शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

नाशिक शहरात ४४.५० टक्के पाण्याचा वापर होतो फुकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:47 IST

पाणी लेखापरीक्षण : शहरात होते १४.५० टक्के पाणीगळती

ठळक मुद्देकेवळ ४५ टक्के पाण्याचेच बिलिंग होत असल्याचे लेखापरीक्षणातून निदर्शनास पाणी गळती रोखण्यासाठी आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरीता तीन टप्प्यात सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाची कामे सुचविण्यात आली आहेत

नाशिक - महापालिकेने नियुक्त केलेल्या मे. एन. जे. एस. इंजिनिअर्स (इंडिया) प्रा. लिमिटेड या संस्थेने तयार केलेल्या पाणी लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार, तब्बल ४४.५० टक्के पाण्याचा वापर फुकटात होत असून त्याचा कुठेही हिशेब नाही. केवळ ४५ टक्के पाण्याचेच बिलिंग होत असल्याचे लेखापरीक्षणातून निदर्शनास आले आहे. सदर हिशेबबाह्य पाण्याचा वापर २० टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्टय महापालिकेला देण्यात आले आहे. दरम्यान, थेट गळती १४.५० टक्के आढळून आली असून पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी ६०० कोटी रुपयांची विविध कामे तीन टप्प्यात करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.संबंधित संस्थेने पाणी लेखा परीक्षणाचा प्रारुप अहवाल आयुक्त अभिषेक कृष्ण यांना सादर केला. या अहवालानुसार, थेट गळतीचे प्रमाण १४.५० टक्के इतकी आढळून आली आहे. ट्रिटमेंट प्लांटवर ३.५० ते ४ टक्के पाणीगळती असून महापालिकेच्या मालकीच्या इमारती, उद्याने, स्टॅण्डपोस्टद्वारे ३ टक्के पाणीवापर होतो. केवळ ४५ टक्केच पाण्याचे बिलिंग होते. हिशेबबाह्य पाण्याची टक्केवारी ४४.५० टक्के इतकी आहे. ज्यापासून महापालिकेला कसलेही उत्पन्न मिळत नाही. पाणी गळती रोखण्यासाठी आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरीता तीन टप्प्यात सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाची कामे सुचविण्यात आली आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात तीन ते पाच वर्षांत पाईपलाइनमधील व्हॉल्व बदलणे, ट्रीटमेंट प्लांटवरील गळती बंद करणे, जलशुद्धिकरण केंद्रांवरील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे, मीटरींग करणे व स्काडा मीटर बसविणे, जुन्या पाईपलाइन बदलणे यांचा समावेश आहे. दुसºया टप्प्यात जेथे जास्त पाणीगळती आहे, तेथे लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी २४ तास पाणीपुरवठा करणे, अतिरिक्त जलकुंभांची निर्मिती करणे, वितरणवाहिनीत सुधारणा करणे तर तिस-या टप्प्यात उर्वरित भागात २४ तास पाणीपुरवठ्याचे नियोजन सुचविण्यात आले आहे. या कामांमधील मीटरींग करणे, स्काडा मीटर बसविणे, जुन्या पाईपलाइन बदलणे आदी कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत केली जाणार असल्याने अहवाल कंपनीला सादर करण्यात आला असून कंपनीकडूनप्राप्त माहितीनंतर फेब्रुवारी २०१८ अखेर संस्थेकडून अंतिम अहवाल महापालिकेला सादर केला जाणार आहे....असे झाले पाणी लेखापरीक्षणपाणी लेखापरीक्षण करताना संस्थेने २१०० कि.मी. पाईपलाईनचे नेटवर्क ग्लोबल इन्फर्मेशन सिस्टमवर आणले. शहरातील ६ झोनमधील प्रत्येकी दोन जलकुंभांची निवड करण्यात आली. १२ जलकुंभांच्या कमांड एरियात असलेल्या नळजोडण्यांपैकी २० टक्के नळजोडण्यांची माहिती घेण्यात आली. त्यात ग्राहकांचाही सर्वे करण्यात आला. प्रामुख्याने, घरात किती माणसे आहेत, किती व्यासाची पाईपलाइन आहे. घरात किती माणसे आहेत. पाण्याचा दाब किती. पाण्याचा दर्जा व गुणवत्ता कशी आहे. त्याचा अंदाज घेत संपूर्ण शहराचा अंदाज ठरविण्यात आला. सर्वे करण्यात आला त्यावेळी महापालिकेमार्फत धरणातून प्रतिदिन ४१० दसलक्षलिटर्स पाण्याची उचल केली जात होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी