शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमध्यमेश्वर : राष्ट्रीय अभयारण्यात मासेमारीचा सापळा; अठरा पक्ष्यांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:47 IST

अभयारण्यात मासेमारीच्या सापळ्यात अडकून अठरा पक्ष्यांनी तडफडत जलसमाधी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देतिरंदाजसारख्या दुर्मीळ पक्ष्यासह नऊ ते दहा पाणकावळे मृत्युमुखी पक्ष्यांनाही सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन दिले जात नसल्याने संताप

नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर या  राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात मासेमारीच्या सापळ्यात अडकून अठरा पक्ष्यांनी तडफडत जलसमाधी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यामधील पाणथळ जागा ही ‘रामसर’च्या दर्जाची असल्याचे मानले जात आहे. त्यादृष्टीने संवर्धनासाठी हातभार लागावा, याकरिता प्रस्ताव राज्य वन्यजीवमंडळाकडे सादर क रण्यात आला आहे; मात्र जागतिक दर्जा मिळविण्यासाठी नांदूमध्यमेश्वरच्या पक्ष्यांची जैवविविधतेच्या सुरक्षेचा विचार होणे तितकेच गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्रातील मिसळणारे प्रदूषित पाणी, मासेमारीच्या जाळ्यामुळे येथील पक्ष्यांच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सर्वदूर प्रसिध्द असलेल्या या अभयारण्याला वीकेण्डला मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी पर्यटक भेट देतात. प्रवेश शुल्क, वाहनशुल्कच्या माध्यमातून नाशिक वन्यजीव विभागाकडून लाखोंचा महसूल जमा केला जातो; मात्र नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधांची वानवा तर जाणवतेच परंतू येथे दरवर्षी हिवाळ्याच्या हंगामात हिवाळी पक्षी संमेलनासाठी हजारो लाखो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या पाहूण्या पक्ष्यांनाही सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन दिले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. अभयारण्याच्या क्षेत्रा चोरट्या मार्गाने सर्रास प्रवेश करुन मच्छिमारांकडून पाण्यात जाळे टाकले जात आहे. या जाळ्यांमध्ये अडकून मासे तर मृत्यूमुखी होत आहे; मात्र पक्षीदेखील मरण पावत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्यातील एकमेव पाणथळ जागा की जेथे विपुल प्रमाणात पक्षी, प्राणी, वृक्ष, गवताची जैवविविधता आढळून येते अशा या पाणथळ जागेच्या संवर्धनासाठी पाहिजे त्या प्रमाणात ठोस उपाययोजना नाशिक वन्यजीव विभागाकडून होत नसल्याने वन्यजीवप्रमी, पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मासेमारी करणाºया स्थानिक नागरिकांच्या गुंडशाही प्रवृत्तीपुढे वन्यजीव विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी हतबल झाल्याचे चित्र आहे. वन्यजीव विभागाने अज्ञात मासेमारी करणा-यांविरुध्द तत्काळ गुन्हे दाखल करुन अठरा पक्ष्यांच्या मृत्यूस जबाबदार धरण्याची मागणी होत आहे. तसेच अभयारण्याच्या हद्दीत घुसखोरी करुन मासेमारी करणा-यांचा बंदोबस्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई वेळीच करण्याची गरज आहे. मासेमारीच्या जाळ्यात सुमारे दोन दिवसांपासून अडकून तडफडत प्राण सोडलेल्या अठरा पक्ष्यांचे देह संपूर्णत: कुजलेल्या अवस्थेत ग्राम परिस्थितीकीय विकास समिती व वन्यजीव कर्मचा-यांना आढळून आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांमध्ये तिरंदाजसारख्या दुर्मीळ पक्ष्यासह नऊ ते दहा पाणकावळे, क्रेन, कॉमन कूटसारख्या प्रजातींचा समावेश आहे. निसर्गाची होणारी ही अपरिमित हानी कधीही न भरून येणारी असल्याचे बोलले जात आहे.नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या क्षेत्रात प्रवेश करुन मासेमारी करणे कायद्याने गुन्हा आहे. अभयारण्याला धोका निर्माण करण्याचा अज्ञात मच्छीमारांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे यासंदर्भात कर्मचा-यांना तातडीने परिसरात शोध घेत ज्यांनी जाळे अभयारण्यात टाकले त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या क्षेत्रात गस्त वाढविण्याचे आदेश दिले गेले आहे. अभयारण्याच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्न व उपायोजना सुरू असून लवकरच अवैध मासेमारीला अटकाव करण्यास यश येईल.-अनिल अंजनकर, वनसंरक्षक, वन्यजीव विभाग नाशिक

टॅग्स :nandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरNashikनाशिकforest departmentवनविभागbirds sanctuaryपक्षी अभयारण्य