शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदूरमधमेश्वर, कळसुबाई अभयारण्य बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 14:47 IST

नाशिक : वन्यजीव विभागाने निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर व अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय ...

नाशिक : वन्यजीव विभागाने निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर व अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय बुधवारी (दि.१२) घेतला. कळसुबाई अभयारण्य परिसरात असलेलले सर्व गड, किल्ले, मंदिरे, सांदण दरी आदी पर्यटन ठिकाणांवरदेखील बंदी घातली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने सर्व पर्यटन स्थळावर बंदी घातल्याचा आदेश जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर वन वन्यजीव विभागानेदेखील त्यांच्या परिसरामध्ये असलेल्या राखी वन वन पर्यटन स्थळे तसेच अभयारण्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाने नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा बुधवारी केली आणि हिवाळ्याच्या हंगामात नांदूर मधमेश्वर अभयारण्य कुलूप बंद होत असल्यामुळे पक्षीप्रेमी हौशी पर्यटकांसह स्थानिककांचाही हिरमोड झाला आहे. नांदूरमधमेश्वर अभयारण्यमध्ये पक्ष्यांची रेलचेल वाढली. तसेच आतापर्यंत सुमारे साडेसात हजार पर्यटकांनी भेट दिली असून पर्यटन वाढीस लागत असताना अवघ्या तीन महिन्यांत अभयारण्य बंद करण्याची वेळ ओढावली आहे.

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच सर्वप्रथम कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य ''वीकेंड लॉकडाऊन''च्या अटीवर खुले करण्यात आले होते. दरम्यान, हिवाळ्यात अभयारण्य परिसरात हौशी पर्यटक, ट्रेकर्सची वर्दळ वाढू लागली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनादेखील रोजगार उपलब्ध होत होता. मात्र शहरी भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य देखील पूर्ण वेळ बंद करण्याची गरज निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी अभयारण्य परिसरातील भंडारदरा, राजूर या वनपरिक्षेत्रात असलेल्या गावांतील सरपंच, ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी तसेच या भागात कॅम्पिंग करण्यासाठी तंबूसुविधा देणारे युवक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून अभयारण्य पुढील काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे रणदिवे यांनी सांगितले.

वनपर्यटन, गड किल्ले भ्रमंतीला ‘ब्रेक’

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर वन पर्यटनासह कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, पाबरगड, भैरवगड, आजोबागड, अलंग-मलंग-कुलंग आदी गड तसेच प्राचीन अमृतेश्वर मंदिर, सांदण दरी, घाटघर, पांजरे बेट आदी सर्व ठिकाणे पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती नाशिक वन्यजीव विभागाने दिली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक