शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

मराठीच्या पेपरला नाशिक कॉपीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 23:59 IST

नाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.३) सुरू झाली असून, बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आलेल्या नाशिक जिल्ह्णातून दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. जिल्ह्यातील सर्व २०२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्याने मराठी भाषेच्या पहिल्या पेपरपासून कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीमुक्त असलेल्या धुळे जिल्ह्याला दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची बाधा झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देजळगाव आघाडीवरच : दहावीच्या परीक्षेत धुळ्याला गैरप्रकाराची बाधा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.३) सुरू झाली असून, बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आलेल्या नाशिक जिल्ह्णातून दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. जिल्ह्यातील सर्व २०२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्याने मराठी भाषेच्या पहिल्या पेपरपासून कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीमुक्त असलेल्या धुळे जिल्ह्याला दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची बाधा झाल्याचे दिसून आले.बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आलेल्या जळगाव जिल्ह्याने दहावीच्या परीक्षेतही पहिल्याच दिवशी आघाडी घेतली असून, जळगावमध्ये विभागात सर्वाधिक ५ कॉपीची प्रकरणे समोर आली. नंदुरबार जिल्ह्णात ४ कॉपीची प्रकरणे समोर आली असून, नाशिक विभागात एकूण १० गैरप्रकार घडल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयाने दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाख १६ हजार ३७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, यात नाशिक जिल्ह्यातील ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्णासह संपूर्ण विभागात परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना केली असून, विभागीय सचिव नितीन उपासनी यांनीही परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विविध केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. परीक्षा गैरप्रकारमुक्त व तणावमुक्तव्हावी, यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने चोवीस तास हेल्पलाइन सुरू केली आहे. त्याद्वारे विद्यार्थी व पालकांना मदत करण्यात येणार आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, डायट कॉलेजच्या प्राचार्या यांचा समावेश असलेल्या भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.परंतु विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न ठेवता तणावमुक्त परीक्षा देण्याचे आवाहन विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी निर्भय आणि आनंदी वातावरणात परीक्षा देण्याचा त्यांनी सल्ला दिला. तर परिरक्षक व केंद्र संचालकांना परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. पालकांनी पाहिले भविष्याचे स्वप्नदहावीच्या परीक्षेची सुरुवात मंगळवारी सकाळच्या सत्रात ११ ते २ या वेळेत प्रथम भाषेचे मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी या विषयांचे पेपर झाले. पेपर सुरू होण्यापूर्वी अनेक पालक त्यांच्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांना परीक्षेसाठी आशीर्वाद आणि धीर देताना त्यांच्या डोळ्यात उद्याच्या भविष्याचे स्वप्न पाहिल्याचे दिसून आले. जिल्हानिहाय कॉपी प्रकरणेजिल्हा कॉपी प्रकरणेनाशिक निरंकधुळे १जळगाव ५नंदुरबार ४

टॅग्स :ssc examदहावीStudentविद्यार्थी