शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

Nashik: स्वच्छ गोदावरी अन‌ प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरी अभियानाचा आज शुभारंभ, राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

By suyog.joshi | Updated: October 2, 2023 10:20 IST

Nashik News: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी आनंदवली ते रामतीर्थ व तपोवन ‘प्लास्टिकमुक्त नाशिक-प्लास्टिकमुक्त गोदावरी’ या चळवळीचा शुभारंभ होत आहे.

- सुयोग जोशीनाशिक - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी आनंदवली ते रामतीर्थ व तपोवन ‘प्लास्टिकमुक्त नाशिक-प्लास्टिकमुक्त गोदावरी’ या चळवळीचा शुभारंभ होत आहे. तर सायंकाळी ६.३० ते ८.३० या दरम्यान शंकराचार्य संकुल, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे श्री एम यांचे ‘अध्यात्म आणि सेवा’ या विषयावर मार्गदर्शन व संवाद होणार आहे. मंगळवार, दिनांक ३ रोजी सकाळी ७.३० वाजता ब्रह्मगिरीवरील कुंडांचे पुनरुज्जीवन, माती अडवा पाणी जिरवा संकल्पना व प्लास्टिकमुक्त परिसर या चळवळीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या वेळी माझे झाड (माय ट्री) या संकल्पनेचा शुभारंभदेखील करण्यात येणार आहे.

शहरातील पर्यावरण कसे आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. स्वच्छ हवा, नितळ पाणी, हिरवीगार वनराई, डोंगर असतील तर शहरातील पर्यटन चांगले असते, दळणवळण चांगले होते आणि पर्यायाने शहराचा विकास होतो. निसर्गाची सेवा हीच मानवाची सेवा, असे मानणाऱ्या समाजसेवींच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या ‘अविरल गोदावरी’ अंतर्गत नाशिक व त्र्यंबकेश्वर क्षेत्री पर्यावरणीय चळवळीने आकार घेतला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून कामांचा शुभारंभ येथे २ व ३ ऑक्टोबरला होत आहे.

गोदामाईच्या पुनरुज्जीवनाचा आराखडाब्रह्मगिरीवर जेथे गोदामाईचा उगम होतो तेथून प्रवाहाच्या दिशेने जवळपास १०८ कुंड असून त्यातील काही कुंड स्वच्छ करण्याचे काम झाले आहे. या कुंडांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. जयपूर येथे झालेल्या ‘सी २०’ कॉनक्लेव्हमध्ये डॉ. राजेंद्र सिंह यांनी बनवलेला गोदामाईच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा सादर झाला. नदी कशी वाहती होईल, याविषयी झालेली सकारात्मक चर्चा अखंड कार्याच्या रूपाने सुरू झाली आहे.

देशव्यापी चळवळ होईलआंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक व क्रियायोगाचे गुरू तसेच पाणी चळवळीचे प्रणेते श्री एम आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ, रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पाणीवाले बाबा म्हणून  प्रसिद्ध  डॉ. राजेंद्रसिंह यांचा मिलाफ एखाद्या चळवळीत झाला तर हा मणिकांचन योग म्हणावा लागेल. ती चळवळ नक्कीच देशव्यापी रूप धारण करून आपला एक मानदंड जगासमोर ठेवेल यात शंका नाही. या दोन्ही महानुभावांनी नाशिकची गोदावरी व त्र्यंबकेश्वरीचा ब्रह्मगिरी याप्रश्नी लक्ष घातले असून स्वच्छ गोदावरी व प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरीची हाक नाशिककरांना दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक