शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

महिन्यापासून नायगाव तलाठी कार्यालय ‘सील’

By admin | Updated: November 12, 2016 22:56 IST

महिन्यापासून नायगाव तलाठी कार्यालय ‘सील’

 नायगाव : अतिरिक्त कार्यभार नाकारण्याचा निर्णय तलाठी संघटनेने घेतल्यामुळे नायगाव येथील तलाठी कार्यालय महिनाभरापासून ‘सील’ करण्यात आले आहे. तलाठी कार्यालय बंद असल्यामुळे नायगाव सजात समाविष्ट असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची ‘सजा’ भोगावी लागत आहे.नायगावसह जोगलटेंभी, सोनगिरी, ब्राह्मणवाडे या गावांचा नायगाव सजात समावेश होतो. त्यामुळे शेतजमिनीसंदर्भातील कामांसाठी या चारही गावांतील शेतकऱ्यांची येथील तलाठी कार्यालयात नियमित वर्दळ असते. गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ तलाठ्याची नेमणूक न करता अतिरिक्त कार्यभार म्हणून नायगावची जबाबदारी इतर सजातील तलाठ्यांवर सोपविण्यात येत असल्यामुळे व वारंवार तलाठ्यांच्या बदल्या होत असल्याने आधीच शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नव्हती. त्यातच आॅगस्ट महिन्यात बारागावपिंप्री व वडांगळी या दोन सजांमधील सहा गावांचा कारभार असलेल्या एस. पी. गोराणे यांच्याकडे नायगाव सजातील चार गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील तीन सजातील दहा गावांचा कारभार सांभाळताना गोराणे यांची चांगलीच दमछाक होत होती. शिवाय पंधरा-वीस दिवसांनंतर एकेका सजातील तलाठी कार्यालया उघडले जात होती. परिणामी, मोठ्या प्रमाणात कामे खोळंबून राहत होत असल्याने तलाठ्यांना शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागत होते.दरम्यान, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने अतिरिक्त पदभार असलेल्या सजांचा कार्यभार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तलाठी गोराणे यांनी गेल्या महिन्यातच नायगाव तलाठी कार्यालय सील करुन त्याची चावी तहसील कार्यालयात जमा केली आहे. त्यामुळे महिनाभरापासून नायगाव सजातील शेतकऱ्यांची कामे अडून पडली असल्याने संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)