शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

नांदगाव मतदारांची नावे यादीतून गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:45 IST

नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार तांत्रिक चुकीने हिरावून घेतला जात असतांना, चुकीची दुरुस्ती करण्याचे सौजन्य ही प्रलंबित झालेले बघावयास मिळत असल्याची साहेबराव घुगे यांची तक्रार आहे.

ठळक मुद्देन्याय मिळत नाही : २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण

नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार तांत्रिक चुकीने हिरावून घेतला जात असतांना, चुकीची दुरुस्ती करण्याचे सौजन्य ही प्रलंबित झालेले बघावयास मिळत असल्याची साहेबराव घुगे यांची तक्रार आहे.विशेष म्हणजे मतदार याद्यांचे काम करणाऱ्या बीएलओ ग्रामसेवकांनी देखील आपल्या संमतीशिवाय नावे कमी झाल्याचे लेखी पत्र नांदगावच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे. गेल्या दोन महिन्यापासून याबाबतचा पाठपुरावा सुरु असतांना दाखल करण्यात आलेल्या अपिलावर नांदगाव येथील सहाय्य्क विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अद्याप निर्णय घेतला नाही असा आरोप साहेबराव घुगे यांच्यासह गावातील नावे कमी झालेल्या मतदारांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार याद्यांचे प्रकटीकरण जाहीर झाल्यापासून आता अंतिम याद्यांच्या प्रसिद्धीचा दिवस जवळ येऊनही याबाबत निर्णय झाला नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे.नावे कमी झालेल्या मतदारांनी आता जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान याबाबत आपल्याकडे जेऊर गावातील ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली असून त्याची शहानिशा सुरु असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय कुलकर्णी यांनी दिली.नांदगाव विधानसभा मतदार संघातील परंतु मालेगाव तालुक्यातील जेऊर गावातील मतदार यादीचा भाग १०६ व १०७ मधील एकूण १६४ मतदारांची नावे ते स्थलांतरित झाली असल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर नांदगाव येथील निवडणूक शाखेकडे देण्यात आले. या लेखी पत्रावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी आहे प्रत्यक्षात सदरची सही आपली नसल्याचा खुलासा ग्रामसेवक भामरे यांनी नांदगावच्या तहसीलदारांना २६ ऑक्टोबरला दिलेल्या लेखी खुलाशात केला आहे. कुणाचेही नाव कमी केले नसल्याचे आपल्या जबाबात भामरे यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारे सुनील कुटे व भालचंद्र साळुंके या संबंधित प्रभागाच्या बीएलओ यांनी आपण निवडणूक शाखेला मतदारांची नावे कमी केल्याबाबत कुठल्याही प्रकारची लेखी माहिती भरून दिली नसल्याचा लेखी खुलासा केला आहे. त्यामुळे नावे कमी झालेल्या मतदारांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान २६ तारखेला आपण नांदगाव येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती साहेबराव घुगे यांनी दिली. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान