शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नांदगावी वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 13:16 IST

नांदगांव : शहरातील वाहतूक म्हणजे सततची दगदग झाली आहे. वाहतूक कोंडीने शहरातील नागरिकांचीच कोंडी केली आहे.

नांदगांव : शहरातील वाहतूक म्हणजे सततची दगदग झाली आहे. वाहतूक कोंडीने शहरातील नागरिकांचीच कोंडी केली आहे. पोलीस किंवा प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील रेल्वे फाटकातुन बाजार समितीकडे जाणारा एकमेव मार्ग आहे. यापूर्वी लेंडी नदीच्या रेल्वे पुलाखालून दुचाकी व छोटी वाहने जात असत. मात्र रेल्वे प्रशासनाने तो मार्ग बंद केल्याने त्याचा ताण मुख्य रेल्वे फाटकावर पडतो आहे. रेल्वे फाटकातुन तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रु ग्णालय, बाजार समिती, आनंदवाडी, स्वामी विवेकानंद नगर, एस टी काँलनी, मल्हारवाडी आणी येवला रोड या भागाकडे जाण्या साठी रेल्वेफाटक हा एकमेव मार्ग आहे . फाटकात दिवसातून अनेकदा रहदारी ठप्प होत असते. त्याचा परिणाम शाळकरी मुले, पादचारी व इतर प्रवाशाना सोसावा लागतो आहे. फाटकातील गर्दीतून जातांना प्रवासी व शाळकरी मुलांना जातांना जीवमुठीत धरु न चालावे लागते. या क्रॉसिंगवर अनेकदा भरधाव वेगाने येणार्या रेल्वेचा धक्का लागून अपघातात लोक मृत्युमुखी पडले आहेत. फाटकाच्या दोन्ही बाजूला झालेली अतिक्र मणे रहदारीच्या कोंडीत भर घालतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने टपर्या ,हातगाडे , फेरीवाले यांची भर पडते यावर आता प्रशासनाने उपाय करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तसेच शहरातील भाजी बाजारात देखील नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. येथे तर दोन्हीबाजुला हातगाडे लावलेले असतात. त्यामुळे पुढे जाण्यास वाहनांना रस्ताच मोकळा राहत नाही. भाजी विक्र ते भर रस्त्यावर बसून असतात. दोन्ही बाजूला दुकाने लावलेली असतात वाहन धारकांना तर सर्कस करावी लागते.

टॅग्स :Nashikनाशिक