शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव मतदारांची नावे यादीतून गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:45 IST

नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार तांत्रिक चुकीने हिरावून घेतला जात असतांना, चुकीची दुरुस्ती करण्याचे सौजन्य ही प्रलंबित झालेले बघावयास मिळत असल्याची साहेबराव घुगे यांची तक्रार आहे.

ठळक मुद्देन्याय मिळत नाही : २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण

नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार तांत्रिक चुकीने हिरावून घेतला जात असतांना, चुकीची दुरुस्ती करण्याचे सौजन्य ही प्रलंबित झालेले बघावयास मिळत असल्याची साहेबराव घुगे यांची तक्रार आहे.विशेष म्हणजे मतदार याद्यांचे काम करणाऱ्या बीएलओ ग्रामसेवकांनी देखील आपल्या संमतीशिवाय नावे कमी झाल्याचे लेखी पत्र नांदगावच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे. गेल्या दोन महिन्यापासून याबाबतचा पाठपुरावा सुरु असतांना दाखल करण्यात आलेल्या अपिलावर नांदगाव येथील सहाय्य्क विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अद्याप निर्णय घेतला नाही असा आरोप साहेबराव घुगे यांच्यासह गावातील नावे कमी झालेल्या मतदारांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार याद्यांचे प्रकटीकरण जाहीर झाल्यापासून आता अंतिम याद्यांच्या प्रसिद्धीचा दिवस जवळ येऊनही याबाबत निर्णय झाला नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे.नावे कमी झालेल्या मतदारांनी आता जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान याबाबत आपल्याकडे जेऊर गावातील ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली असून त्याची शहानिशा सुरु असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय कुलकर्णी यांनी दिली.नांदगाव विधानसभा मतदार संघातील परंतु मालेगाव तालुक्यातील जेऊर गावातील मतदार यादीचा भाग १०६ व १०७ मधील एकूण १६४ मतदारांची नावे ते स्थलांतरित झाली असल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर नांदगाव येथील निवडणूक शाखेकडे देण्यात आले. या लेखी पत्रावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी आहे प्रत्यक्षात सदरची सही आपली नसल्याचा खुलासा ग्रामसेवक भामरे यांनी नांदगावच्या तहसीलदारांना २६ ऑक्टोबरला दिलेल्या लेखी खुलाशात केला आहे. कुणाचेही नाव कमी केले नसल्याचे आपल्या जबाबात भामरे यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारे सुनील कुटे व भालचंद्र साळुंके या संबंधित प्रभागाच्या बीएलओ यांनी आपण निवडणूक शाखेला मतदारांची नावे कमी केल्याबाबत कुठल्याही प्रकारची लेखी माहिती भरून दिली नसल्याचा लेखी खुलासा केला आहे. त्यामुळे नावे कमी झालेल्या मतदारांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान २६ तारखेला आपण नांदगाव येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती साहेबराव घुगे यांनी दिली. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान