शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक आयुक्तालय : महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी घेतला कायदासुव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 15:31 IST

नाशिक पोलीस आयुक्तालयात सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. शहरासह जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

ठळक मुद्देबैठकीत अत्यंत महत्त्वांच्या मुद्दयांवर चर्चा आयुक्तालयात तीन तास ‘नो-एन्ट्री’ अन्य जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील उपस्थित

नाशिक : शहर-ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध कुमार जयस्वाल यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. शहरासह जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.आठवडाभरापुर्वी राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडून सुबोध कुमार जयस्वाल यांनी पदभार स्विकारला. तत्पुर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. त्यांच्या जागेवर संजय बारवे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. जयस्वाल यांनी महासंचालकपदाचा पदभार स्विकारताच राज्यातील नाशिक शहरात प्रथम दाखल होऊन कायदासुव्यवस्थेचा आढावा जाणून घेला. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह उपआयुक्त, सहाय्यक आयुक्तांसोबत चर्चा करून कायदासुव्यवस्थेविषयी चर्चा केली. आगामी निवडणूक काळात शहरासह जिल्ह्यात कायदासुव्यवस्था राखण्याबाबत विशेष मार्गदर्शन केले. शहरासह संपुर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांविषयीदेखील त्यांनी चर्चा केल्याचे समजते. सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत अत्यंत महत्त्वांच्या मुद्दयांवर चर्चा झाली आहे. ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये राजकिय पुढाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप तसेच अवैध धंद्यांचा बिमोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शहरी भागातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चोख नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शक सुचना करण्याचे आदेश नांगरे-पाटील यांना देण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातदेखील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महासंचालक जयस्वाल यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण मागील दीड महिन्यात शहरात खूनाच्या सात घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या टोळ्या जेरबंद करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलीस दलापुढे आहे. या बैठकीसाठी नाशिक विभागातील अन्य जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरू झालेली बैठक तीन वाजता संपतली. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी जयस्वाल यांनी कुठल्याहीप्रकारे संवाद साधला नाही. निवडणूक काळातकायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी विशेष गोपनीय बैठक त्यांनी घेत पोलीस अधिकाऱ्यांना विविध सुचना केल्या.--आयुक्तालयात तीन तास ‘नो-एन्ट्री’दुपारी बारा वाजेच्या सुमारास महासंचालक जयस्वाल यांची बैठक आयुक्तालयात सुरू झाली. त्यानंतर आयुक्तालयाच्या मुख्य स्वागतकक्षावरून कोणालाही इमारतीत प्रवेश दिला जात नव्हता. सर्वसामान्य नागरिकांपासून तर प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही मज्जाव करण्यात आला. आयुक्तालयाच्या इमारतीसह परिसरात अघोषित संचारबंदी यावेळी पहावयास मिळाली. केवळ पोलीस कर्मचा-यांची तुरळक वर्दळ यावेळी दिसून आली. नागरिक व पत्रकारांना स्वागतकक्षाच्या उंबरठ्यावरूनच माघारी फिरावे लागले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस