शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

नाशिक आयुक्तालय : महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी घेतला कायदासुव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 15:31 IST

नाशिक पोलीस आयुक्तालयात सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. शहरासह जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

ठळक मुद्देबैठकीत अत्यंत महत्त्वांच्या मुद्दयांवर चर्चा आयुक्तालयात तीन तास ‘नो-एन्ट्री’ अन्य जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील उपस्थित

नाशिक : शहर-ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध कुमार जयस्वाल यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. शहरासह जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.आठवडाभरापुर्वी राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडून सुबोध कुमार जयस्वाल यांनी पदभार स्विकारला. तत्पुर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. त्यांच्या जागेवर संजय बारवे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. जयस्वाल यांनी महासंचालकपदाचा पदभार स्विकारताच राज्यातील नाशिक शहरात प्रथम दाखल होऊन कायदासुव्यवस्थेचा आढावा जाणून घेला. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह उपआयुक्त, सहाय्यक आयुक्तांसोबत चर्चा करून कायदासुव्यवस्थेविषयी चर्चा केली. आगामी निवडणूक काळात शहरासह जिल्ह्यात कायदासुव्यवस्था राखण्याबाबत विशेष मार्गदर्शन केले. शहरासह संपुर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांविषयीदेखील त्यांनी चर्चा केल्याचे समजते. सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत अत्यंत महत्त्वांच्या मुद्दयांवर चर्चा झाली आहे. ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये राजकिय पुढाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप तसेच अवैध धंद्यांचा बिमोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शहरी भागातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चोख नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शक सुचना करण्याचे आदेश नांगरे-पाटील यांना देण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून शहरातदेखील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महासंचालक जयस्वाल यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण मागील दीड महिन्यात शहरात खूनाच्या सात घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या टोळ्या जेरबंद करण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलीस दलापुढे आहे. या बैठकीसाठी नाशिक विभागातील अन्य जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरू झालेली बैठक तीन वाजता संपतली. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी जयस्वाल यांनी कुठल्याहीप्रकारे संवाद साधला नाही. निवडणूक काळातकायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी विशेष गोपनीय बैठक त्यांनी घेत पोलीस अधिकाऱ्यांना विविध सुचना केल्या.--आयुक्तालयात तीन तास ‘नो-एन्ट्री’दुपारी बारा वाजेच्या सुमारास महासंचालक जयस्वाल यांची बैठक आयुक्तालयात सुरू झाली. त्यानंतर आयुक्तालयाच्या मुख्य स्वागतकक्षावरून कोणालाही इमारतीत प्रवेश दिला जात नव्हता. सर्वसामान्य नागरिकांपासून तर प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही मज्जाव करण्यात आला. आयुक्तालयाच्या इमारतीसह परिसरात अघोषित संचारबंदी यावेळी पहावयास मिळाली. केवळ पोलीस कर्मचा-यांची तुरळक वर्दळ यावेळी दिसून आली. नागरिक व पत्रकारांना स्वागतकक्षाच्या उंबरठ्यावरूनच माघारी फिरावे लागले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस