शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नाशिक जिल्हा परिषद ‘पंचायत राज’च्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:56 IST

गेल्यावर्षी जिल्हा परिषदेत येऊन येथील दप्तर तपासणी आणि कामांची चौकशी करून काही आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांसदर्भातील सुनावणी आता मुंबईत सुरू असून, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देसुनावणी : सर्व अधिकारी मुंबईला रवानादोन दिवस येथील कामकाज राहणार ठप्प

नाशिक : बळकट पंचायत राज व्यवस्थेमार्फत पूर्णत्ववादी व सर्वसमावेशक तसेच चिरस्थायी ग्रामविकास साधण्यासाठी पंचायत राज विभागाच्या वतीने ग्रामविकासावर लक्ष केंद्रित केले जाते. ग्रामविकासाचे ध्येय असणाऱ्या  पंचायत राज समितीने गेल्यावर्षी जिल्हा परिषदेत येऊन येथील दप्तर तपासणी आणि कामांची चौकशी करून काही आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांसदर्भातील सुनावणी आता मुंबईत सुरू असून, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.स्वर्णजयंती ग्रामविकास योजनेंतर्गत ग्रामीण महाराष्ट्रत सामाजिक न्याय आणि मूलभूत सार्वजनिक सुविधा राबविण्यासाठी असलेल्या विविध योजनांच्या माहितीचा आढावा पंचायत राज समितीकडून घेतला जातो. यासाठी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली होती. शासकीय योजना, त्यांचे नियोजन, व्यवस्थापन आणि लेखापरीक्षणाच्या पातळीवर जिल्हा परिषदेच्या अनेक फाईल्सची तपासणी करून समितीने स्पष्टीकरणाचाही शेरा मारला असल्याचे समजते. या संदर्भातील त्रुटी आणि निराकरण करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची  विशेष सुनावणी सुरू झाली आहे. बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवस सदर सुनावणी होणार आहे.या सुनावणीसाठी जिल्हा परिषदेचे सर्वच अधिकारी मुंबईकडे रवाना झाल्याने अधिकाऱ्यांच्या दालनाला कुलपे लावण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते उपमुख्य कार्यकरी अधिकारी, तसेच खातेप्रमुखही मुंबईला गेल्याने जिल्हा परिषदेत बुधवारी बऱ्यापैकी  शांतता जाणवत होती. गुरुवारीदेखील सुनावणी असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज गुरुवारीदेखील ठप्प राहणार आहे. जिल्हा परिषदेचे सर्वच दप्तर पंचायत राजच्या दारी नेण्यात आल्यामुळे दोन दिवस येथील कामकाज ठप्प राहणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद