शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदूरमधमेश्वर, कळसुबाई अभयारण्य बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 14:47 IST

नाशिक : वन्यजीव विभागाने निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर व अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय ...

नाशिक : वन्यजीव विभागाने निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर व अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय बुधवारी (दि.१२) घेतला. कळसुबाई अभयारण्य परिसरात असलेलले सर्व गड, किल्ले, मंदिरे, सांदण दरी आदी पर्यटन ठिकाणांवरदेखील बंदी घातली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने सर्व पर्यटन स्थळावर बंदी घातल्याचा आदेश जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर वन वन्यजीव विभागानेदेखील त्यांच्या परिसरामध्ये असलेल्या राखी वन वन पर्यटन स्थळे तसेच अभयारण्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाने नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा बुधवारी केली आणि हिवाळ्याच्या हंगामात नांदूर मधमेश्वर अभयारण्य कुलूप बंद होत असल्यामुळे पक्षीप्रेमी हौशी पर्यटकांसह स्थानिककांचाही हिरमोड झाला आहे. नांदूरमधमेश्वर अभयारण्यमध्ये पक्ष्यांची रेलचेल वाढली. तसेच आतापर्यंत सुमारे साडेसात हजार पर्यटकांनी भेट दिली असून पर्यटन वाढीस लागत असताना अवघ्या तीन महिन्यांत अभयारण्य बंद करण्याची वेळ ओढावली आहे.

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच सर्वप्रथम कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य ''वीकेंड लॉकडाऊन''च्या अटीवर खुले करण्यात आले होते. दरम्यान, हिवाळ्यात अभयारण्य परिसरात हौशी पर्यटक, ट्रेकर्सची वर्दळ वाढू लागली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनादेखील रोजगार उपलब्ध होत होता. मात्र शहरी भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य देखील पूर्ण वेळ बंद करण्याची गरज निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी अभयारण्य परिसरातील भंडारदरा, राजूर या वनपरिक्षेत्रात असलेल्या गावांतील सरपंच, ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी तसेच या भागात कॅम्पिंग करण्यासाठी तंबूसुविधा देणारे युवक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून अभयारण्य पुढील काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे रणदिवे यांनी सांगितले.

वनपर्यटन, गड किल्ले भ्रमंतीला ‘ब्रेक’

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर वन पर्यटनासह कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, पाबरगड, भैरवगड, आजोबागड, अलंग-मलंग-कुलंग आदी गड तसेच प्राचीन अमृतेश्वर मंदिर, सांदण दरी, घाटघर, पांजरे बेट आदी सर्व ठिकाणे पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती नाशिक वन्यजीव विभागाने दिली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक