शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

मराठीच्या पेपरला नाशिक कॉपीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 23:59 IST

नाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.३) सुरू झाली असून, बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आलेल्या नाशिक जिल्ह्णातून दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. जिल्ह्यातील सर्व २०२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्याने मराठी भाषेच्या पहिल्या पेपरपासून कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीमुक्त असलेल्या धुळे जिल्ह्याला दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची बाधा झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देजळगाव आघाडीवरच : दहावीच्या परीक्षेत धुळ्याला गैरप्रकाराची बाधा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.३) सुरू झाली असून, बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आलेल्या नाशिक जिल्ह्णातून दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. जिल्ह्यातील सर्व २०२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, नाशिक जिल्ह्याने मराठी भाषेच्या पहिल्या पेपरपासून कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीमुक्त असलेल्या धुळे जिल्ह्याला दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची बाधा झाल्याचे दिसून आले.बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आलेल्या जळगाव जिल्ह्याने दहावीच्या परीक्षेतही पहिल्याच दिवशी आघाडी घेतली असून, जळगावमध्ये विभागात सर्वाधिक ५ कॉपीची प्रकरणे समोर आली. नंदुरबार जिल्ह्णात ४ कॉपीची प्रकरणे समोर आली असून, नाशिक विभागात एकूण १० गैरप्रकार घडल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयाने दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाख १६ हजार ३७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, यात नाशिक जिल्ह्यातील ९७ हजार ९१२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्णासह संपूर्ण विभागात परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना केली असून, विभागीय सचिव नितीन उपासनी यांनीही परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विविध केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. परीक्षा गैरप्रकारमुक्त व तणावमुक्तव्हावी, यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने चोवीस तास हेल्पलाइन सुरू केली आहे. त्याद्वारे विद्यार्थी व पालकांना मदत करण्यात येणार आहे. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, डायट कॉलेजच्या प्राचार्या यांचा समावेश असलेल्या भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे.परंतु विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न ठेवता तणावमुक्त परीक्षा देण्याचे आवाहन विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी निर्भय आणि आनंदी वातावरणात परीक्षा देण्याचा त्यांनी सल्ला दिला. तर परिरक्षक व केंद्र संचालकांना परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. पालकांनी पाहिले भविष्याचे स्वप्नदहावीच्या परीक्षेची सुरुवात मंगळवारी सकाळच्या सत्रात ११ ते २ या वेळेत प्रथम भाषेचे मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी या विषयांचे पेपर झाले. पेपर सुरू होण्यापूर्वी अनेक पालक त्यांच्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांना परीक्षेसाठी आशीर्वाद आणि धीर देताना त्यांच्या डोळ्यात उद्याच्या भविष्याचे स्वप्न पाहिल्याचे दिसून आले. जिल्हानिहाय कॉपी प्रकरणेजिल्हा कॉपी प्रकरणेनाशिक निरंकधुळे १जळगाव ५नंदुरबार ४

टॅग्स :ssc examदहावीStudentविद्यार्थी