुंचाळे येथील पांजरापोळमध्ये १०९ उंट तसेच मालेगावजवळील गोशाळेत ४३ उंट आश्रयास आहेत. या सर्व उंटांची मालकी कोणाची? हे अद्यापही जिल्हा प्रशासन किंवा पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट केले गेलेले नाही. यामुळे उंटांचे मालक कोण? इतक्या मोठ्या संख्येने त्यांना नाशिकपर्यंत का धाडले गेले? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व उंटांचे पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण केले जाणार आहे. यानंतर सर्वांना टॅगिंग करून त्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे घेतली जाईल, यानंतर उंटांचा राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू होईल, असे नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी सांगितले. उंटांचा हा जत्था सध्या मालेगावजवळील एका गोशाळेत व नाशिक शहरातील चुंचाळे गावातील पांजरापोळमध्ये पाहुणचार घेत आहेत.

 राजस्थानची संस्था पुरविणार ‘रायका’धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशन या संस्थेने नाशिकमधून उंटांना सुरक्षितपणे राजस्थानपर्यंत पोहोचविण्याची तयारी दर्शविली आहे. राजस्थानस्थित उंटांचे पालनपोषण करणाऱ्या संस्थेपर्यंत हे सर्व उंट पोहोच केले जाणार आहेत. यासाठी राजस्थानची संस्था उंटांची पायी वाहतूक करण्यात पटाईत असलेले काही जाणकार लोक (रायका) राजचंद्र मिशन संस्थेला उपलब्ध करून देणार आहेत. हे लोक मिळाल्यानंतर ते आणि संस्थेचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होऊन जिल्हा प्रशासनाकडे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून उंटांचा राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत. 

उंटांना दररोज पायी चालण्याची सवयउंटांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने त्यांना दररोज काही अंतरापर्यंत पायी चालविणे गरजेचे असते, असे तज्ज्ञ सांगतात. वाळवंटात उंटांना दररोज पायी चालण्याची सवयच असते, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यामुळे त्यांना राजस्थानपर्यंत पोहोचविण्यासाठी पायी चालवून नेणे हाच पर्याय असल्याचे राजस्थानस्थित संस्था व राजचंद्र मिशन संस्थेकडून सांगण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.आठवडाभरात प्रवास होईल सुरू!जिल्हा प्रशासनाकडून उंटांची ‘घरवापसी’ हा टास्क हाती घेण्यात आला आहे. लवकरात लवकर सर्व उंटांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. उंटांना टॅगिंगदेखील यावेळी केले जाईल. यासंदर्भात गुरुवारी पशुसंवर्धन सहउपआयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम म्हणाले.

...कोण आहेत ‘रायका’रायका-रायबारी हा अर्ध-भटक्या राजस्थान, गुजरातमधील ग्रामीण भागातील समुदाय आहे. ज्याला राजस्थानमध्ये रायका, देवासी तसेच गुजरातमध्ये रायबारी या नावाने ओळखले जाते. हा समुदाय पिढ्यान्पिढ्या उंट, शेळी, मेंढी पालन करत आले आहेत. हे लोक पशुपालक आहेत जे वर्षभर आपल्या जनावरांसह फिरतात. हा समाज मुळात राजस्थान व गुजरातमध्ये आढळतो.

टॅग्स :Nashikनाशिक