शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: उंटांच्या चर्चेवर पुर्णविराम; तपोभूमी नाशिकमधून १५२ उंट मूळ ‘मरुभूमी’कडे परतणार, जिल्हाधिकारी यांनी घेतला निर्णय

By अझहर शेख | Updated: May 11, 2023 15:21 IST

Nashik: नाशिक शहरासह जिल्ह्यात दाखल झालेल्या १५२ उंटांचा जत्था लवकरच मरुभूमी राजस्थानच्या दिशेने रवाना होणार आहे.

- अझहर शेखनाशिक : शहरासह जिल्ह्यात दाखल झालेल्या १५२ उंटांचा जत्था लवकरच मरुभूमी राजस्थानच्या दिशेने रवाना होणार आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाला या उंटांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी लागणारी मदत देण्याची तयारी धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेने दर्शविल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सर्व उंटांचे पशुसंवर्धन विभागाद्वारे लसीकरण केल्यानंतर त्यांचा नाशिक ते राजस्थान व्हाया गुजरातमार्गे प्रवास सुरू होणार आहे.

आठवडाभरापासून नाशिकमध्ये अचानक दाखल झालेले शेकडो उंट चर्चेचा विषय बनला आहे. दिंडोरी, सटाणामार्गे तपोवनात दाखल झालेल्या १११पैकी तीन उंटांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या चुंचाळे येथील पांजरापोळमध्ये १०९ उंट तसेच मालेगावजवळील गोशाळेत ४३ उंट आश्रयास आहेत. या सर्व उंटांची मालकी कोणाची? हे अद्यापही जिल्हा प्रशासन किंवा पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट केले गेलेले नाही. यामुळे उंटांचे मालक कोण? इतक्या मोठ्या संख्येने त्यांना नाशिकपर्यंत का धाडले गेले? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व उंटांचे पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण केले जाणार आहे. यानंतर सर्वांना टॅगिंग करून त्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे घेतली जाईल, यानंतर उंटांचा राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू होईल, असे नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी सांगितले. उंटांचा हा जत्था सध्या मालेगावजवळील एका गोशाळेत व नाशिक शहरातील चुंचाळे गावातील पांजरापोळमध्ये पाहुणचार घेत आहेत.

 राजस्थानची संस्था पुरविणार ‘रायका’धरमपूरस्थित श्रीमद राजचंद्र मिशन या संस्थेने नाशिकमधून उंटांना सुरक्षितपणे राजस्थानपर्यंत पोहोचविण्याची तयारी दर्शविली आहे. राजस्थानस्थित उंटांचे पालनपोषण करणाऱ्या संस्थेपर्यंत हे सर्व उंट पोहोच केले जाणार आहेत. यासाठी राजस्थानची संस्था उंटांची पायी वाहतूक करण्यात पटाईत असलेले काही जाणकार लोक (रायका) राजचंद्र मिशन संस्थेला उपलब्ध करून देणार आहेत. हे लोक मिळाल्यानंतर ते आणि संस्थेचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होऊन जिल्हा प्रशासनाकडे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून उंटांचा राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत. 

उंटांना दररोज पायी चालण्याची सवयउंटांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने त्यांना दररोज काही अंतरापर्यंत पायी चालविणे गरजेचे असते, असे तज्ज्ञ सांगतात. वाळवंटात उंटांना दररोज पायी चालण्याची सवयच असते, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यामुळे त्यांना राजस्थानपर्यंत पोहोचविण्यासाठी पायी चालवून नेणे हाच पर्याय असल्याचे राजस्थानस्थित संस्था व राजचंद्र मिशन संस्थेकडून सांगण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.आठवडाभरात प्रवास होईल सुरू!जिल्हा प्रशासनाकडून उंटांची ‘घरवापसी’ हा टास्क हाती घेण्यात आला आहे. लवकरात लवकर सर्व उंटांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. उंटांना टॅगिंगदेखील यावेळी केले जाईल. यासंदर्भात गुरुवारी पशुसंवर्धन सहउपआयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम म्हणाले.

...कोण आहेत ‘रायका’रायका-रायबारी हा अर्ध-भटक्या राजस्थान, गुजरातमधील ग्रामीण भागातील समुदाय आहे. ज्याला राजस्थानमध्ये रायका, देवासी तसेच गुजरातमध्ये रायबारी या नावाने ओळखले जाते. हा समुदाय पिढ्यान्पिढ्या उंट, शेळी, मेंढी पालन करत आले आहेत. हे लोक पशुपालक आहेत जे वर्षभर आपल्या जनावरांसह फिरतात. हा समाज मुळात राजस्थान व गुजरातमध्ये आढळतो.

टॅग्स :Nashikनाशिक