शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या पेपरला नाशिक कॉपीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 23:59 IST

नाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.३) सुरू झाली असून, बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आलेल्या नाशिक जिल्ह्णातून दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. जिल्ह्यातील सर्व २०२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्याने मराठी भाषेच्या पहिल्या पेपरपासून कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीमुक्त असलेल्या धुळे जिल्ह्याला दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची बाधा झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देजळगाव आघाडीवरच : दहावीच्या परीक्षेत धुळ्याला गैरप्रकाराची बाधा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.३) सुरू झाली असून, बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आलेल्या नाशिक जिल्ह्णातून दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. जिल्ह्यातील सर्व २०२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्याने मराठी भाषेच्या पहिल्या पेपरपासून कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीमुक्त असलेल्या धुळे जिल्ह्याला दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची बाधा झाल्याचे दिसून आले.बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आलेल्या जळगाव जिल्ह्याने दहावीच्या परीक्षेतही पहिल्याच दिवशी आघाडी घेतली असून, जळगावमध्ये विभागात सर्वाधिक ५ कॉपीची प्रकरणे समोर आली. नंदुरबार जिल्ह्णात ४ कॉपीची प्रकरणे समोर आली असून, नाशिक विभागात एकूण १० गैरप्रकार घडल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयाने दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाख १६ हजार ३७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, यात नाशिक जिल्ह्यातील ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्णासह संपूर्ण विभागात परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना केली असून, विभागीय सचिव नितीन उपासनी यांनीही परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विविध केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. परीक्षा गैरप्रकारमुक्त व तणावमुक्तव्हावी, यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने चोवीस तास हेल्पलाइन सुरू केली आहे. त्याद्वारे विद्यार्थी व पालकांना मदत करण्यात येणार आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, डायट कॉलेजच्या प्राचार्या यांचा समावेश असलेल्या भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.परंतु विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न ठेवता तणावमुक्त परीक्षा देण्याचे आवाहन विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी निर्भय आणि आनंदी वातावरणात परीक्षा देण्याचा त्यांनी सल्ला दिला. तर परिरक्षक व केंद्र संचालकांना परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. पालकांनी पाहिले भविष्याचे स्वप्नदहावीच्या परीक्षेची सुरुवात मंगळवारी सकाळच्या सत्रात ११ ते २ या वेळेत प्रथम भाषेचे मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी या विषयांचे पेपर झाले. पेपर सुरू होण्यापूर्वी अनेक पालक त्यांच्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांना परीक्षेसाठी आशीर्वाद आणि धीर देताना त्यांच्या डोळ्यात उद्याच्या भविष्याचे स्वप्न पाहिल्याचे दिसून आले. जिल्हानिहाय कॉपी प्रकरणेजिल्हा कॉपी प्रकरणेनाशिक निरंकधुळे १जळगाव ५नंदुरबार ४

टॅग्स :ssc examदहावीStudentविद्यार्थी