शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी फ ौज देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:56 IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. राष्टÑप्रेमाच्या भावनेतून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे हेच नेताजींचे अंतिम ध्येय होते, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.

ठळक मुद्दे सुभाषचंद्र बोस यांच्या कर्तृत्वावर आनंद नाडकर्णी यांचा प्रकाशझोत

नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. राष्टÑप्रेमाच्या भावनेतून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे हेच नेताजींचे अंतिम ध्येय होते, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.शंकराचार्य न्यास, आयाम संस्था व इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोल्डन हेरिटेज : संस्कारमालेअंतर्गत राष्ट्रपुरुषांच्या जीवनगाथांमधून मनआरोग्याचे प्रशिक्षण या उपक्र माच्या माध्यमातून शनिवारी (दि.२०) ‘नेताजी, वन मॅन टू आर्मी’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कुर्तकोटी सभागृहात या संस्कारमालेचे पहिले पुष्प नाडकर्णी यांनी दृकश्राव्य यंत्राच्या आधारे गुंफले.यावेळी नाडकर्णी यांनी नेताजींच्या कार्यावर प्रकाश टाकला. राष्टÑाच्या उन्नतीसाठी समर्पण करणे हाच त्यांचा उद्देश राहिला. त्यामुळे नेताजींनी लोकमान्य टिळकांच्या तुरुंगातील कोठडीला ‘देवालय’ असा शब्दप्रयोग करण्याचे धाडस इंग्रज अधिकाऱ्यांपुढे दाखविले आणि त्या कोठडीमध्ये मला राहायचे अशी इच्छाही बोलून दाखविली. भारत हा असा एकमेव देश आहे, की जेथे सत्तेत राहून जितके लोकप्रिय होता येत नाही, तितके सत्तेत न राहता लोकप्रिय होता येते, असे नेताजींनी त्यावेळी सांगितले होते. सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते गांधीजींना जाऊन भेटले; परंतु त्यांच्या व गांधीजींच्या विचारांमध्ये तफावत होती हे लक्षात आल्यानंतर ते त्यांच्यापासून दूर गेले, असे यावेळी नाडकर्णी म्हणाले.‘ती’ योजना उत्तम व्यवस्थापनाचा धडाभारताबाहेर लढा उभारून इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी नेताजींनी वेशांतर करून इंग्रजांच्या नजरकै देतून देशाबाहेर निसटण्याचा निर्धार केला. पुतण्या शिशिर यांच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्धरीत्या देशाबाहेर जाण्यास यश मिळविले व जपानमध्ये आझाद हिंद फौजेचे पुनरु ज्जीवन केले. देशातून बाहेर पडण्यासाठी नेताजींनी आखलेली योजना उत्तम व्यवस्थापनाचा धडाच होय, असे नाडकर्णी यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक