शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुथूट गोळीबार : हेल्मेटसह आढळल्या शहराच्या वेशीवर दरोडेखोरांच्या ‘पल्सर-२२०’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 14:17 IST

रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देशहराची कायदासुव्यवस्था कमालीची ढासळली हल्लेखोरांनी शहराची वेस यशस्वीपणे ओलांडली नाकाबंदीत सुमारे २० किलोमीटरचे अंतर दुचाकीवरून कसे कापले?

नाशिक : उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात जबरी लुटीच्या इराद्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर-२२०प्रकारच्या तीन दुचाकी शहराच्या वेशीवर रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी शनिवारी (दि.१५) पोलिसांना आढळून आल्या आहेत. या दुचाकींच्या क्रमांकावरून या गुन्ह्याच्या तपासाला आता पोलीस गती देऊ शकणार आहे; मात्र तीनही पल्सरसोबत हेल्मेटदेखील पोलिसांना मिळून आल्याने हल्लेखोर शहराच्या नाकाबंदीमधून हेल्मेटसक्तीचा फायदा घेत वेशीबाहेर पोहचल्याचे बोलले जात आहे.शहराची कायदासुव्यवस्था मागील काही दिवसांपासून कमालीची ढासळली आहे. रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी गुंडांच्या गोळीबाराच्या घटनेने अवघे शहर हादरून गेले आणि पोलिसांची कायदासुव्यवस्था चव्हाट्यावर आली. या गुन्ह्यात फायनान्सचा निष्पाप तरुण कर्मचाऱ्याचा बळी गेला. हल्लेखोरांनी एक दोन नव्हे तर तब्बल पाच गोळ्या त्याच्या शरीरात झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दिवसाच्या सुरुवातीला गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नाच्या घटनेने पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले. शहराच्या कायदासुव्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचे यावरून उघड झाले. विशेष म्हणजे गुरुवारच्या रात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन, मिशन आॅल आउट सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविले होते. तरीदेखील शुक्रवारी सशस्त्र दरोडा टाकण्याचा भरवस्तीत प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांची नाकेबंदी, झडतीसत्र, सीमाबंदीसाठी तपासणी नाके रात्रीची गस्त पथके ही केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित होत आहे.पोलिसांच्या ‘नाका’खालून ओलांडली वेसहल्लेखोरांनी क्षणार्धात पोलिसांच्या ‘नाका’खालून ते सहजरीत्या निसटले. हल्ल्याची माहिती मिळताच सर्व शहरात तसेच जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले गेले आणि नाकाबंदी वाढविली गेली. तपासपथके रवाना झाली; मात्र हाती काहीही लागले नाही. हल्लेखोरांनी शहराची वेस यशस्वीपणे ओलांडली आणि रामशेजजवळ गुन्ह्यात वापरलेल्या दुचाक्या सोडून पोबारा केला. यावरून पोलिसांच्या नाकाबंदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण नाकाबंदी असतानाही उंटवाडी ते रामशेजपर्यंत सुमारे २० किलोमीटरचे अंतर हल्लेखोरांनी दुचाकीवरून कसे कापले? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :Firingगोळीबारnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyदरोडाbikeबाईक