शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने घेतली ‘अल निनो’ची धास्ती !

By श्याम बागुल | Updated: March 21, 2023 14:30 IST

पाण्याचा तुटवडा जाणवणार : आराखडा तयार करण्याच्या सुचना

नाशिक : हवामान शास्त्रज्ञांनी आगामी काळात ‘अल निनो’ या वादळामुळे कडक उष्णता व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केल्याने नाशिक महपालिकेने त्याची धास्ती घेतली असून, धरणांच्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होण्याच्या भीतीमुळे आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर व पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल, त्यासाठी अधिकाऱ्यांना आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यापूर्वी २००९, २०१४, २०१५ व २०१८ मध्ये आलेल्या ‘अल निनो’मुळे देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर परिणाम झाल्याने पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे यंदाही ‘अल निनो’चा धोका कायम राहिल्यास पावसाचे प्रमाण घटून दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, शिवाय उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन पडून उष्णता निर्माण होईल व त्यातून धरण, तलाव, कालवे, विहिरी, नद्यांच्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात ‘अल निनो’चा धोका अधिक असून त्याचा परिणामी खरीप हंगामावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस व थंडीचे प्रमाण सोडता नजीकच्या काळात उष्णता वाढण्याची त्याच बरोबर गंगापूर धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यत आहे. तसे झाल्यास नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊन पाणी कपात किंवा पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही

टॅग्स :Nashikनाशिक