शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:19 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आटोकाट प्रयत्न करूनही प्रत्यक्षात गत वेळपेक्षा सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घटल्याने त्याचा फायदा व तोटा कोणाला होईल याचे आडाखे बांधण्यात येत असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी यापूर्वीच्या निवडणुकीचे दाखले दिले जात असले तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देमतदान यंत्रात दडले काय? : आकडेमोडीतून गणितांची मांडणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आटोकाट प्रयत्न करूनही प्रत्यक्षात गत वेळपेक्षा सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घटल्याने त्याचा फायदा व तोटा कोणाला होईल याचे आडाखे बांधण्यात येत असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी यापूर्वीच्या निवडणुकीचे दाखले दिले जात असले तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.लोकसभा निवडणुकीत जिल्ह्णात मतदानाचा टक्का वाढला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तो आणखी वाढेल, अशी अपेक्षा बाळगण्यात आली.व त्यासाठी राजकीय व शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. दुसरीकडे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय समीकरणे बदलली त्यातच आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने मतदानाचा टक्का वाढेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र सोमवारी सायंकाळी संपलेल्या मतदानानंतर जिल्ह्णात ६२.१ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्णातील ६४.३४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यावेळी राज्यात मोदी लाटेचा प्रभाव असल्याचे सांगण्यात आले होते. यंदा मात्र मतदान घटल्याने त्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्याचबरोबर एकूण मतदानाची आकडेवारी व त्यात प्रतिस्पर्ध्यांच्या प्रभाव क्षेत्राचा विचार करून घटलेल्या मतदानावरून ठोकताळे मांडण्यात येत आहे. या निवडणुकीत कोणत्या भागातील मतदारांची मते कोणत्या उमेदवाराकडे वळाली असतील, याचा अंदाजही वर्तविण्यात येऊन आपल्याला कोठून कमी-अधिक मतदान झाले असेल त्याची माहितीही गोळा करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराने घटलेल्या मतदानाचा आपल्याला कसा फायदा होईल, यादृष्टीने विजयाची मांडणी केली असून, त्यांच्या समर्थकांकरवी तर छातीठोक दावे केले जात आहे. असे असले तरी, या साऱ्या बाबी जर-तरच्या असून, मतदान यंत्रात काय दडले असेल याची धाकधूक सर्वांनाच लागून आहे. रविवार व सोमवार अशी लागोपाठ दोन दिवस शासकीय सुटी असल्यामुळे मतदारांनी पर्यटनाला पसंती दिल्याचे सांगण्यात आले तर पावसाळी वातावरणामुळेदेखील मतदारांनी घराबाहेर पडण्यास धजावले नाही. त्यामुळे मतदानाचा टक्का घटल्याचा अर्थ काढला जात आहे. सोमवारी मतदान आटोपल्यानंतर प्रत्येक बूथनिहाय नेमलेल्या प्रतिनिधींकडून आलेली मतदानाची आकडेवारी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गोळा केली असून, त्याआधारे कोणत्या भागातील मतदारांनी मतदान केले नाही याचाही आढावा घेण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019