शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

‘बि-हाड’ मोर्चाची नाशिक जिल्हा प्रशासनावर ‘आपत्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 14:40 IST

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथून गेल्या आठवड्यात निघालेला हा मोर्चा सुमारे अडीचशे किलो मीटर अंतर पायपीट करीत नाशिककडे मार्गक्रमण करीत असून, या मोर्चात सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात तरूण, महिलांचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देपोलीस हादरले : कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाची चिंतानाशिक शहरात सध्या ३८ डिग्रीपर्यंत उन तापलेले

नाशिक : आदिवासी विकास विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी काढलेल्या अक्कलकुवा ते नाशिक पायी बि-हाड मोर्चा शनिवारी नाशकात धडकणार असल्याने या मोर्चेक-यांच्या सरकारविषयीच्या संतप्त भावना व यापुर्वीच्या मोर्चेक-यांनी आदिवासी विकास भवनावर बायका मुलांसह मारलेल्या ठिय्या आंदोलनाचा पुर्वानुभव अनुभव लक्षात घेता पोलीस व महसूल प्रशासनाने मोर्चाचा धसका घेतला आहे. या मोर्चामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त करीत पोलिसांनी आदिवासी विकास भवन येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्याची विनंती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला केली आहे.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथून गेल्या आठवड्यात निघालेला हा मोर्चा सुमारे अडीचशे किलो मीटर अंतर पायपीट करीत नाशिककडे मार्गक्रमण करीत असून, या मोर्चात सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात तरूण, महिलांचे प्रमाण अधिक आहे. ज्या मार्गावरून हा मोर्चा मार्गक्रमण करीत आहे तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ येत असून, भर तळपत्या उन्हात निघालेला हा मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयावर धडकणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही असा निर्धार करूनच मोर्चेकरी त्या तयारीने निघालेले असल्यामुळे मोर्चेकरी किती दिवस रस्त्यावर बि-हाड मांडतील याची शाश्वती सरकारी यंत्रणेला नाही. प्रामुख्याने कंत्राटी कामगारांचे गेल्या आठ महिन्यापासून वेतन अदा करण्यात आलेले नाही त्यासाठी अनेक वेळा आंदोलन करूनही दखल घेण्यात आलेली नसल्याने प्रलंबीत मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.नाशिक शहरात सध्या ३८ डिग्रीपर्यंत उन तापलेले असून, अशा परिस्थितीत भर उन्हात मोर्चेक-यांनी रस्त्यावर ठाण मांडल्यास व त्यातून उष्माघाताने काही अनुचित घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलीस यंत्रणेने व्यक्त केली आहे. शिवाय इतक्या लांबून मोर्चेकरी पायी येत असल्यामुळे किसान मोर्चाप्रमाणे त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न भेडसावू शकतो अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आदिवासी विकास आयुक्तालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करून मोर्चेक-यांचा प्रश्न आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाताळावा अशी विनंती शहर पोलिसांनी केली व तसे पत्रही त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक