शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

‘माझी फ ौज देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:56 IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. राष्टÑप्रेमाच्या भावनेतून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे हेच नेताजींचे अंतिम ध्येय होते, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

ठळक मुद्दे सुभाषचंद्र बोस यांच्या कर्तृत्वावर आनंद नाडकर्णी यांचा प्रकाशझोत

नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. राष्टÑप्रेमाच्या भावनेतून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे हेच नेताजींचे अंतिम ध्येय होते, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.शंकराचार्य न्यास, आयाम संस्था व इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोल्डन हेरिटेज : संस्कारमालेअंतर्गत राष्ट्रपुरुषांच्या जीवनगाथांमधून मनआरोग्याचे प्रशिक्षण या उपक्र माच्या माध्यमातून शनिवारी (दि.२०) ‘नेताजी, वन मॅन टू आर्मी’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कुर्तकोटी सभागृहात या संस्कारमालेचे पहिले पुष्प नाडकर्णी यांनी दृकश्राव्य यंत्राच्या आधारे गुंफले.यावेळी नाडकर्णी यांनी नेताजींच्या कार्यावर प्रकाश टाकला. राष्टÑाच्या उन्नतीसाठी समर्पण करणे हाच त्यांचा उद्देश राहिला. त्यामुळे नेताजींनी लोकमान्य टिळकांच्या तुरुंगातील कोठडीला ‘देवालय’ असा शब्दप्रयोग करण्याचे धाडस इंग्रज अधिकाऱ्यांपुढे दाखविले आणि त्या कोठडीमध्ये मला राहायचे अशी इच्छाही बोलून दाखविली. भारत हा असा एकमेव देश आहे, की जेथे सत्तेत राहून जितके लोकप्रिय होता येत नाही, तितके सत्तेत न राहता लोकप्रिय होता येते, असे नेताजींनी त्यावेळी सांगितले होते. सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते गांधीजींना जाऊन भेटले; परंतु त्यांच्या व गांधीजींच्या विचारांमध्ये तफावत होती हे लक्षात आल्यानंतर ते त्यांच्यापासून दूर गेले, असे यावेळी नाडकर्णी म्हणाले.‘ती’ योजना उत्तम व्यवस्थापनाचा धडाभारताबाहेर लढा उभारून इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी नेताजींनी वेशांतर करून इंग्रजांच्या नजरकै देतून देशाबाहेर निसटण्याचा निर्धार केला. पुतण्या शिशिर यांच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्धरीत्या देशाबाहेर जाण्यास यश मिळविले व जपानमध्ये आझाद हिंद फौजेचे पुनरु ज्जीवन केले. देशातून बाहेर पडण्यासाठी नेताजींनी आखलेली योजना उत्तम व्यवस्थापनाचा धडाच होय, असे नाडकर्णी यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक