शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

नाशिक जिल्ह्यातील खते, कीटकनाशके तपासणीत अधिकारी ‘नापास’; पेठ तालुक्यात पाटी ‘कोरीच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:41 IST

नाशिक : कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य सरासरी ५५ ते ५८ टक्केच राहिल्याची धक्कादायक माहिती ...

ठळक मुद्देबियाणे विक्री केंद्रे तपासणीचे १५२४ लक्ष्य कीटकनाशके विक्री केंद्र तपासणीचे १४८३ इतके उद्दिष्ट

नाशिक : कीटकनाशके फवारणीवरून खते व कीटकनाशके विक्रेत्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मात्र त्यांची ही दुकाने तपासणीची कारवाई या धाकामुळेच ‘आस्ते-कदम’ सुरू ठेवल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्रांच्या तपासणीचे लक्ष्य सरासरी ५५ ते ५८ टक्केच राहिल्याची धक्कादायक माहिती समोेर आली आहे.कृषी आयुक्तांची खरीप हंगाम २०१७ आढावा व रब्बी हंगाम २०१७-१८ नियोजनाबाबत बैठक असून, त्यानिमित्ताने कृषी विभागाने केलेल्या संक्षिप्त माहितीतून हे वास्तव उघड झाल्याचे कळते. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती कृषी निरीक्षकनिहाय दरमहा खते, बियाणे व कीटकनाशके केंद्रे तपासणीचे लक्ष्य दिलेले असते. त्यानुसार ३० सप्टेंबर २०१७ अखेर खते विक्री केंद्रांचे एकूण २०६८ केंद्रे तपासणीचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात अवघे ९७६ (४७ टक्के) खते विक्री केंद्रांची तपासणी झाल्याचे समजते. तसेच बियाणे विक्री केंद्रे तपासणीचे १५२४ लक्ष्य असताना प्रत्यक्षात ८८५ (५८ टक्के) बियाणे विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याचे कळते. इतकेच नव्हे तर ज्या कीटकनाशके फवारणीवरून राज्यभर रणकंदन सुरू आहे त्या कीटकनाशके विक्री केंद्र तपासणीचे १४८३ इतके उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ८२० कीटकनाशके विक्री केंद्रांचीच तपासणी करण्यात आल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक