शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

नांदगाव मतदारांची नावे यादीतून गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:45 IST

नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार तांत्रिक चुकीने हिरावून घेतला जात असतांना, चुकीची दुरुस्ती करण्याचे सौजन्य ही प्रलंबित झालेले बघावयास मिळत असल्याची साहेबराव घुगे यांची तक्रार आहे.

ठळक मुद्देन्याय मिळत नाही : २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण

नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार तांत्रिक चुकीने हिरावून घेतला जात असतांना, चुकीची दुरुस्ती करण्याचे सौजन्य ही प्रलंबित झालेले बघावयास मिळत असल्याची साहेबराव घुगे यांची तक्रार आहे.विशेष म्हणजे मतदार याद्यांचे काम करणाऱ्या बीएलओ ग्रामसेवकांनी देखील आपल्या संमतीशिवाय नावे कमी झाल्याचे लेखी पत्र नांदगावच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे. गेल्या दोन महिन्यापासून याबाबतचा पाठपुरावा सुरु असतांना दाखल करण्यात आलेल्या अपिलावर नांदगाव येथील सहाय्य्क विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अद्याप निर्णय घेतला नाही असा आरोप साहेबराव घुगे यांच्यासह गावातील नावे कमी झालेल्या मतदारांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार याद्यांचे प्रकटीकरण जाहीर झाल्यापासून आता अंतिम याद्यांच्या प्रसिद्धीचा दिवस जवळ येऊनही याबाबत निर्णय झाला नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे.नावे कमी झालेल्या मतदारांनी आता जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान याबाबत आपल्याकडे जेऊर गावातील ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली असून त्याची शहानिशा सुरु असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय कुलकर्णी यांनी दिली.नांदगाव विधानसभा मतदार संघातील परंतु मालेगाव तालुक्यातील जेऊर गावातील मतदार यादीचा भाग १०६ व १०७ मधील एकूण १६४ मतदारांची नावे ते स्थलांतरित झाली असल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर नांदगाव येथील निवडणूक शाखेकडे देण्यात आले. या लेखी पत्रावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी आहे प्रत्यक्षात सदरची सही आपली नसल्याचा खुलासा ग्रामसेवक भामरे यांनी नांदगावच्या तहसीलदारांना २६ ऑक्टोबरला दिलेल्या लेखी खुलाशात केला आहे. कुणाचेही नाव कमी केले नसल्याचे आपल्या जबाबात भामरे यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारे सुनील कुटे व भालचंद्र साळुंके या संबंधित प्रभागाच्या बीएलओ यांनी आपण निवडणूक शाखेला मतदारांची नावे कमी केल्याबाबत कुठल्याही प्रकारची लेखी माहिती भरून दिली नसल्याचा लेखी खुलासा केला आहे. त्यामुळे नावे कमी झालेल्या मतदारांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान २६ तारखेला आपण नांदगाव येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती साहेबराव घुगे यांनी दिली. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान