शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी फ ौज देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:56 IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. राष्टÑप्रेमाच्या भावनेतून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे हेच नेताजींचे अंतिम ध्येय होते, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

ठळक मुद्दे सुभाषचंद्र बोस यांच्या कर्तृत्वावर आनंद नाडकर्णी यांचा प्रकाशझोत

नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. राष्टÑप्रेमाच्या भावनेतून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे हेच नेताजींचे अंतिम ध्येय होते, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.शंकराचार्य न्यास, आयाम संस्था व इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोल्डन हेरिटेज : संस्कारमालेअंतर्गत राष्ट्रपुरुषांच्या जीवनगाथांमधून मनआरोग्याचे प्रशिक्षण या उपक्र माच्या माध्यमातून शनिवारी (दि.२०) ‘नेताजी, वन मॅन टू आर्मी’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कुर्तकोटी सभागृहात या संस्कारमालेचे पहिले पुष्प नाडकर्णी यांनी दृकश्राव्य यंत्राच्या आधारे गुंफले.यावेळी नाडकर्णी यांनी नेताजींच्या कार्यावर प्रकाश टाकला. राष्टÑाच्या उन्नतीसाठी समर्पण करणे हाच त्यांचा उद्देश राहिला. त्यामुळे नेताजींनी लोकमान्य टिळकांच्या तुरुंगातील कोठडीला ‘देवालय’ असा शब्दप्रयोग करण्याचे धाडस इंग्रज अधिकाऱ्यांपुढे दाखविले आणि त्या कोठडीमध्ये मला राहायचे अशी इच्छाही बोलून दाखविली. भारत हा असा एकमेव देश आहे, की जेथे सत्तेत राहून जितके लोकप्रिय होता येत नाही, तितके सत्तेत न राहता लोकप्रिय होता येते, असे नेताजींनी त्यावेळी सांगितले होते. सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते गांधीजींना जाऊन भेटले; परंतु त्यांच्या व गांधीजींच्या विचारांमध्ये तफावत होती हे लक्षात आल्यानंतर ते त्यांच्यापासून दूर गेले, असे यावेळी नाडकर्णी म्हणाले.‘ती’ योजना उत्तम व्यवस्थापनाचा धडाभारताबाहेर लढा उभारून इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी नेताजींनी वेशांतर करून इंग्रजांच्या नजरकै देतून देशाबाहेर निसटण्याचा निर्धार केला. पुतण्या शिशिर यांच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्धरीत्या देशाबाहेर जाण्यास यश मिळविले व जपानमध्ये आझाद हिंद फौजेचे पुनरु ज्जीवन केले. देशातून बाहेर पडण्यासाठी नेताजींनी आखलेली योजना उत्तम व्यवस्थापनाचा धडाच होय, असे नाडकर्णी यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक