शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नांदगावच्या मोबाइल सेवेचे तीन तेरा

By admin | Updated: July 8, 2014 00:52 IST

नांदगावच्या मोबाइल सेवेचे तीन तेरा

 

संजीव धामणे

नांदगावअलग पहचान बनाए,बीएसएनएल अपनाए।दूरसंचार निगमच्या अधिकाऱ्यांना रिंग दिली असता, त्यांच्या मोबाइलवरून ऐकु येणाऱ्या वरील पंक्तींच्या अगदी उलट कारभार नांदगावच्या बीएसएनएलचा सुरू आहे. ‘अपनाए’च्या ऐवजी ग्राहक दूर भगाए अशी सध्याची स्थिती आहे. दिवसेंदिवस मोबाइल सेवा ढेपाळत आहे. थ्रीजी सेवा देणे दूरच; परंतु आहे ती टूजी सेवादेखील सुरळीत मिळत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील सर्व लाइन्स व्यस्त आहेत... पहिल्या रिंगला आउट आॅफ कव्हरेज दाखवून दुसऱ्या रिंगला कॉल लागणे, असे प्रकार सर्रास सुरूआहेत. तसेच इंटरनेट न उघडणे... उघडलेच तर गतिमंद असणे. थोड्या वेळाने रिट्राय असा मेसेज येणे. यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.याउलट इतर कंपन्यांचे थ्रीजी कनेक्शन्स असल्याने त्यावर नेटमधून मजकूर, जेपीजी व इतर फाईल्स चटकन डाउनलोड होणे. विविध प्रकारच्या अ‍ॅप्सची कार्यक्षम सेवा मिळणे या सुविधा कार्यक्षमतेने मिळत असल्याने बीएसएनलचा ग्राहकवर्ग खासगी कंपन्यांकडे स्थलांतरित होत आहे.यासंदर्भात येथील पत्रकारांनी बीएसएनएलच्या कार्यालयास भेट देऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक उपविभागीय अधिकारी वाय. बी.जाधव, कनिष्ठ अभियंता मोराणकर उपकरणांच्या अभावामुळे हतबल असल्याचे दिसून आले. विभागीय अभियंता प्रदीप देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुसरे विभागीय अभियंता विसपुते यांच्याकडे बोट दाखवले; मात्र त्याचवेळेस वरिष्ठ अधिकारी उपमहाव्यवस्थापक सैंदाणे यांच्याशी बोला, असा सल्लाही पत्रकारांना दिला. सैंदाणे यांनी सरकारी खाक्याप्रमाणे आपल्या कोर्टातला चेंडू कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे टोलवला. नांदगाव येथे टूजीची दोन बीटीएस यंत्रे आहेत. वरिष्ठांकडे जात असलेल्या प्रत्येक नोंदीमध्ये ही यंत्रणा अपूर्ण पडत असल्याची माहिती जात असते. कॉल न लागणे, नेट न मिळणे यामागे व्हॉइस ट्रॅफिक व डाटा ट्रॅफिकची कोंडी हे प्रमुख कारण आहे. उदाहरणार्थ रहदारी वाढली परंतु रस्ता पूर्वीचाच आहे. त्यासाठीच थ्रीजीची आवश्यकता आहे. येथे १२ टीआरई आहेत. एक टीआरई म्हणजे आठ चॅनल्स. ते वाढविण्याची आवश्यकता आहे. १५० ते २०० एर्लांग एवढी येथील दूरसंचार रहदारी आहे. ती येथील यंत्रणेच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मोबाइल सेवेसंदर्भात लक्ष घालावे, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. मोबाइल सेवा सुरू करण्यासाठी नागरिकांना आंदोलन करावे लागले होते. (वार्ताहर)