शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

‘बि-हाड’ मोर्चाची नाशिक जिल्हा प्रशासनावर ‘आपत्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:40 IST

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथून गेल्या आठवड्यात निघालेला हा मोर्चा सुमारे अडीचशे किलो मीटर अंतर पायपीट करीत नाशिककडे मार्गक्रमण करीत असून, या मोर्चात सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात तरूण, महिलांचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देपोलीस हादरले : कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाची चिंतानाशिक शहरात सध्या ३८ डिग्रीपर्यंत उन तापलेले

नाशिक : आदिवासी विकास विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी काढलेल्या अक्कलकुवा ते नाशिक पायी बि-हाड मोर्चा शनिवारी नाशकात धडकणार असल्याने या मोर्चेक-यांच्या सरकारविषयीच्या संतप्त भावना व यापुर्वीच्या मोर्चेक-यांनी आदिवासी विकास भवनावर बायका मुलांसह मारलेल्या ठिय्या आंदोलनाचा पुर्वानुभव अनुभव लक्षात घेता पोलीस व महसूल प्रशासनाने मोर्चाचा धसका घेतला आहे. या मोर्चामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त करीत पोलिसांनी आदिवासी विकास भवन येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्याची विनंती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला केली आहे.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथून गेल्या आठवड्यात निघालेला हा मोर्चा सुमारे अडीचशे किलो मीटर अंतर पायपीट करीत नाशिककडे मार्गक्रमण करीत असून, या मोर्चात सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात तरूण, महिलांचे प्रमाण अधिक आहे. ज्या मार्गावरून हा मोर्चा मार्गक्रमण करीत आहे तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ येत असून, भर तळपत्या उन्हात निघालेला हा मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयावर धडकणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही असा निर्धार करूनच मोर्चेकरी त्या तयारीने निघालेले असल्यामुळे मोर्चेकरी किती दिवस रस्त्यावर बि-हाड मांडतील याची शाश्वती सरकारी यंत्रणेला नाही. प्रामुख्याने कंत्राटी कामगारांचे गेल्या आठ महिन्यापासून वेतन अदा करण्यात आलेले नाही त्यासाठी अनेक वेळा आंदोलन करूनही दखल घेण्यात आलेली नसल्याने प्रलंबीत मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.नाशिक शहरात सध्या ३८ डिग्रीपर्यंत उन तापलेले असून, अशा परिस्थितीत भर उन्हात मोर्चेक-यांनी रस्त्यावर ठाण मांडल्यास व त्यातून उष्माघाताने काही अनुचित घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलीस यंत्रणेने व्यक्त केली आहे. शिवाय इतक्या लांबून मोर्चेकरी पायी येत असल्यामुळे किसान मोर्चाप्रमाणे त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न भेडसावू शकतो अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आदिवासी विकास आयुक्तालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करून मोर्चेक-यांचा प्रश्न आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाताळावा अशी विनंती शहर पोलिसांनी केली व तसे पत्रही त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक