शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ना गुढी ना गोडवा, गावागावात सांत्वनात गेला पाडवा

By admin | Updated: March 22, 2015 00:25 IST

ना गुढी ना गोडवा, गावागावात सांत्वनात गेला पाडवा

 कसबे सुकेणे : सोसायटीचे साडेसहा लाख रुपये कर्ज काढले, तीन लाखांचा इतर खर्च करीत शिमला मिरचीसाठी साडेनऊ लाख अडकविले; पण निसर्गाने मांडलेल्या खेळाने लाखाचे बारा हजार झाले... एका तासात सारी स्वप्ने अक्षरश: धुवून नेली, सांगा साहेब कर्ज क सं फेडायंच, तोंडातला घास हिरावून गेल्याने काहीही गोड लागत नाही... अख्खी बाग आडवी झाली.. सांगा साहेब कसा साजरा करू कसा आम्ही पाडवा... हे भावनाविवश शब्द आहे निफाड तालुक्यातील गारपीट व अवेळी पावसाने संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांचे.गारपीट व अवेळी पावसाने पुरते उद्ध्वस्त झालेल्या निफाड तालुक्यातील उगाव, वनसगाव, सारोळे या प्रातिनिधिक भागाची शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी पाहणी करीत नुकसानी माहिती जाणून घेत शेतकऱ्यांचे सांत्वन केले. शनिवारी दुपारी सिंह यांनी उगाव, वनसगाव व सारोळे येथील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. गारपिटीने झोडपलेल्या द्राक्षपंढरीत आज सण साजरा झालाच नाही. वर्षभर ज्या द्राक्षवेलींवर प्रगतीचे स्वप्न फुलायचे त्या द्राक्षवेली गारपिटीने कोमजल्याने द्राक्षांचा गोडवा कधीच निघून गेला; पण आजचा पाडवा या भागात मंत्र्यांच्या सांत्वनातच गेला. मंत्रिमहोदयांचा ताफा आज १२ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळाहून उगाव, वनसगाव व सारोळे भागात आला. या भागातील वस्त्यावर आज सणाचा गोडवा कुठेही पाहावयास मिळाला नाही, मांगल्याची गुढी, साखरेच्या गाठींचा गोडवाही यंदाच्या गारपिटीने लुप्त झाला होता. सिंह यांनी सारोळ येथील ज्ञानेश्वर जेऊघाले, श्यामराव भोसले, वनसगाव येथील दामोदर शिंदे व उगावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. पानावलेले डोळे, चेहऱ्यावरील निरुत्साह असलेल्या शेतकऱ्यांना गारपिटीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या मुखातून शब्दही फुटत नव्हते. साहेब, पोटच्या पोराप्रमाणे वर्षभर जीव लावून द्राक्षबागा जोपासल्या, द्राक्षांच्या भरवश्यावर लाखोंचे गणित मांडले परंतु गारपिटीने हे गणित पुरते बिघडविले असून, द्राक्ष उत्पादक उद्ध्वस्त झाला असल्याचे यावेळी द्राक्ष उत्पादकांनी भावनाविवश होत सांगितले. (वार्ताहर)