शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

विधानपरिषदेसाठी नाशिकमधून नारायण राणे, भाजपाची दुहेरी खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 14:47 IST

राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरूंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजप खेळू पाहत आहेत

ठळक मुद्देभुजबळांना देणार शह : शिवसेनेच्या वर्चस्वाला लगामस्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तुर्त तरी भाजपाची आघाडी

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ पाहणा-या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला असून, राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरूंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजप खेळू पाहत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तुर्त तरी भाजपाने आघाडी घेतल्याने राणे यांचा विजय सुकर असल्याचे गणित त्यामागे मांडण्यात आले आहे.नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला नसला तरी, त्यांच्या महाराष्टÑ स्वाभीमानी पक्षाने राष्टÑीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राणे यांना राज्यमंत्रीमंडळात प्रवेश देण्याची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पक्षावर येवून पडली असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तसे वारंवार संकेतही दिले आहे. दोन दिवसांपुर्वी राणे यांनीही सांगली मुक्कामी आपला मंत्रीमंडळ प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. राजकीय पातळीवर विधीमंडळाचे अधिवेशन आटोपल्यावर राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार करण्यावर भाजप-सेनेत एकमत झालेले आहे. त्यावेळी राणे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सदस्याला सहा महिन्याच्या आत विधानपरिषद वा विधानपरिषदेचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अलिकडेच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राणेंना शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाकडून उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाºया नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेवर राणे यांना उमेदवारी देण्यात भाजपाला कुठलीही अडचण नसल्याचे खात्रीशीर सुत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राणे यांच्या उमेदवारीमागे भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा मनसुबा रचला आहे. त्यात विशेष करून गेल्या २१ महिन्यापासून तुरूंगात असलेले छगन भुजबळ नजिकच्या काळात बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ बाहेर येताच, ते पहिल्यांचा भाजपाला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतील व आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करतील अशा वेळी भुजबळांइतकेच आक्रमक नेतृत्व राणे यांच्याकडे आहे. या शिवाय जिल्ह्यात शिवसेना प्रत्येक वेळी भाजपाला अडचणीत आणत असल्याने शिवसेनेला वठणीवर आणण्याची खास जबाबदारी राणे यांच्यावर सोपविली जाणार आहे. शिवाय राणे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गंत पातळीवर कोणी विरोध करण्याची हिम्मत करणार नाही व राणेंना निवडून आणणे अगदीच सोपे होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक