शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

नांदूरमधमेश्वर धरण गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:00 IST

सायखेडा : हजारो हेक्टर शेती वर्षानुवर्षे ओलिताखाली ठेवणारे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी दूरदृष्टीने बांधले आहे; परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्यामुळे या धरणाची क्षमता खालावली आहे.

ठळक मुद्देक्षमता १०५० दशलक्ष घनफूट : आता होतो केवळ २५० साठा; तीन जिल्ह्यांना पाणीपुरवठा

सायखेडा : हजारो हेक्टर शेती वर्षानुवर्षे ओलिताखाली ठेवणारे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी दूरदृष्टीने बांधले आहे; परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्यामुळे या धरणाची क्षमता खालावली आहे.धरणात गोदावरी, कादवा, बाणगंगा नदीचे पाणी येते, तर गंगापूर, दारणा, वालदेवी, मुकणे, कडवा, ओझरखेड या नाशिक जिल्ह्यातील मोठ्या धरणांतील पाणी येते.धरण बांधले तेव्हा धरणाची पाणी साठवणूक क्षमता १०५० दशलक्ष घनफूट होती. अनेक दशकानंतर गाळ साचल्याने आज केवळ २५० दशलक्ष घनफूट पाणी साठवणूक होईल एवढेच शिल्लक राहिले आहे.मोठी क्षमता असलेले धरण आज कादवा, गोदावरी नदीच्या प्रवाहात वाहत येणाऱ्या गाळामुळे जवळपास ७० टक्के भरले असून, क्षमता कमी झाल्याने सलग दुसºया वर्षी धरण कोरडेठाक पडले. अनेक दशके तळ पाहिला नसल्याने आता सलग तीन वर्षांपासून कोरडे पडत असल्याने धरणाची क्षमता कमी झाली असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.यामुळे भविष्याचा मोठा धोका वाढतो आहे.नांदूरमधमेश्वर धरण क्षेत्रात काळी सुपीक जमीन आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह आल्याने माती वाहून येते. वर्षानुवर्षे वाहत येणाºया मातीने धरण गाळयुक्त झाले आहे. धरणात जलसाठा होईल इतकी जागाच शिल्लक राहिली नाही. मुख्य दरवाजे असलेल्या ठिकाणी अवघे पाच ते सात फूट उंची शिल्लक आहे, तर काही ठिकाणी गाळ पूर्णपणे धरण भिंतीच्या समांतर साचत आला आहे.गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाढले की गोदावरीला पूर येतो. सायखेडा, चांदोरी या गावांना पुराचा फटका बसतो.धरण लाभक्षेत्र असलेल्या गावांना सलग तीन वर्षांपासून एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. धरण क्षेत्र असल्याने पावसाळ्यात पूर येतो, त्यामुळे शेतात कोणतेही पीक येत नाही. घेतले तरी जास्त पाण्यामुळे खराब होते, अशा ठिकाणी केवळ उन्हाळ्यात चांगले पीक येते; मात्र तीन वर्षांपासून धरण कोरडेठाक पडत असल्याने पाणी कमी पडते, पीक घेता येत नाही. धरण क्षेत्र असूनही शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही.पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. धरण गाळमुक्त झाले तर उन्हाळ्यात जलसाठा टिकून राहील. पर्यायाने पाणी असल्याने शेतात उन्हाळपिके घेता येतील. यासाठी कार्यवाही होण्याची आवश्यकता आहे. शासनाने त्वरित गाळमुक्त धरण करावे, अशी मागणी शेतकरी, सामान्य नागरिक करीत आहेत.गाळमुक्त धरण करण्याची आवश्यकता शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येते. अनेक ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी नदी, तलाव, ओहळ यांची खोलीकरण करून क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच धर्तीवर धरणातील गाळ काढून गाळमुक्त धरण केल्यास पाण्याची क्षमता वाढेल आणि लाभ क्षेत्रातील शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो, त्यासाठी विशेष निधीची तरतूद करून जलसंपदामंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.२ दहा वर्षांपूर्वी धरणाला आठ वक्र ाकार गेट तयार करण्यात आले; मात्र वक्र ाकार गेटमधून गाळ बाहेर पडत नाही. साचलेला गाळ आणि गेट यात अंतर असल्याने केवळ पाणी वाहून जाते. गाळ वाहून जात नसल्याने वर्षानुवर्षे वाहून आलेल्या गाळामुळे धरण गाळाने भरले आहे. पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे.