शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

महापालिकेने घेतली ‘अल निनो’ची धास्ती !

By श्याम बागुल | Updated: March 21, 2023 14:30 IST

पाण्याचा तुटवडा जाणवणार : आराखडा तयार करण्याच्या सुचना

नाशिक : हवामान शास्त्रज्ञांनी आगामी काळात ‘अल निनो’ या वादळामुळे कडक उष्णता व दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केल्याने नाशिक महपालिकेने त्याची धास्ती घेतली असून, धरणांच्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होण्याच्या भीतीमुळे आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर व पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल, त्यासाठी अधिकाऱ्यांना आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यापूर्वी २००९, २०१४, २०१५ व २०१८ मध्ये आलेल्या ‘अल निनो’मुळे देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर परिणाम झाल्याने पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे यंदाही ‘अल निनो’चा धोका कायम राहिल्यास पावसाचे प्रमाण घटून दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, शिवाय उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन पडून उष्णता निर्माण होईल व त्यातून धरण, तलाव, कालवे, विहिरी, नद्यांच्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात ‘अल निनो’चा धोका अधिक असून त्याचा परिणामी खरीप हंगामावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस व थंडीचे प्रमाण सोडता नजीकच्या काळात उष्णता वाढण्याची त्याच बरोबर गंगापूर धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यत आहे. तसे झाल्यास नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊन पाणी कपात किंवा पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही

टॅग्स :Nashikनाशिक