शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:19 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आटोकाट प्रयत्न करूनही प्रत्यक्षात गत वेळपेक्षा सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घटल्याने त्याचा फायदा व तोटा कोणाला होईल याचे आडाखे बांधण्यात येत असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी यापूर्वीच्या निवडणुकीचे दाखले दिले जात असले तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देमतदान यंत्रात दडले काय? : आकडेमोडीतून गणितांची मांडणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आटोकाट प्रयत्न करूनही प्रत्यक्षात गत वेळपेक्षा सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घटल्याने त्याचा फायदा व तोटा कोणाला होईल याचे आडाखे बांधण्यात येत असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी यापूर्वीच्या निवडणुकीचे दाखले दिले जात असले तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.लोकसभा निवडणुकीत जिल्ह्णात मतदानाचा टक्का वाढला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तो आणखी वाढेल, अशी अपेक्षा बाळगण्यात आली.व त्यासाठी राजकीय व शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. दुसरीकडे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय समीकरणे बदलली त्यातच आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने मतदानाचा टक्का वाढेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र सोमवारी सायंकाळी संपलेल्या मतदानानंतर जिल्ह्णात ६२.१ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्णातील ६४.३४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यावेळी राज्यात मोदी लाटेचा प्रभाव असल्याचे सांगण्यात आले होते. यंदा मात्र मतदान घटल्याने त्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्याचबरोबर एकूण मतदानाची आकडेवारी व त्यात प्रतिस्पर्ध्यांच्या प्रभाव क्षेत्राचा विचार करून घटलेल्या मतदानावरून ठोकताळे मांडण्यात येत आहे. या निवडणुकीत कोणत्या भागातील मतदारांची मते कोणत्या उमेदवाराकडे वळाली असतील, याचा अंदाजही वर्तविण्यात येऊन आपल्याला कोठून कमी-अधिक मतदान झाले असेल त्याची माहितीही गोळा करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराने घटलेल्या मतदानाचा आपल्याला कसा फायदा होईल, यादृष्टीने विजयाची मांडणी केली असून, त्यांच्या समर्थकांकरवी तर छातीठोक दावे केले जात आहे. असे असले तरी, या साऱ्या बाबी जर-तरच्या असून, मतदान यंत्रात काय दडले असेल याची धाकधूक सर्वांनाच लागून आहे. रविवार व सोमवार अशी लागोपाठ दोन दिवस शासकीय सुटी असल्यामुळे मतदारांनी पर्यटनाला पसंती दिल्याचे सांगण्यात आले तर पावसाळी वातावरणामुळेदेखील मतदारांनी घराबाहेर पडण्यास धजावले नाही. त्यामुळे मतदानाचा टक्का घटल्याचा अर्थ काढला जात आहे. सोमवारी मतदान आटोपल्यानंतर प्रत्येक बूथनिहाय नेमलेल्या प्रतिनिधींकडून आलेली मतदानाची आकडेवारी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गोळा केली असून, त्याआधारे कोणत्या भागातील मतदारांनी मतदान केले नाही याचाही आढावा घेण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019